शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

लोकशाहीच्या नावाने देशात हुकूमशाही, काँग्रेस नेत्यांचा भाजपवर हल्लाबोल

By सुनील पाटील | Updated: April 1, 2023 18:52 IST

कॉग्रेसचा आरोप : सरकारचे अपयश जनतेसमोर मांडणार

जळगाव : सध्या देशात लोकशाहीच्या नावाने हुकूमशाही राबविली जात असून स्वायत्त संस्थांचा वापर करुन विरोधकांची अडवणूक केली जात आहे. राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करणे हा देखील त्यातलाच एक भाग आहे, मात्र यातूनच काँग्रेस पक्ष अनेक राहूल निर्माण सरकारचा चेहरा व अपयश जनतेसमोर मांडणार असल्याचे कॉग्रेसचे जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोज चौधरी व निरीक्षक संदीप घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

अविचाराने केलेली नोटबंदी, वाढती महागाई, धार्मिक विद्वेष, भडकाऊ भाषणे,जाती-जातीत धर्मा- धर्मात निर्माण केली जाणारी दरी यातून जनतेचे नुकसान होत आहे. हेच मुद्दे जनतेपर्यंत पोहचवले जाणार आहेत. राहूल गांधी यांनी 'भारत जोडो' यात्रा काढून देशभरातील समाजमन ढवळून काढले व देशपातळीवर जे मुलभूत प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांची उत्तरे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान देऊ शकत नाहीत म्हणून प्रमुख प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी 'वेगवेगळे 'स्टंट' करून देशातील जनतेची दिशाभूल सुरू आहे. संसदेत ७ फेब्रुवारी रोजी अदानी समुहाच्या घोटाळ्याशी संबंधीत चौकशीची मागणी, अदानी-मोदी संबंध काय ? ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांग्लादेशात अदनीचा मोदींसोबतचा प्रवास व टेंडर अदानीला मिळावे असा पंतप्रधानांचा दबाव याचा पुरावा सादर करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बोलू द्यायचे नाही असे ठरवून त्यांच्या जुन्या वक्तव्याचा विपर्यास करुन 'न्यायव्यवस्थेचा' गुजरात पॅटर्न वापरून राहूल गांधी यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. तसेच काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचेही वक्तव्य लोकसभेच्या अधिवेशन काळातील कामकाजातून वगळून लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप चौधरी व घोरपडे यांनी केला.

टॅग्स :Jalgaonजळगावcongressकाँग्रेसBJPभाजपा