शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
6
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
7
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
8
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
9
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

'पैसे घेऊन मत देता ना...? मग आता खड्डयांवर बोलूच नका!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 11:51 IST

सत्ताधारी नगरसेवकाचे उत्तर ; दुरुस्त केलेल्या रस्त्यांची लागली वाट

जळगाव : मनपा निवडणुकीत तुम्ही मत देताना आमच्याकडून पैसे घेतले आहेत, त्यामुळे खड्डे असो की आणखी काही, याविषयी तुम्ही बोलूच नका...अशा शब्दात सत्ताधारी एका नगरसेवकाने वॉर्डातील खड्डयांची तक्रार घेऊन गेलेल्या नागरिकाला सुनावल्याचा प्रकार बुधवारी घडला.शहरात सर्वत्र रस्त्यांची वाट लागलेली असताना या नगरसेवकाने चक्क सुविधा पुरविण्यास नकार दिला. याबाबतीत काही नागरिकांनी ‘लोकमत’कडे याबाबतची माहिती दिली आहे. अमृत योजनेमुळे रस्त्यांची अक्षरश वाट लागली आहे. तसेच ज्या भागात अमृतचे काम झाले नाही अशा भागात रस्त्यांची चाळणी झाली आहे. त्यातच पावसामुळे या खड्डयांमध्ये पाणी साचले आहे तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर चिखल पसरल्याने नागरिकांना पायी चालणे देखील कठीण झाले आहे. मुख्य शहरापेक्षा उपनगरांमध्ये जास्त भयानकस्थिती असून, मनपाकडून उपाययोजना करण्यात आल्या तरीही त्याचा फारसा फायदा झालेला दिसून येत नाही.नागरिकांकडून रस्ते दुरुस्तीसाठी जर नगरसेवकांकडून अपेक्षेने जात असतील व नगरसेवकांकडून जर नागरिकांना अशा प्रकारे उत्तर दिले जात असेल तर सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आलेला दिसून येत आहे. नागरिकांनी जर नरसेवकांकडे तक्रार नाही करायची तर कोणाकडे करायची ? असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ‘लोकमत’ ला माहिती देणाºया नागरिकांनी आपले नाव न छापण्याचा अटीवर ही माहिती दिली आहे.दुरुस्ती केलेल्या रस्त्यांची पुन्हा चाळणी‘लोकमत’ ने खड्डे प्रश्नांवर अभियान राबविल्यानंतर मनपा प्रशासनाने शहरातील मुख्य भागात डांबर व खडीव्दारे रस्त्यांची दुरुस्ती केली. तर उपनगरांमधील रस्त्यांवर मुरूम टाकून खड्डे दुरुस्त करण्यात आले होते. मात्र, दुरुस्त केलेल्या रस्त्यांची शहरात सुरु असलेल्या संततधारमुळे पुन्हा चाळणी झाली आहे. मुख्य रस्त्यांवरील खडी उखडून पडली आहे, तर अनेक ठिकाणी मुरूम देखील वाहून गेला आहे. पुन्हा खड्डयांचा त्रास वाढला असून, आता नागरिकांनी दुुरुस्तीची मागणी करणे देखील कठीण झाले आहे.प्रत्येक नागरिकाने पैसे घेतले का ?मनपा निवडणुकीत भरमसाठ पैशांचा वापर झाला हे नगरसेवकाने नागरिकांना दिलेल्या उत्तरातून सिध्द होत आहे. मात्र, प्रत्येक नागरिकाने मतांसाठी पैसे घेतले नाहीत अशा परिस्थितीत नगरसेवकांनी त्यांच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे. समस्या सोडण्याचे आश्वासन देण्याऐवजी नागरिकांवर ‘मनपा निवडणुकीत पैसे’ घेतल्याचा आरोप केला जात आहे. खड्डेमुक्त जळगावचे आश्वासन देणारे आमदार सुरेश भोळे अशा नगरसेवकांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.उपनगरांमध्ये भीषण स्थितीउपनगरांमध्ये जास्त भयंकर स्थिती पहायला मिळत आहे. अमृत योजनेमुळे खोदण्यात आलेले रस्ते मातीव्दारेच थातूर-मातूर पध्दतीने बुजविण्यात आले आहेत. आता पावसामुळे संपूर्ण माती रस्त्यांवर पसरल्याने चिखल तयार झाला आहे. मुरूम टाकण्यात आला. त्याच्यात देखील मोठ्या प्रमाणात मातीच असल्याने चिखलात अधिकच भर पडली आहे. शहरातील जवळ-जवळ सर्वच उपनगरांमध्ये हीच स्थिती पहायला मिळत असून, पायी चालणे देखील कठीण झाले आहे. मनपाकडून दुरुस्तीचे काम सुरु असले तरी या दुुरुस्तीचा फारसा उपयोग होताना दिसून येत नाही. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव