शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

जि. प.तील बनावट बिलांची ३१ वर्षे जुनी फाईल उघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:12 IST

जळगाव : जिल्हा परिषदेतील १९९० मधील बनावट ठेकेदारांच्या नावाने हतनूर पुनर्वसन प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या बिलांच्या प्रकरणात मुख्य ...

जळगाव : जिल्हा परिषदेतील १९९० मधील बनावट ठेकेदारांच्या नावाने हतनूर पुनर्वसन प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या बिलांच्या प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दोनजणांविरोधात स्वतंत्र दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर, सीआयडीकडून कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. यात त्यांनी जि. प.ला भेटही दिली असून त्यावेळचे या प्रकरणातील फिर्यादी मुख्य कार्यकारी अधिकारी डी. के. जैन यांची आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष नोंदविली जाणार आहे.

या प्रकरणात डी. के. जैन यांच्या फिर्यादीवरून १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात कंत्राटदारांसह अधिकाऱ्यांचाही समावेश होता. यात विजय अग्रवाल, जगन्नाथ पाटील, प्रभाकर बारपाडे, बसप्पा रामलिंगप्पा, संतोषकुमार कौल, अजय अग्रवाल, अली हुसेन कायमत अली बोहरी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, तर या प्रकरणातील अशोक अग्रवाल, धनसिंग राजपूत, आनंदराव पाटील, रेणुकादास कंधारकर हे मृत झाले आहेत. यातील सुरेश रामेश्वर अग्रवाल आणि सतिश रामेश्वर अग्रवाल यांच्याविरोधात स्वतंत्र दोषारोपत्र दाखल करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी २०१९ मध्ये दिले आहेत. त्यानुसार सीआयडीने हे जबाब नोंदविण्याची कार्यवाही सुरू केली असून लवकरच डी. के. जैन यांचा जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदविण्यात येणार आहे.

काय होते प्रकरण?

हतनूर पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत मक्तेदाराने तयार केलेली बनावट बिले अधिकाऱ्यांनी न तपासता पारित केली होती. यात सरकार पक्षाच्या आरोपाप्रमाणे ७९ लाख ४५ हजार ३२० रुपयांची अफरातफर व शासनाची फसवणूक झाली होती. जिल्हा परिषदेत सन १९८३ ते १९८५ या काळात हा अपहार झाला होता. १९९० मध्ये तत्कालीन सीईओंना अशोक अग्रवाल यांनी वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे बिले काढल्याची माहिती मिळाली होती. बिले, टेंडर, मोजमाप पुस्तक आदी तपासल्यानंतर संशय आल्यानंतर त्यांनी अक्षरतज्ज्ञांकडून बिले तपासून घेतली. यात अशोक अग्रवाल यांनी एस. आर. शर्मा, पी. पी. घोडके आणि ओ. आर. शर्मा यांच्या नावाने बनावट बिले तयार करून त्यावर अशोक अग्रवाल यांची स्वाक्षरी होती. यानुसार ८ एप्रिल १९९० रोजी सीईओंनी गुप्त पत्र पाठवून याबाबत १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील काही आरोपी निर्दोष मुक्त झाले असून दोघांवर दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सीआयडीकडून कार्यवाही सुरू झाली आहे.