भेसळयुक्त माव्याची जिल्ह्यात धडक

By Admin | Updated: November 6, 2015 00:11 IST2015-11-06T00:11:46+5:302015-11-06T00:11:46+5:30

दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणावर मिठाई तयार केली जात असून त्यासाठी वापरण्यात येणा:या वस्तूंचा दर्जा सुमार राहत असल्याचे चित्र आहे.

In the district of adulterated mavi | भेसळयुक्त माव्याची जिल्ह्यात धडक

भेसळयुक्त माव्याची जिल्ह्यात धडक

नंदुरबार : अन्न व औषध प्रशासन विभागाचा उंटावरून शेळ्या हाकण्याचा

प्रकार सुरूच आहे. दिवाळीत अन्न पदार्थाची गुणवत्ता, भेसळ याबाबत पुन्हा आलबेल चित्र भासवले जात आहे. सणासुदीच्या काळात किमान 15 दिवस आधी या विभागाने मिठाई व इतर पदार्थ विक्रेत्यांचे प्रबोधन करून त्यांना भेसळीसंदर्भात कडक कारवाईचा इशारा देणे आवश्यक असताना तसे काहीही दिसून येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणावर मिठाई तयार केली जात असून त्यासाठी वापरण्यात येणा:या वस्तूंचा दर्जा सुमार राहत असल्याचे चित्र आहे.

 

नंदुरबारात आधीच दुधाची टंचाई आहे. असे असताना शहरात असलेल्या 25 पेक्षा अधिक मोठय़ा हॉटेल्सचालकांना मावा बाहेरूनच आयात करावा लागतो. त्यासाठी गुजरातमधील अहमदाबाद, सुरत या शहरांना सर्वाधिक पसंती आहे. तयार माव्याची ऑर्डर दिल्यास तो ऑर्डरच्या ठिकाणी पोहोच करण्याची व्यवस्था विक्रेत्यांकडे आहे. आयात केलेल्या माव्यावर प्रक्रिया करून त्याची मिठाई तयार केली जाते.

या माव्यात भेसळ किती हा भाग अलहिदा असतो. भेसळीचे प्रमाण जास्त राहिल्यास त्यातून विषबाधेसारखे प्रकारही घडून येतात. चार वर्षापूर्वी रबडीतून विषबाधा झाली होती. दोन वर्षापूर्वी दिवाळीच्या काळात शेकडो किलो भेसळयुक्त मावा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाने अशा प्रकारची कारवाई कधीही केलेली ऐकीवात नाही.

दिवाळीला मिठाईला मागणी वाढते. त्यामुळे मागणी पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक मिळेल त्या ठिकाणाहून मावा मागवत असतात. ही बाब लक्षात घेता त्यात त्याची गुणवत्ता पाहिली जात नाही. परिणामी बोगस व भेसळयुक्त माव्याचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जात असल्याचा आरोपही करण्यात येतो.

हॉटेलमधील अस्वच्छता

चार वर्षापूर्वी रबडी विषबाधेनंतर हॉटेल्समधील स्वच्छता, उघडय़ावरील खाद्यपदार्थाची विक्री, खाद्यपदार्थाची गुणवत्ता, भेसळ आदी प्रश्न चर्चेत आले होते. जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे संकेत दिले होते. अन्न व औषध प्रशासन विभागाने नेहमीप्रमाणे सोपस्कार केले. हॉटेल्स व्यावसायिकांनी एक दिवस सामूहिक स्वच्छता करून उरकवून घेतले. हॉटेल्समधील पदार्थ तयार करणा:या जागेवरील स्वच्छतेचा प्रश्न सुटलेला नाही. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर तरी काळजी घेण्यात यावी, अशी अपेक्षा आहे.

विभागाचे दुर्लक्ष

अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हा धुळे येथून चालतो. नंदुरबारला स्वतंत्र कार्यालय सुरू करावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे या विभागाचा कारभार हा उंटावरून शेळ्या हाकलण्याच्या प्रकारासारखाच झाला आहे. त्यामुळे भेसळखोरांचे मोठय़ा प्रमाणावर फावले आहे.

वास्तविक दिवाळीच्या काळात मिठाईला मोठी मागणी असते. ते पाहता भेसळ होणार नाही, पदार्थाची गुणवत्ता टिकून राहील यासाठी या विभागाच्या अधिका:यांनी मोठय़ा मिठाई विक्रेत्यांसह इतर विक्रेत्यांचे प्रबोधन करून, त्यांच्या हॉटेल्सला भेट देऊन मार्गदर्शन करणे आवश्यक होते. प्रसंगी भेसळ आढळल्यास कडक कारवाईचा इशारादेखील देता आला असता. परंतु त्यातील कुठलाच प्रकार या विभागाच्या अधिका:यांनी केला नाही. त्यामुळे विक्रेत्यांचे फावले आहे.

 

Web Title: In the district of adulterated mavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.