शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

रावेर तालुक्यातील उटखेडासह परिसरात शेतकऱ्यांचे पाण्यासाठी वेगवेगळे प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 16:16 IST

उटखेडा, ता. रावेर , जि.जळगाव : गेल्या तीन वर्षांपासूून पुरेसा पाऊस नसल्याने पाण्यासाठी शेतकºयांच्या दाही दिशा फिरून झाल्यानंतर दुष्काळात ...

ठळक मुद्देकेळी बागा वाचवण्यासाठी शेतकºयांची धडपडउत्पादन खर्चही निघणे झाले अवघडअनेक व्यावसायिक जमिनीत उभी बोअर खोदणारी महागडी जंत्रे घेऊन दाखल

उटखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : गेल्या तीन वर्षांपासूून पुरेसा पाऊस नसल्याने पाण्यासाठी शेतकºयांच्या दाही दिशा फिरून झाल्यानंतर दुष्काळात सापडलेला शेतकरी आता पाण्यासाठी भूगर्भाची खोली पाहताना दिसत आहे.पाण्यावर अवलंबून असलेल्या शेती व्यवसायासाठी शेतकरी सातत्याने पाण्याच्या शोधात राहिला आहे .परंतु गेली तीन -चार वर्षे पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतच पाणी राहिले नाही. तरीही शेतकरी पाण्याच्या शोधात वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. मात्र त्याचा सगळेच गैरफायदा घेत असल्याने बुडत्या शेतकºयांचा पाय अधिकच अडचणीत जाताना दिसत आहे.शेतकरी पाण्याच्या शोधात असल्याचे पाहून उत्तर प्रदेशातील अनेक व्यावसायिक जमिनीत उभी बोअर खोदणारी महागडी जंत्रे घेऊन डिसेंबरमध्येच दाखल झाले आहेत. या यंत्राच्या एक फुट खोदाईस १२५ ते १५० रुपये मोजावे लागतात. या भागातील पाण्याची पातळी २०० फुटापेक्षा जादा खोल असली व ही खोदाई एवढी महागडी असली तरीही शेतकरी लाखो रुपये खर्चून नशिबाची परीक्षा घेताना दिसत आहेत. या बोअरमध्ये शेतकºयास पाणी मिळो न मिळो, त्यांची संपूर्ण रक्कम मोजावीच लागते. विशेष म्हणजे या व्यवहारात कसलीही सूट मिळत नाही. विहिरीच्या भिंतीत आडवे बोअर घेण्याचाही प्रयोग शेतकरी मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे.नवीन विहीर खोदणे तर सर्वसामान्य शेतकºयांच्या आवाक्याबाहेर होऊन बसले आहे. या कामासाठी मजुरांना ३५० ते ४०० रुपये मंजुरी द्यावी लागत आहे, तर विहिरीतील खोदलेले दगड बाहेर काढणाºया बैलजोडीला दररोज किमान ८०० रुपये मोजावे लागत आहेत. शेतकºयांच्या या परिस्थितीत जमिनीतील पाण्याचा वर अंदाज देणारे (पानाडी) नारळाचा आधार घेतात, तर कोणी रक्तगटाच्या आधारे जमिनीतील पाण्याचा अंदाज वर्तवीत आहेत. शेतकरी जमिनीत पाणी नसताना देवाला नवस (साकडे) घालूून भूगर्भातील पाण्याची खोली शोधत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRaverरावेर