शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

'पैसे घेऊन मत देता ना...? मग आता खड्डयांवर बोलूच नका!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 11:51 IST

सत्ताधारी नगरसेवकाचे उत्तर ; दुरुस्त केलेल्या रस्त्यांची लागली वाट

जळगाव : मनपा निवडणुकीत तुम्ही मत देताना आमच्याकडून पैसे घेतले आहेत, त्यामुळे खड्डे असो की आणखी काही, याविषयी तुम्ही बोलूच नका...अशा शब्दात सत्ताधारी एका नगरसेवकाने वॉर्डातील खड्डयांची तक्रार घेऊन गेलेल्या नागरिकाला सुनावल्याचा प्रकार बुधवारी घडला.शहरात सर्वत्र रस्त्यांची वाट लागलेली असताना या नगरसेवकाने चक्क सुविधा पुरविण्यास नकार दिला. याबाबतीत काही नागरिकांनी ‘लोकमत’कडे याबाबतची माहिती दिली आहे. अमृत योजनेमुळे रस्त्यांची अक्षरश वाट लागली आहे. तसेच ज्या भागात अमृतचे काम झाले नाही अशा भागात रस्त्यांची चाळणी झाली आहे. त्यातच पावसामुळे या खड्डयांमध्ये पाणी साचले आहे तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर चिखल पसरल्याने नागरिकांना पायी चालणे देखील कठीण झाले आहे. मुख्य शहरापेक्षा उपनगरांमध्ये जास्त भयानकस्थिती असून, मनपाकडून उपाययोजना करण्यात आल्या तरीही त्याचा फारसा फायदा झालेला दिसून येत नाही.नागरिकांकडून रस्ते दुरुस्तीसाठी जर नगरसेवकांकडून अपेक्षेने जात असतील व नगरसेवकांकडून जर नागरिकांना अशा प्रकारे उत्तर दिले जात असेल तर सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आलेला दिसून येत आहे. नागरिकांनी जर नरसेवकांकडे तक्रार नाही करायची तर कोणाकडे करायची ? असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ‘लोकमत’ ला माहिती देणाºया नागरिकांनी आपले नाव न छापण्याचा अटीवर ही माहिती दिली आहे.दुरुस्ती केलेल्या रस्त्यांची पुन्हा चाळणी‘लोकमत’ ने खड्डे प्रश्नांवर अभियान राबविल्यानंतर मनपा प्रशासनाने शहरातील मुख्य भागात डांबर व खडीव्दारे रस्त्यांची दुरुस्ती केली. तर उपनगरांमधील रस्त्यांवर मुरूम टाकून खड्डे दुरुस्त करण्यात आले होते. मात्र, दुरुस्त केलेल्या रस्त्यांची शहरात सुरु असलेल्या संततधारमुळे पुन्हा चाळणी झाली आहे. मुख्य रस्त्यांवरील खडी उखडून पडली आहे, तर अनेक ठिकाणी मुरूम देखील वाहून गेला आहे. पुन्हा खड्डयांचा त्रास वाढला असून, आता नागरिकांनी दुुरुस्तीची मागणी करणे देखील कठीण झाले आहे.प्रत्येक नागरिकाने पैसे घेतले का ?मनपा निवडणुकीत भरमसाठ पैशांचा वापर झाला हे नगरसेवकाने नागरिकांना दिलेल्या उत्तरातून सिध्द होत आहे. मात्र, प्रत्येक नागरिकाने मतांसाठी पैसे घेतले नाहीत अशा परिस्थितीत नगरसेवकांनी त्यांच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे. समस्या सोडण्याचे आश्वासन देण्याऐवजी नागरिकांवर ‘मनपा निवडणुकीत पैसे’ घेतल्याचा आरोप केला जात आहे. खड्डेमुक्त जळगावचे आश्वासन देणारे आमदार सुरेश भोळे अशा नगरसेवकांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.उपनगरांमध्ये भीषण स्थितीउपनगरांमध्ये जास्त भयंकर स्थिती पहायला मिळत आहे. अमृत योजनेमुळे खोदण्यात आलेले रस्ते मातीव्दारेच थातूर-मातूर पध्दतीने बुजविण्यात आले आहेत. आता पावसामुळे संपूर्ण माती रस्त्यांवर पसरल्याने चिखल तयार झाला आहे. मुरूम टाकण्यात आला. त्याच्यात देखील मोठ्या प्रमाणात मातीच असल्याने चिखलात अधिकच भर पडली आहे. शहरातील जवळ-जवळ सर्वच उपनगरांमध्ये हीच स्थिती पहायला मिळत असून, पायी चालणे देखील कठीण झाले आहे. मनपाकडून दुरुस्तीचे काम सुरु असले तरी या दुुरुस्तीचा फारसा उपयोग होताना दिसून येत नाही. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव