शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

रेमडेसिविरच संजीवनी असा समज करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:15 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रेमडेसिविरचा सर्वत्र तुडवडा निर्माण झाला असून रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड फरफट होत आहे. मात्र, रेमडेसिविर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रेमडेसिविरचा सर्वत्र तुडवडा निर्माण झाला असून रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड फरफट होत आहे. मात्र, रेमडेसिविर हे इंजेक्शन काही रुग्णांवर प्रभावी ठरते तर काही रुग्णांवर त्याचा प्रभाव होत नाही, त्यामुळे हे इंजेक्शन म्हणजे ब्रम्हास्त्र किंवा संजीवनी असा समज कोणी करू, नये असे आयएमएचे सचिव डॉ. राधेश्याम चौधरी यांनी म्हटले आहे. रेमडेसिविरच्या तुटवड्याबाबत त्यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे.

आयसीएमआरनुसार रेमडेसिविर हे इंजेक्शन सौम्य, मध्यम, गंभीर, अतिगंभीर या कोणत्याही प्रकाराच्या रुग्णांवर तेवढे प्रभावी ठरत नाही. रेमडेसिविर देताना रुग्णाचा एचआरसीटी, रक्ताचे नमूने, संसर्गाचे प्रमाण, त्याची ऑक्सिनची पातळी हे सर्व बघूनच त्याचा वापर व्हावा, असेही त्यांनी म्हटले आहे. सद्य जिल्ह्यात साडे अकरा हजार सक्रिय रुग्ण आहेत. ९ हजारांवर रुग्णांना कसलीही लक्षणे नाहीत. २५०० रुग्णांना लक्षणे असून यातील काहीच रुग्णांना रेमडेसिविरची आवश्यकता हा आकडा पाचशे ते सहाशे अशी परिस्थिती आहे.

तुटवडा कायम

रेमडेसिविर इंजेक्शनचा रविवारी तुटवडा कायम होता. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसात हा तुटवडा दूर होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. एकिकडे स्कोर बघूनच याचा वापर व्हावा असे सांगण्यात येत असताना स्कोर कमी असतानाही हे देणे आवश्यक असून यामुळे पुढील गंभीर धोके टळतात, असाही मतप्रवाह डॉक्टरांकडून समोर येत आहे.