शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

श्रावणमासात हनुमान मंदिराची कवाडे ठेवली जातात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:20 IST

रावेर : श्रावण मासातील धार्मिक सण व व्रतवैकल्यांची पर्वणी पाहता शिवभक्ती, दुर्गाभक्ती, गुरुदत्त तथा श्री हनुमान भक्ती सर्वत्र फुलत ...

रावेर : श्रावण मासातील धार्मिक सण व व्रतवैकल्यांची पर्वणी पाहता शिवभक्ती, दुर्गाभक्ती, गुरुदत्त तथा श्री हनुमान भक्ती सर्वत्र फुलत आहे. अशात तालुक्यातील खानापूर येथील श्रीराम मंदिरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिराची कवाडे भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याची अतिप्राचीन परंपरा जोपासली जात आहे.

भक्तिआराधनेच्या या श्रावण मासात संकटमोचन श्री हनुमान मंदिराची कवाडे बंद ठेवण्याची अतिप्राचीन परंपरा जोपासणारे हे राज्यातील वा संबंध देशभरात एकमेव हनुमान मंदिर असण्याचा कयास श्री हनुमान भक्तांमधून व्यक्त होत आहे. श्री हनुमान भक्तांमध्ये यासंबंधी एक कुतूहल व्यक्त होत आहे.

खानापूर येथील पुरातन श्रीराम मंदिराची मोठी आख्यायिका सांगितली जाते. एका मूर्तिकाराने बैलगाडीवर विक्रीसाठी आणलेल्या श्री प्रभुरामचंद्र, सीतामाई व लक्ष्मणाच्या अत्यंत मनमोहक मूर्तींची किंमत गावकऱ्यांच्या देणगीपेक्षा जास्त सांगितली. मूर्तिकाराने सांगितलेले मूल्य व लोकवर्गणी यात जमीन अस्मानाचा फरक राहिल्याने व्यवहार फिसकटला. म्हणून मूर्तिकाराने गावातून काढता पाय घेतला. तो मूर्तिकार पुढच्या कर्जोद गावी मुक्कामासाठी थांबला. तथापि या मुक्कामात त्याला प्रभू रामचंद्रांनी स्वप्नात येऊन दृष्टान्त दिला की, “मला खानापूरलाच थांबायचे आहे. त्या अनुषंगाने मूर्तिकाराने दुसऱ्या दिवशी पहाटे तडक खानापूर गाठले व खानापूरवासीयांनी दिलेली लोकवर्गणी स्वीकारून साक्षात दृष्टान्त घडवलेल्या श्री प्रभुरामचंद्रांच्या पावन मूर्तींचे पूजन करून त्या ग्रामस्थांच्या स्वाधीन केल्या. याच भव्य दिव्य अशा पश्चिममुखी असलेल्या श्रीराम मंदिराच्या पाठीशी सलग्न असे दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिर साकारण्यात आले आहे. या पुरातन श्री हनुमान मंदिराच्या अंगणात असलेल्या भल्यामोठ्या दगडावर आषाढ वद्य अमावस्येनिमित्त बळी चढवून संपूर्ण श्रावणमासात ग्रामस्थ मांसाहार वर्ज्य करीत असत. किंबहुना, संपूर्ण श्रावणमासात श्री हनुमंतासमोर अखंड दीप प्रज्वलित ठेवण्यासाठी श्री हनुमान मंदिराची कवाडे बंद करून महिनाभरानंतर श्रावण वद्य अमावस्या अर्थात पिठोरी अमावस्या वा पोळ्याच्या सणानिमित्त ग्रामवासीयांसाठी खुली करण्यात येत असल्याची आख्यायिका आहे. त्या अनुषंगाने प्राचीन परंपरा जोपासण्यात येत असल्याची माहिती ग्रामपुरोहित नरेंद्र धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’ला दिली. संबंध राज्यात वा देशभरात ऐन धार्मिक व्रतवैकल्यांच्या श्रावणमासात श्री हनुमान मंदिराची कवाडे बंद ठेवण्याची पुरातन परंपरा जोपासणारे खानापूर हे गाव कदाचित पहिले व एकमाद्वितीय असावे, असा कयास व्यक्त केला जात आहे.