शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

शिस्तीचा बडगा कायम असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 3:10 PM

जिल्हा परिषद

हितेंद्र काळुंखेजळगाव: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी विविध कामांसह कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचे कामही सुरु केले आहे. यासाठी काही ठिकाणी अचानक भेटी देवून त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये धाक निर्माण केला आहे. असे असले तरी हा असर जास्त काळ टिकत नाही, असेच दिसून येते. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत काही विभागांमध्ये अचानक भेटी देवून कामाच्या वेळेत कार्यालयात हजर नसलेले तसेच रजा न घेता कार्यालयातच न आलेले ... अशा काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा अचानक मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोन विभागांना भेटी देवून झाडाझडती केली होती. यावेळी सर्व व्यवस्थित आढळले मात्र दोन दिवसांपूर्वी पंचायत समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी अचानक भेट दिली असता गटविकास अधिकारी यांच्यासह १० कर्मचारी कार्यालयातच नव्हते. याची दखल घेत त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गेल्या महिन्यात पाचोरा पं. स. मध्येही अचानक भेट दिली असता गैरहजर असलेल्या पाच अभियंत्यांना थेट निलंबित केले होते. ही बाब लक्षात घेता इतरांनी सावध होणे गरजेचे असताना तसे झाल्याचे दिसत नाही. जळगाव पंचायत समितीला तर हा धाक अधिक असायला हवा, कारण मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे जळगाव येथेच कार्यालय असल्याने ते केव्हाही आपल्याही पंचायत समितीत भेट देवू शकतात हे संबंधितांनी गृहीत धरायला हवे होते. परंतु दुर्लक्ष करण्याचा मानवी स्वभाव या सर्वांना नडला. यामुळेच शिस्तीचा हा बडगा एकदा किंवा दोनदा नव्हे तर नेहमीच उगारणे गरजेचे आहे.