शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीच्या नावाने देशात हुकूमशाही, काँग्रेस नेत्यांचा भाजपवर हल्लाबोल

By सुनील पाटील | Updated: April 1, 2023 18:52 IST

कॉग्रेसचा आरोप : सरकारचे अपयश जनतेसमोर मांडणार

जळगाव : सध्या देशात लोकशाहीच्या नावाने हुकूमशाही राबविली जात असून स्वायत्त संस्थांचा वापर करुन विरोधकांची अडवणूक केली जात आहे. राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करणे हा देखील त्यातलाच एक भाग आहे, मात्र यातूनच काँग्रेस पक्ष अनेक राहूल निर्माण सरकारचा चेहरा व अपयश जनतेसमोर मांडणार असल्याचे कॉग्रेसचे जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोज चौधरी व निरीक्षक संदीप घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

अविचाराने केलेली नोटबंदी, वाढती महागाई, धार्मिक विद्वेष, भडकाऊ भाषणे,जाती-जातीत धर्मा- धर्मात निर्माण केली जाणारी दरी यातून जनतेचे नुकसान होत आहे. हेच मुद्दे जनतेपर्यंत पोहचवले जाणार आहेत. राहूल गांधी यांनी 'भारत जोडो' यात्रा काढून देशभरातील समाजमन ढवळून काढले व देशपातळीवर जे मुलभूत प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांची उत्तरे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान देऊ शकत नाहीत म्हणून प्रमुख प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी 'वेगवेगळे 'स्टंट' करून देशातील जनतेची दिशाभूल सुरू आहे. संसदेत ७ फेब्रुवारी रोजी अदानी समुहाच्या घोटाळ्याशी संबंधीत चौकशीची मागणी, अदानी-मोदी संबंध काय ? ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांग्लादेशात अदनीचा मोदींसोबतचा प्रवास व टेंडर अदानीला मिळावे असा पंतप्रधानांचा दबाव याचा पुरावा सादर करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बोलू द्यायचे नाही असे ठरवून त्यांच्या जुन्या वक्तव्याचा विपर्यास करुन 'न्यायव्यवस्थेचा' गुजरात पॅटर्न वापरून राहूल गांधी यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. तसेच काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचेही वक्तव्य लोकसभेच्या अधिवेशन काळातील कामकाजातून वगळून लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप चौधरी व घोरपडे यांनी केला.

टॅग्स :Jalgaonजळगावcongressकाँग्रेसBJPभाजपा