शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

जळगाव जिल्ह्यातील ११५ गावांमधील ३८५२ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 10:48 PM

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पंचनामे सुरू

ठळक मुद्दे८ तालुक्यांना बसला तडाखा रावेर, मुक्ताईनगरला सर्वाधिक नुकसान

जळगाव: जून महिन्याला प्रारंभ होताच मान्सूनपूर्व पाऊस व वादळाचातडाखा जिल्ह्यातील ८ तालुक्यांना बसला असून २,३, ५ व ६ जून या चारच दिवसांत जिल्ह्यातील ११५ गावांमधील ४७८९ शेतकºयांचे ३८५२ हेक्टरवरील पीक व फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यात रावेर व मुक्ताईनगरला सर्वाधिक नुकसान झाले असून पंचनाम्यांना सुरूवात झाली आहे. दरम्यान ६ रोजी जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील झालेल्या नुकसानीची आकडेवारी प्रशासनाकडे गुरूवार, ७ रोजी सायंकाळपर्यंत प्राप्त झालेली नव्हती.जिल्ह्यात २ जून रोजी मान्सूनपूर्व पाऊस व वादळी वाºयांनी यावल, चोपडा, भडगाव, चाळीसगाव या भागात तडाखा बसला. त्यानंतर ३ जून रोजी चोपडा, पाचोरा तालुक्यांना, ५ जून रोजी रावेर, यावल तर ६ रोजी रावेर,मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यांना वादळी वारा व पावसाचा जोरदार फटका बसला. याखेरीज भुसावळ,जळगाव व इतर तालुक्यांनाही फटका बसला. मात्र त्याची आकडेवारी प्रशासनाकडे सायंकाळपर्यंत प्राप्त झालेली नव्हती.रावेर, मुक्ताईनगरला सर्वाधिक नुकसानरावेर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील ३२ गावांमधील २०४० शेतकºयांचे १९५२ हेक्टरवरील केळी पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्या पाठोपाठ मुक्ताईनगर तालुक्यात ३२ गावांमधील २१५२ शेतकºयांचे १५५६ हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. यावल तालुक्यात १८ गावांमधील २२६ शेतकºयांच्या १५८.५० हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. बोदवड तालुक्यातील ७ गावांमधील ३० शेतकºयांचे २१.५ हेक्टर कागदी लिंबू व ४.५ हेक्टर वरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. चोपडा तालुक्यातील १० गावांमधील १४२ शेतकºयांचे ८६ हेक्टर केळीचे तर भडगाव तालुक्यातील ४ गावांमधील ३१ शेतकºयांचे २५ हेक्टर केळी व २ हेक्टर कागदी लिंबूचे, चाळीसगाव तालुक्यातील ६ गावांमधील १२३ शेतकºयांचे ४३.६२ हेक्टर केळी व १५.४४ हेक्टर लिंबू, १२ हेक्टर फळबागांचे असे ७१.०६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. तर पाचोरा तालुक्यात ६ गावांमधील ४५ शेतकºयांचे १६ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे.जिल्हाधिकाºयांनी केली पाहणीजिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी गुरूवारी भुसावळ तालुक्यातील तसेच रावेर तालुक्यातील काही नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. त्यानुसार विमा कंपनी, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग व कृषी विभागामार्फत एकत्रितपणे पंचनामे सुरू झाले आहेत.वादळीवारे व पावसामुळे २ जून पासून आतापर्यंत नुकसानगावे शेतकरी पिके व क्षेत्र (हेक्टर)यावल १८ २२६ १५८.५० (केळी)रावेर ३२ २०४० १९५२ (केळी)बोदवड ७ ३० २६ (कागदी लिंबू व केळी)मुक्ताईनगर ३२ २१५२ १५५६ (केळी)चोपडा १० १४२ ८६ (केळी)भडगाव ४ ३१ २७(केळी व लिंबू)चाळीसगाव ६ १२३ ७१.०६(केळी, लिंबू व फळबाग)पाचोरा ६ ४५ १६ (केळी)एकूण ११५ ४७८९ ३८९२.५६