शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

गुन्हेगारांना पोसताय अन् कष्टकऱ्यांसाठी पैसा नाही - डॉ.बाबा आढाव यांची शासनावर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:06 IST

कष्टक-यांचा जाहीरनामा तयार करण्यासाठी राज्यभर दौरा

ठळक मुद्देकष्टक-यांचे श्रम विकत घेतले, न्याय कधी मिळणार?गोवा, राजस्थान, आंध्र प्रदेश पेन्शन देते, महाराष्टÑ कधी देणार?

विकास पाटीलजळगाव : खून, दरोडे, हाणामाºया करणाºया गुन्हेगारांना शासन कारागृहात पोसतेय, जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा त्यांना पुरवते, मात्र ज्यांनी कोणताही गुन्हा केला नाही अशा कष्टकºयांसाठी शासनाकडे पैसा नाही, अशा शब्दात महाराष्टÑ राज्य हमाल-मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी शासनावर टीका केली.राज्य हमाल-मापाडी महामंडळातर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित मेळाव्यासाठी ते जळगावात आले असता ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला असता, ते देशभरातील कष्टकºयांच्या प्रश्नावर बोलत होते.देशाला स्वातंत्र्य मिळाले व आता समतेचे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अद्यापही हे स्वप्न पूर्ण झालेले नाही. स्वातंत्र्यानंतर विषमता कमी होण्याऐवजी वाढत आहे. सर्वच राजकीय पक्षाचे आर्थिक धोरण सारखेच आहे. कष्टकºयांसाठी शासनाकडे पैसा नाही अन् एकदा आमदार झालेल्यांना ४२ हजार तर खासदार झालेल्यांना एक लाख पेन्शन हे सरकार देते. ज्यांनी आमदार, खासदारांना निवडून दिले, त्यांना शासन काय देते? कष्टकºयांच्या डोक्यावर साधे छप्परही नाही. माझ्या आया-बहिणी झोपडपट्टीत राहतात. माझ्याकडे घरकुलाची, पेन्शनची मागणी करतात. सरकार गुन्हेगारांना पोसतेय, मात्र कष्टकºयांना घरकूलही देत नाही. या कष्टकºयांच्या मागण्यांसाठी मी आतापर्यंत ६० वेळा कारागृहात गेलो, मात्र प्रश्न कायम आहेत. शासन टाळाटाळ करते. आमदारांच्या घरापुढे घंटा वाजवून त्यांना जागे करण्याचे काम आता करणार आहेत. आगामी काळात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आहेत. कष्टकºयांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी कष्टकºयांचा जाहीरनामा तयार करण्यात येत असून त्यासाठी राज्यभर दौरा सुरू आहे. आमचा जाहीरनामा मान्य करणाºयांनाच सहकार्य करणार.कष्टकºयांचे श्रम विकत घेतले, न्याय कधी मिळणार?बाबा आढाव म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, शासनाची आर्थिक धोरणाची दिशा ग्राहकवादी आहे, प्रत्येक नागरिक हा ग्राहक आहे. तर आतापर्यंत किती ग्राहकांना न्याय मिळाला. देशात संघटित क्षेत्र आकुंचित, तर असंघटित क्षेत्र वाढत आहे. असंघटित क्षेत्रातील कष्टकºयांची संख्या ५० कोटी आहे. कष्टकºयांचे श्रम विकत घेणाºयांनी आतापर्यंत काय न्याय दिला, हे शासनाने जाहीर करावे.गोवा, राजस्थान, आंध्र प्रदेश पेन्शन देते, महाराष्टÑ कधी देणार?अटलबिहारी वाजपेयींनी छत्री कायदा आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र छत्री उघडलीच नाही. त्यानंतर मनमोहनसिंह सरकारने सामाजिक सुरक्षा कायदा २००८ मध्ये मंजूर केला. त्यास १० वर्षे झाली, पण कष्टकºयांना न्याय मिळाला नाही. केंद्राने कायदा केला, मात्र स्वत:ची जबाबदारी झटकत राज्य शासनांकडे जबाबदारी ढकलली. राज्य सरकार टाळाटाळ करीत आहेत. गोवा सरकार २ हजार, आंध्र, राजस्थान १ हजार रुपये पेन्शन देते, मात्र महाराष्टÑ देण्यास तयार नाही. कष्टकºयांसाठी या शासनाकडे पैसा नाही, हे आमचे दुर्दैव आहे.

टॅग्स :Baba Adhavबाबा आढावJalgaonजळगाव