शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

धुळे, जळगावकरांवर पश्चातापाची वेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:20 PM

केंद्रात भाजपा, राज्यात भाजपा म्हणून आपल्या शहरातही भाजपाला सत्ता दिली तर विकासाची सुसाट एक्सप्रेस धावेल, या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. सत्ता परिवर्तन झाले. प्रचारकी थाटाला नागरिक भुलले आणि सहा महिन्यात वास्तव समोर आले. महापालिकेत पक्ष बदलला, पण कारभारी तेच राहिले. मानसिकतादेखील तीच आहे. मग काय डोंबल्याचा विकास होणार आहे? मोजक्या १५-२० घराण्यांमध्ये दोन्ही शहरांची सत्ता केंद्रित झाली आहे.

ठळक मुद्देजनता जेव्हा विश्वासाने सत्ता सोपविते, तेव्हा जनतेच्या आशा-आकांक्षांना सर्वोच्च प्राधान्य देणे अपेक्षित आहे. जनतेच्या सहकार्याने सत्ता परिवर्तन झालेले आहे, त्यात आपला वाटा हा निमित्तमात्र आहे, हे लक्षात घेण्यात राजकीय पक्ष कमी पडतात. सत्ता आल्यावर पक्षीय, महापालिकेत भाजपाला पूर्ण बहुमत देऊनही विकासाची गाडी काही धावेना ; मतभेद, हेवेदाव्यांमुळे खोडा केंद्र व राज्य सरकारकडून निधी आणून नियोजन करण्यात अपयशी ठरतायत भाजपाचे पदाधिकारी

मिलिंद कुलकर्णीखान्देशातील शेजारी असलेली शहरे नाशिक, औरंगाबादचा गेल्या १५-२० वर्षांमध्ये झालेला विकास पाहून चकित व्हायला होते. आपल्या शहरांचा असा विकास का होत नाही, असा विचार प्रत्येक नागरिकाच्या मनात येतो. समान विचाराच्या पक्षाची सत्ता सर्वत्र असेल तर विकास होईल, या अपेक्षेने धुळे व जळगावकरांनी महापालिकेची सूत्रे भाजपाकडे दिली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोन्ही शहरांचे पालकत्व स्विकारले. सत्तेचा अनुभव नसलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना नगरसेवक केल्यास शहराचा विकास गतीने होणार नाही, म्हणून इतर पक्षातील सत्तेचा अनुभव असलेल्या मातब्बर नगरसेवकांना पक्षात घेऊन सत्ता मिळविली. जळगावात सहा महिने तर धुळ्यात दोन महिने झाले तरी विकास गंगा काही वाहताना दिसत नाही. त्यामुळे नागरिक चिंतीत झाले आहेत. राज्य सरकारने प्रत्येकी १०० कोटी रुपये दोन्ही शहरांना देऊ केले आहे. पण सहा महिन्यात त्यापैकी एक नया पैसा आणता आलेला नाही. २०१९ मध्ये तब्बल सहा महिने आचारसंहितेत जाणार आहेत. आता दोन महिने उलटले आहेत. ते पाहता यंदा विकास होण्याची शक्यता धूसर वाटायला लागली आहे. याच पध्दतीने जर महापालिकेचा कारभार राहिला तर येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनता भाजपाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.अडचण अशी आहे की, सत्ता आली तरी सर्वच पक्षांमधून भाजपामध्ये आलेल्या महत्वाकांक्षी नगरसेवकांना एक सुत्रात गुंफण्याचे कौशल्य असलेला ताकदीचा नेता दोन्ही शहरांमध्ये भाजपामध्ये नाही. गिरीश महाजन यांना राज्याचे प्रश्न पहायचे की, खान्देशचे असा पेच पडला आहे. त्यामुळे सत्तेची घडी काही नीट बसत नाही, हे वास्तव आहे.जेव्हा कामे होत नाही, तेव्हा जनतेचे लक्ष वळविण्यासाठी नवे हातखंडे वापरले जातात, हा राजकारणातील जुना नियम आहे. सध्या भाजपाकडून हेच सुरु आहे. महापालिकेची सतरा मजली इमारत अनधिकृत आहे, तिचे मजले पाडू, पाच हजार गाळेधारकांना मदत करण्यासाठी पाच लाख करदात्या नागरिकांच्या अहिताचा निर्णय घेणे, नवी वीट रचली जात नसताना लोकसहभागातून उभारलेली ३० वर्षे जुनी पाणपोई उध्वस्त करणे, ही मानसिकता विधायकतेपेक्षा विध्वंसाकडे नेणारी आहे. इतिहासात डोकावले तरी अशा विध्वंसक विचारसरणीचे काय होते, हे लक्षात येते.खरे म्हणजे, महापालिकेकडे उपलब्ध निधी, सामग्री, मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करुन नागरिकांच्या दैनंदिन मुलभूत सोयींसाठी प्रयत्न केले तरी खूप झाले असे नागरिक म्हणतील. पण दुर्देव असे आहे की, वैयक्तीक महत्वाकांक्षेसाठी महापालिका आणि शहराचा बळी देण्याचा विचार होत असल्याने समस्या उद्भवली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव