जुन्या कामांची चौकशी करणार
By Admin | Updated: May 10, 2014 18:49 IST2014-05-10T18:49:19+5:302014-05-10T18:49:19+5:30
गेल्या पंचवार्षिकमध्ये झालेले रस्ते व इतर बांधकामे निकृष्ट झाली असतील तर त्यांची चौकशी करण्याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

जुन्या कामांची चौकशी करणार
ांदुरबार : गेल्या पंचवार्षिकमध्ये झालेले रस्ते व इतर बांधकामे निकृष्ट झाली असतील तर त्यांची चौकशी करण्याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यासाठी सदस्यांनी आपल्या भागातील कामांबाबत तक्रारी दिल्यास दखल घेतली जाणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावीत यांनी सांगितले. जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा शुक्रवारी अध्यक्ष भरत गावीत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आचारसंहिता असल्यामुळे ठोस आर्थिक निर्णय घेता आले नसले तरी इतर विविध विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली. सदस्यांनी उपस्थित केलेल्या निकृष्ट बांधकामांच्या विषयांवर पुन्हा चर्चा झाली. सदस्या रजनी शिरीषकुमार नाईक यांनी नवापूर तालुक्यातील उचीशेवडी रस्ता निकृष्ट असल्याबाबत गावकर्यांची तक्रार होती. गताडी आरोग्य केंद्राचे कामदेखील निकृष्ट झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर बांधकाम अभियंता विधाते यांना विचारणा करण्यात आली. त्यांनी ठरल्याप्रमाणे नेहमीचे ‘पाहून सांगतो’ हे उत्तर दिले. त्यामुळे अध्यक्ष संतापले, त्यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. गेल्या पंचवार्षिकमध्ये निकृष्ट कामे झाले असतील तर त्या त्या परिसरातील सदस्यांनी तक्रारी द्याव्या. चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे अध्यक्ष भरत गावीत यांनी सांगितले. बदल्या पारदर्शक करणार बदल्यांबाबत नेहमीच ओरड असते. विशेषत: शिक्षक आणि आरोग्य विभागाच्या बदल्यांबाबत नेहमीच तक्रारी असतात, त्यामुळे यंदा बदल्या करताना सर्व बाबींची काळजी घेतली जाणार आहे. शिक्षकांच्या बदल्यांच्या वेळी व्हिडिओ रेकर्ॉडिंग करण्यात येईल. संबंधित सर्व अधिकार्यांना एकाच ठिकाणी बोलावून त्यांना त्याच ठिकाणी कर्मचार्यांच्या बदलीच्या आदेशावर सही करून त्यांना रुजू व मुक्त करण्याच्या आदेशावरही सही करावी लागणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकार्यांना देण्यात आल्या. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी बदली आदेश माहिती देऊन वाचून दाखविला. पाणीटंचाई पाणीटंचाईसंदर्भातदेखील या वेळी चर्चा करण्यात आली. कूपनलिकेसाठी आठ गाड्या आहेत. सहा इंचीसाठी सहा तर चार इंची कूपनलिका करण्यासाठी दोन गाड्या उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. टंचाईग्रस्त गावाने मागणी करताच त्या ठिकाणी संबंधित वाहने पाठविण्यात येत असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राठोड यांनी सांगितले. टंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीच्या उपाययोजनांना गती द्यावी, अशा सूचनाही या वेळी देण्यात आल्या. डेंग्यूचा आढावा जिल्ह्यात ताप आणि डेंग्यूची साथ सुरू आहे. आरोग्य विभाग नेहमीप्रमाणे आपल्या संथ गतीने कामे करीत आहेत. त्यावरही आज चर्चा करण्यात आली. उपाययोजना सुरू असल्याची माहिती देऊन धुरळणी करण्यात येत असल्याचे आरोग्य अधिकारी प्रकाश पाडवी यांनी सांगितले. या वेळी सभापती नरहर ठाकरे, विक्रमसिंग वळवी, बुटीबाई पाडवी यांच्यासह सदस्य उपस्थित होते.