शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बोंडअळीला रोखण्यासाठी घरगुती हॅलोजन सापळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 12:33 IST

कपाशीवर पडणाऱ्या बोंडअळीमुळे शेतक-यांमध्ये मोठीच चिंता व्यक्त केली जात आहे.

- अर्पण लोढा ।जामनेर (जि. जळगाव) : कपाशीवर पडणाऱ्या बोंडअळीमुळे शेतक-यांमध्ये मोठीच चिंता व्यक्त केली जात आहे. आपल्या शेतांमध्ये तीव्र क्षमतेचे हॅलोजन सापळा लावून बोंडअळीचे पतंगच नाहीसे करण्याचा उपाय वाकोद ता. जामनेर येथील शेतक-यांनी शोधून काढला आहे. जामनेर आणि परिसरात कपाशीची लागवड मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केली जाते. या मे महिन्यात लागवड झालेला कापूस सध्या पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिकावर सद्यास्थितीमध्ये रस शोषण करणाºया किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. याशिवाय पूर्वहंगामी कपाशीमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे. एवढेच नाही तर जिनींगमध्ये देखील बोंडअळीचे पतंग आढळत आहेत. पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत असणाºया कपाशीवर बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. गेल्या हंगामात फरदडमुळे अनेक शेतकºयांनी बोंडअळीग्रस्त कपाशी देखील शेतात ठेवली होती. मागील हंगामामध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव फुले लागण्याच्या अवस्थेपासूनच झाला होता. त्यामुळे या हंगामामध्ये या किडीसाठी सजग राहणे आवश्यक आहे. ही अळी बोंडामध्ये शिरल्यानंतर तिला रोखणे कठीण होते. त्यामुळे अंडी अवस्था, अळीची प्रथमावस्था व पतंग अवस्थेत बोंडअळीला रोखणे गरजेचे बनले आहे.असा आहे घरगुती जुगाडबोंडअळीमुळे गेल्या हंगामात निम्मे उत्पन्न घटल्याने शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागला होता. यावर शेतकºयांकडून आतापासून उपाय केले जात आहेत. बोंडअळीचे पतंग किंवा अंडी शेतात असल्यास शेतात ठिकठिकाणी ट्रॅप लावले जात आहेत. यामुळे फक्त पिकावर अळीचा प्रादुर्भाव आहे किंवा नाही हे समजते. जामनेर तालुक्याच्या काही भागात शेतक-यांनी बोंडअळीच्या पतंगानाच आहे त्याच ठिकाणी रोखण्याचा उपाय सुरु केला आहे.

असा आहे उपाय -एक पत्र्याचा डबा घेवून त्याला पिवळा रंग लावायचा. या डब्यात दोन हजार वॅटचा हॅलोजन बल्ब (फोकस) शेतातील एका खांबावर लावावा. रात्रभर हा हॅलोजन सुरु ठेवायचा. यामुळे बोंडअळीचे पतंग दिव्याकडे आकर्षित होतात आणि दिव्याच्या उष्णतेने तेथेच मरून पडतात. हा उपाय सध्या परिसरात अनेक शेतकरी करीत आहेत. 

 

 

 

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र