शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जि. प.तील बनावट बिलांची ३१ वर्षे जुनी फाईल उघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:12 IST

जळगाव : जिल्हा परिषदेतील १९९० मधील बनावट ठेकेदारांच्या नावाने हतनूर पुनर्वसन प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या बिलांच्या प्रकरणात मुख्य ...

जळगाव : जिल्हा परिषदेतील १९९० मधील बनावट ठेकेदारांच्या नावाने हतनूर पुनर्वसन प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या बिलांच्या प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दोनजणांविरोधात स्वतंत्र दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर, सीआयडीकडून कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. यात त्यांनी जि. प.ला भेटही दिली असून त्यावेळचे या प्रकरणातील फिर्यादी मुख्य कार्यकारी अधिकारी डी. के. जैन यांची आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष नोंदविली जाणार आहे.

या प्रकरणात डी. के. जैन यांच्या फिर्यादीवरून १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात कंत्राटदारांसह अधिकाऱ्यांचाही समावेश होता. यात विजय अग्रवाल, जगन्नाथ पाटील, प्रभाकर बारपाडे, बसप्पा रामलिंगप्पा, संतोषकुमार कौल, अजय अग्रवाल, अली हुसेन कायमत अली बोहरी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, तर या प्रकरणातील अशोक अग्रवाल, धनसिंग राजपूत, आनंदराव पाटील, रेणुकादास कंधारकर हे मृत झाले आहेत. यातील सुरेश रामेश्वर अग्रवाल आणि सतिश रामेश्वर अग्रवाल यांच्याविरोधात स्वतंत्र दोषारोपत्र दाखल करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी २०१९ मध्ये दिले आहेत. त्यानुसार सीआयडीने हे जबाब नोंदविण्याची कार्यवाही सुरू केली असून लवकरच डी. के. जैन यांचा जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदविण्यात येणार आहे.

काय होते प्रकरण?

हतनूर पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत मक्तेदाराने तयार केलेली बनावट बिले अधिकाऱ्यांनी न तपासता पारित केली होती. यात सरकार पक्षाच्या आरोपाप्रमाणे ७९ लाख ४५ हजार ३२० रुपयांची अफरातफर व शासनाची फसवणूक झाली होती. जिल्हा परिषदेत सन १९८३ ते १९८५ या काळात हा अपहार झाला होता. १९९० मध्ये तत्कालीन सीईओंना अशोक अग्रवाल यांनी वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे बिले काढल्याची माहिती मिळाली होती. बिले, टेंडर, मोजमाप पुस्तक आदी तपासल्यानंतर संशय आल्यानंतर त्यांनी अक्षरतज्ज्ञांकडून बिले तपासून घेतली. यात अशोक अग्रवाल यांनी एस. आर. शर्मा, पी. पी. घोडके आणि ओ. आर. शर्मा यांच्या नावाने बनावट बिले तयार करून त्यावर अशोक अग्रवाल यांची स्वाक्षरी होती. यानुसार ८ एप्रिल १९९० रोजी सीईओंनी गुप्त पत्र पाठवून याबाबत १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील काही आरोपी निर्दोष मुक्त झाले असून दोघांवर दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सीआयडीकडून कार्यवाही सुरू झाली आहे.