शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

तीन आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस न आल्यास अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 13:04 IST

उडीद-मूग, ज्वारी होणार बाद : सोयाबीन, मका, तुरीचे क्षेत्र वाढणार

जळगाव : यंदा विविध कारणांनी जिल्ह्यात पावसाचे आगमन लांबले असून तीन आठवड्यात पेरणी योग्य पावसाने हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांपुढील अडचणीत वाढ होणार आहे. उडीद, मूग, ज्वारीऐवजी सोयाबीन, मका, तुरीची लागवड करावी लागणार आहे. याशिवाय उत्पादनातही घट येण्याची भिती असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.जिल्ह्यात यंदा गत १५ वर्षातील गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचीच चिंता असल्याने पावसाची प्रतीक्षा होत असताना जिल्ह्यात पावसाचे आगमन मात्र विविध कारणांनी लांबले आहे.एरव्ही ७ जूनच्या आसपास पाऊस हजेरी लावतो. त्यामुळे शेतकरी तातडीने पेरण्या आटोपून घेतात. मात्र यंदा विविध कारणांनी पावसाचे आगमन लांबले आहे. तर शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचा जीवनक्रम खंडीत न झाल्याने कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. या बोंडअळीचा जीवनक्रम हंगामपूर्व कापूस लागवड झाल्यामुळे खंडीत न झाल्याने पुर्नउत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढत आहे. हा अनुभव लक्षात घेता खरीप २०१९ मध्ये गुलाबी बोंडअळीला आळा घालावयाचा असल्याने या अळीचा जीवनक्रम खंडीत होण्यासाठी उपाययोजना म्हणून कापसाची हंगामपूर्व लागवड होणार नाही, यादृष्टीने कृषी विभागाकडून काळजी घेण्यात आली. तसेच शेतकºयांना धूळ पेरणी न करता किमान ६५ मिमी (पुरेसा) पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन केले. अर्थात अनेक शेतकºयांनी या आवाहनाला न जुमानताच काही भागात पेरणी उरकून टाकली आहे. याठिकाणी टँकरने पाणी देऊन कापूस जगविण्याची वेळ आली आहे.तर उडीद, मूगाऐवजी मका, तुरीचे क्षेत्र वाढणारकृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उडीद, मूग लागवड ७ जुलैच्या आत पुुरेसा पाऊस झाला तरच करता येणार आहे. त्यानंतर उडीद, मुगाची लागवड करता येणार नाही. त्यातही उत्पादनात घट होण्याची भिती राहील. आधीच यंदा मूगाच्या क्षेत्रात ७ टक्के तर उडीदाच्या क्षेत्रात १६ टक्के घट होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. मूगाचे सरासरी क्षेत्र ३२ हजार ३३८ हेक्टर असताना यंदा ३० हजार हेक्टरवर तर उडीदाचे सरासरी क्षेत्र ३५ हजार ७८० हेक्टर असताना यंदा ३० हजार हेक्टरवरच लागवड होण्याचा अंदाज होता.कापसाच्या उत्पादनावरही परिणाम७ जुलैपर्यंत पुरेसा पाऊस न झाल्यास कापूस लागवड केली तरीही उत्पानात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन आठवड्यात पेरणीयोग्य पावसाची शेतकºयांना प्रतीक्षा आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव