शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

रावेर तालुक्यातील उटखेडासह परिसरात शेतकऱ्यांचे पाण्यासाठी वेगवेगळे प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 16:16 IST

उटखेडा, ता. रावेर , जि.जळगाव : गेल्या तीन वर्षांपासूून पुरेसा पाऊस नसल्याने पाण्यासाठी शेतकºयांच्या दाही दिशा फिरून झाल्यानंतर दुष्काळात ...

ठळक मुद्देकेळी बागा वाचवण्यासाठी शेतकºयांची धडपडउत्पादन खर्चही निघणे झाले अवघडअनेक व्यावसायिक जमिनीत उभी बोअर खोदणारी महागडी जंत्रे घेऊन दाखल

उटखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : गेल्या तीन वर्षांपासूून पुरेसा पाऊस नसल्याने पाण्यासाठी शेतकºयांच्या दाही दिशा फिरून झाल्यानंतर दुष्काळात सापडलेला शेतकरी आता पाण्यासाठी भूगर्भाची खोली पाहताना दिसत आहे.पाण्यावर अवलंबून असलेल्या शेती व्यवसायासाठी शेतकरी सातत्याने पाण्याच्या शोधात राहिला आहे .परंतु गेली तीन -चार वर्षे पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतच पाणी राहिले नाही. तरीही शेतकरी पाण्याच्या शोधात वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. मात्र त्याचा सगळेच गैरफायदा घेत असल्याने बुडत्या शेतकºयांचा पाय अधिकच अडचणीत जाताना दिसत आहे.शेतकरी पाण्याच्या शोधात असल्याचे पाहून उत्तर प्रदेशातील अनेक व्यावसायिक जमिनीत उभी बोअर खोदणारी महागडी जंत्रे घेऊन डिसेंबरमध्येच दाखल झाले आहेत. या यंत्राच्या एक फुट खोदाईस १२५ ते १५० रुपये मोजावे लागतात. या भागातील पाण्याची पातळी २०० फुटापेक्षा जादा खोल असली व ही खोदाई एवढी महागडी असली तरीही शेतकरी लाखो रुपये खर्चून नशिबाची परीक्षा घेताना दिसत आहेत. या बोअरमध्ये शेतकºयास पाणी मिळो न मिळो, त्यांची संपूर्ण रक्कम मोजावीच लागते. विशेष म्हणजे या व्यवहारात कसलीही सूट मिळत नाही. विहिरीच्या भिंतीत आडवे बोअर घेण्याचाही प्रयोग शेतकरी मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे.नवीन विहीर खोदणे तर सर्वसामान्य शेतकºयांच्या आवाक्याबाहेर होऊन बसले आहे. या कामासाठी मजुरांना ३५० ते ४०० रुपये मंजुरी द्यावी लागत आहे, तर विहिरीतील खोदलेले दगड बाहेर काढणाºया बैलजोडीला दररोज किमान ८०० रुपये मोजावे लागत आहेत. शेतकºयांच्या या परिस्थितीत जमिनीतील पाण्याचा वर अंदाज देणारे (पानाडी) नारळाचा आधार घेतात, तर कोणी रक्तगटाच्या आधारे जमिनीतील पाण्याचा अंदाज वर्तवीत आहेत. शेतकरी जमिनीत पाणी नसताना देवाला नवस (साकडे) घालूून भूगर्भातील पाण्याची खोली शोधत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRaverरावेर