शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

तीन आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस न आल्यास अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 13:04 IST

उडीद-मूग, ज्वारी होणार बाद : सोयाबीन, मका, तुरीचे क्षेत्र वाढणार

जळगाव : यंदा विविध कारणांनी जिल्ह्यात पावसाचे आगमन लांबले असून तीन आठवड्यात पेरणी योग्य पावसाने हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांपुढील अडचणीत वाढ होणार आहे. उडीद, मूग, ज्वारीऐवजी सोयाबीन, मका, तुरीची लागवड करावी लागणार आहे. याशिवाय उत्पादनातही घट येण्याची भिती असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.जिल्ह्यात यंदा गत १५ वर्षातील गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचीच चिंता असल्याने पावसाची प्रतीक्षा होत असताना जिल्ह्यात पावसाचे आगमन मात्र विविध कारणांनी लांबले आहे.एरव्ही ७ जूनच्या आसपास पाऊस हजेरी लावतो. त्यामुळे शेतकरी तातडीने पेरण्या आटोपून घेतात. मात्र यंदा विविध कारणांनी पावसाचे आगमन लांबले आहे. तर शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचा जीवनक्रम खंडीत न झाल्याने कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. या बोंडअळीचा जीवनक्रम हंगामपूर्व कापूस लागवड झाल्यामुळे खंडीत न झाल्याने पुर्नउत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढत आहे. हा अनुभव लक्षात घेता खरीप २०१९ मध्ये गुलाबी बोंडअळीला आळा घालावयाचा असल्याने या अळीचा जीवनक्रम खंडीत होण्यासाठी उपाययोजना म्हणून कापसाची हंगामपूर्व लागवड होणार नाही, यादृष्टीने कृषी विभागाकडून काळजी घेण्यात आली. तसेच शेतकºयांना धूळ पेरणी न करता किमान ६५ मिमी (पुरेसा) पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन केले. अर्थात अनेक शेतकºयांनी या आवाहनाला न जुमानताच काही भागात पेरणी उरकून टाकली आहे. याठिकाणी टँकरने पाणी देऊन कापूस जगविण्याची वेळ आली आहे.तर उडीद, मूगाऐवजी मका, तुरीचे क्षेत्र वाढणारकृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उडीद, मूग लागवड ७ जुलैच्या आत पुुरेसा पाऊस झाला तरच करता येणार आहे. त्यानंतर उडीद, मुगाची लागवड करता येणार नाही. त्यातही उत्पादनात घट होण्याची भिती राहील. आधीच यंदा मूगाच्या क्षेत्रात ७ टक्के तर उडीदाच्या क्षेत्रात १६ टक्के घट होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. मूगाचे सरासरी क्षेत्र ३२ हजार ३३८ हेक्टर असताना यंदा ३० हजार हेक्टरवर तर उडीदाचे सरासरी क्षेत्र ३५ हजार ७८० हेक्टर असताना यंदा ३० हजार हेक्टरवरच लागवड होण्याचा अंदाज होता.कापसाच्या उत्पादनावरही परिणाम७ जुलैपर्यंत पुरेसा पाऊस न झाल्यास कापूस लागवड केली तरीही उत्पानात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन आठवड्यात पेरणीयोग्य पावसाची शेतकºयांना प्रतीक्षा आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव