शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दूरच्या देशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 14:54 IST

जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिल शहा यांनी नुकतीच बांगला देशात भेट दिली. त्यांच्या अनुभवावर आधारित क्रमश: लेखमाला ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत. लेखमालेचा आज पहिला भाग.

एका कामासाठी मला बांगला देशात जाण्याची गरज होती आणि त्यात अतिशय अवघड आणि थोडा जोखमीचा प्रवास होता. तरी प्रवासाची संधी होती आणि मी ती घेतली. तेथे बोली आणि सरकारी कामाचीही भाषा बंगाली हीच. बंगाली उच्चारांची गंमत मला तेथे पदोपदी त्रास देत राहिली. समोरचा इंग्रजी बोलला तरी एकेक शब्द दोन दोन वेळा ‘आॅऽऽऽ’ किंवा ‘सॉरीऽऽ’ करत करत विचारूनच पुढे जावे लागायचे. सोबतच्या मोबाइलवर इंटरनेटची मदतही त्यासाठी वारंवार घेत होतो. काही लोक हिंदी बोलतात, पण तसे मला कमीच भेटले.पारपत्र, व्हिसा आणि ओळखपत्र यांचे महत्त्व कधी नव्हे इतके सगळीकडेच वाढले आहे. पृथ्वीवर माणसांनी निर्माण केलेल्या सीमांची कुंपणे माणसांच्याच जीवावर उठली आहेत. त्यासाठी मला बांगला देशातील लोकांशी संपर्क साधून त्यांच्याकडून निमंत्रणपत्र मागवावे लागले. ते व्हिसाच्या अर्जासह जोडले तेव्हा व्हिसा मिळाला. बांगला देशचा व्हिसा आता सहज मिळत नाही.कोणत्याही देशात गेल्यावर तेथे संपर्काचे साधन म्हणून आता मोबाइल अनिवार्यच झाला आहे. कोणत्या कंपनीची ‘रेंज’ सर्वत्र चांगली मिळते हे माहीत करून घेतले होते. त्या देशात सीमकार्ड घेणे सोपे आहे असे कळले होते. तरीही मी विमानतळावरच सीमकार्डचे दुकान शोधले. ते घेतले आणि बचावलो. कारण मी थांबलो त्याच हॉटेलमध्ये नंतर आलेल्या एका प्रवाशाने तुम्हाला सीमकार्ड कसे काय मिळाले, असे मला विचारता मी ते विमानतळावरच घेतल्याचा खुलासा केला. त्याला का मिळाले नाही विचारता, तो पाच-सहा वेळा आला तेव्हा त्याला गावात सहज मिळाले होते, असा अनुभव सांगितला. मात्र या खेपेला विमानतळाबाहेर आल्यावर त्याला ढाक्का सोडेपर्यंत खूप प्रयत्न करूनही सीमकार्ड मिळालेच नाही. कारण विचारता त्या देशाने नागरिकांना दिलेले तेथले स्थानिक ओळखपत्र असल्याशिवाय आता सीमकार्ड मिळत नाही, असा खुलासा मला दिला. पासपोर्टचा उपयोग शून्य. एकदा का तुम्ही विमानतळाबाहेर आलात की मग स्थानिक ओळखपत्राशिवाय सीमकार्ड नाहीच.अतिरेक्यांनी सगळ्याच देशात उच्छाद मांडून प्रत्येकाच्याच मनात प्रचंड मोठी आणि न ओलांडता येणारी असुरक्षिततेची कडेकोट भिंत उभी करून ठेवली आहे. शिवाय माणसे त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जातात. त्याचा हा परिणाम. वसुधैव कुटुंबकम किंवा सभै भूमी गोपालकी या अतिशय खोल भारतीय तत्त्वज्ञानाच्या कधीच चिंध्या झाल्या आहेत. गावात फिरतानाही पारपत्र आणि व्हिसा सतत सोबत ठेवला पाहिजे. कुणा एका माणसाने सगळ्या देशात मला मुक्त फिरता आले पाहिजे आणि व्हिसाची गरज नसावी असे प्रश्न विचारत, आहे त्या व्यवस्थेला क्षीण आवाजात का असेना पण प्रश्न विचारले आणि तसा प्रवास करायचा प्रयत्न केला. पण भिंती निर्माण करणारी व्यवस्था अधिक बलदंड ठरली.मला जायचे होते ते ठिकाण रंगबली (बंऊ. रोंगबॉली) पतुआखलि जिल्ह्यात. रंगबली हे एका बेटावर आहे. त्याच्या चारही बाजूंना पाणी आहे. जवळ वस्ती कमीतकमी ४५ किलोमीटर अंतरावर आणि तीही वाट पाण्यातूनच. हे ठिकाण आहे बांगला देशाच्या दक्षिण टोकाला. अगदी बंगालच्या उपसागराच्या तोंडाशी. या भागात नेहमी चक्रीवादळे येऊन धडकतात. येथे जमिनीचा आकार नरसाळ्यासारखा निमुळता असल्याने समुद्रातून वादळाचा वेग आता जमिनीकडे येताना प्रचंड वाढतो आणि खूप नुकसान करतो. भौगोलिक दृष्ट्या अतिशय चक्रीवादळ प्रवण. (क्रमश:)-अनिल शाह, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव