शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:03 IST

दर तासांनी महानिरीक्षकांकडून आढावा । पोलिसांचा दिवसभर खडा पहारा

जळगाव : अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांनी रात्रंदिवस खडा पहारा दिला तर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी संवेदनशील भागात भेटी देवून थेट नियंत्रण कक्षाचा ताबा घेतला. पोलिसांचे योग्य नियोजन, सोशल मीडियााबाबत केलेले आवाहन व जिल्ह्यातील नागरिकांनी सौहार्दाची भूमिका घेतली.अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील पोलीस यंत्रणेला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात बाहेरुन एसआरपी कंपनी व दोन हजाराच्यावर होमगार्ड मागविण्यात आले आहेत. सलग दोन दिवस हा बंदोबस्त कायम राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ ला दिली.नियंत्रण कक्षातून आढावाडॉ. उगले यांनी शनिवारी शहरातील संवेदनशील भागात भेट दिल्यानंतर ११ वाजता नियंत्रण कक्षाचा ताबा घेतला. तेथून प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी अधिकाऱ्यांकडून ते माहिती जाणून घेत होते. त्याशिवाय फिक्स पॉर्इंट व हॉटस्पॉटवरील कर्मचारी थेट नियंत्रण कक्षाच्या संपर्कात होते.दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे दर एक तासांनी पोलीस अधीक्षकांकडून आढावा घेत होते.त्यांच्या दिमतीला एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक डी. एम. पाटील, सीआरओ पवार, राखीव निरीक्षक सुभाष कावरे, सहायक निरीक्षक आखेगावकर, उपनिरीक्षक दिलीप पाटील आदी अधिकाऱ्यांचा ताफा होता.शस्त्रधारी कमांडो पथक राखीव ठेवण्यात आले होते.अनेक मोक्याच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. हे पोली परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.दोन दिवस पोलिसांच्या सुट्टया रद्दईद- ए- मिलाद आणि अयोध्या निकाल हे दोन प्रकरणे सध्या संवेदनशील आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. सोशल मिडीयावरुन अफवा पसरविणारे संदेश यावर विशेष नजर ठेवण्यात आली. बहुतांश गृप अ‍ॅडमीनने सर्व सदस्यांना ब्लॉक केले आहे. गृपवर फक्त अ‍ॅडमीन यांचेच मेसेज येत होते. त्यात अयोध्या हा विषय नव्हता. सर्वांकडूनच शांततेचे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव