शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

धुळे : साक्री तालुक्यात शेतक-यांची प्रोड्युसर कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 09:03 IST

पिंपळनेर : साक्री पश्चिम पट्ट्यातील ३५ गावांमधील एक हजार शेतक-यांचा समावेश

विशाल गांगुर्डे /पिंपळनेर - साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ३५ गावांमधील एक हजार शेतकºयांना एकत्रित आणून ‘देशबंधू अ‍ॅग्रो रिसोर्स सेंटर प्रोड्युसर कंपनी लि.’ पिंपळनेर येथे स्थापन करण्यात आली आहे. कंपनीने चौथ्या वर्षात पदार्पण केले असून गहु, मका, कांदा, सोयाबीन व भात या मुख्य पिकाचे विक्रमी उत्पादन होत आहे. शेतकरी कंपनीसाठी देशबंधू अ‍ॅण्ड मंजु गुप्ता फाउंडेशनने १० लाखाचे बिनव्याजी भांडवल उपलब्ध करुन दिले आहे. अशा पद्धतीने १५ लाख रुपये जमा करुन शेतक-यांनी कंपनी स्थापन केली आहे. यात ११ संचालक असून ३५ गावातील एक हजार शेतकरी सभासद आहेत.

कंपनीच्या अध्यक्षपदी चैत्राम देवचंद पवार तर उपाध्यक्ष संभाजीराव दशरथ काकुस्ते आहेत. प्रत्येक संचालकाकडे १०० सभासद सदस्य आहेत. यांचे कार्य शेतक-यांच्या कृषीविषयक गरजा पूर्ण करणे हे राहणार आहे. सभासदांना या कंपनीच्या माध्यमातून योग्य नफा मिळावा हा उद्देश ठेवण्यात आला आहे. एक हजार सभासद कंपनीच्या माध्यमातून शेती करीत असून सुमारे १६०० हेक्टर शेतीवर कंपनीचे नियोजन व नियंत्रण आहे.

३५ गावांमध्ये वेळोवेळी मेळावा, कृषी जलस्त्रोत विकास, पशुसंवर्धन कौशल्य प्रशिक्षण, महिला सबलीकरण, आरोग्य व शिक्षण या घटकांवर काम करणे राहणार आहे. तसेच शेतीची सर्व तांत्रिक माहिती दिली जाते. ग्रुप फॉर्मिंग (गटशेती), कॉण्ट्रॅक्ट फार्मिंग शेतीचे मार्गदर्शन करून कंपनीच्यावतीने एक हजार शेतकºयांव्यतिरिक्त भात, मका, बियाणे, भाजीपाला, बियाणे, रासायनिक फवारे, खते उपलब्ध करुन देणे, तेही कमी किंमतीत, वर्षभरात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. सभासद शेतक-यांना संपूर्ण कृषी मार्गदर्शन कंपनी करते. यासह शेतीचे सर्व साहित्य हे वाजवी दरात बाजारभावापेक्षा अधिक स्वस्त मिळतात. कंपनी कायदा २०१३ प्रमाणे कंपनीची स्थापना झाली आहे. शेतकºयांना योग्यवेळी योग्य पैसा, नफा मिळावा हा उद्देश ठेवण्यात आला आहे.इन्फो१) कंपनी ३ वर्षापासून काम करीत असल्याने सध्या सर्व शेती उत्पादन घेण्यात येते. उत्पादित मालाला मार्केट मिळवून देण्यासाठी यंदा कंपनीने ९६० किलो तांदुळ नांदेडला पाठवला आहे. एक-एक किलोची पॅकिंग करून खरेदीदारांना नमुना म्हणून पाठविण्यात आला आहे. तर काही तांदूळ निर्यातही झाला आहे. यात इंद्रायणी, खुशबू, सुकवेल, बासमती अशा सुवासिक जातींचा समावेश आहे.२) या कंपनीचे मुख्य पीक भात आहे. एक हजार शेतकºयांना शासनाच्या योजनांची माहिती देणे, पीक पहाणी कार्यक्रम राबविणे, वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन वर्षभराचा आढावा देणे तसेच सध्या कल्याण येथील ‘शॉप फॉर चेंज’ येथे तांदूळ विक्रीसाठी जात आहे. तसेच भाजीपाला उत्पादन घेतले जात आहे.३) या प्रोड्युसर कंपनीला वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी भेट देत असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेता अतुल कुलकर्णी यांनीही भेट दिली होती. सध्या संस्थेचे राज्य समन्वयक रावसाहेब बडे यांचे सहकार्य लाभत आहे.शेतकरी हिताची त्रिसूत्रीआदिवासी गरजू व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची आर्थिक प्रगती व्हावी, त्यांचे जीवनमान उंचावे, तसेच गरजू शेतक-यांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ मिळावे, शेतीला लागणा-या सर्व प्रकारच्या निविष्ठा वेळेवर उत्तम प्रतीच्या व वाजवी दरात उपलब्ध व्हाव्यात, ही त्रिसूत्री घेऊन पश्चिम पट्ट्यातील एक हजार शेतक-यांना एकत्रित आणून प्रत्येकी ५०० रुपये भागभांडवल जमा करण्यात आले.

 

टॅग्स :Farmerशेतकरी