शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
MNS Morcha: मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
4
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
5
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
6
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
7
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
8
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
9
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
10
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
11
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
12
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
13
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
14
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
15
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
16
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
17
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
18
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
19
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
20
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

ममुराबाद परिसरात डेरेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST

वन विभाग सुस्त: लाकूडतोडे, वखार चालकांना नाही धाक लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद: परिसरात निंब, भोकर, आंबा, चिंच, पिंपळ तसेच ...

वन विभाग सुस्त: लाकूडतोडे, वखार चालकांना नाही धाक

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद: परिसरात निंब, भोकर, आंबा, चिंच, पिंपळ तसेच बाभळीसारख्या डेरेदार वृक्षांची सर्रास कत्तल सुरू असून, वन विभागाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने लाकूडतोड्यांसह वखार चालकांना कायद्याचा कोणताच धाक आता राहिलेला नाही. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी त्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

झाडे कोणाचीही व कोणतीही असो, ती तोडायची म्हटल्यास वन विभागाची रीतसर परवानगी घ्यावी लागते. विनापरवानगी झाडे तोडल्यास तो गुन्हा समजला जातो. कायद्याने संबंधिताला शिक्षासुद्धा होते. स्वत:च्या मालकीची झाडेही विनापरवानगी तोडता येत नाहीत. महाराष्ट्र शासनाने फेलिंग ट्री (रेग्युलेशन) अ‍ॅक्ट १९६४ अन्वये झाडे तोडणेबाबत कायदेशीर तरतूद केली आहे. याशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये खासगी जागेवरील कोणत्याही झाडांना मालकी हक्क असतानासुद्धधा विनापरवानगी तोडता येत नाहीत. मात्र, झाड मृत्यू पावले असेल किंवा वादळाने पडले असेल, झाडाचा वाहतुकीला अडथळा होत असेल, याशिवाय आग, वीज, वादळी पाऊस किंवा अन्य नैसर्गिक कारणाने झाडाची नासधूस झाली असेल किंवा शेती करण्यास झाडामुळे अडथळा निर्माण होत असेल, तरच झाड तोडण्याची परवानगी वृक्ष अधिकारी देऊ शकतो. अर्थात, जेवढी झाडे तोडली जात आहेत तेवढी झाडे अन्यत्र लावण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्याकडून दिले जातात.

विनापरवानगीने झाडे तोडली, तर कायद्याने गुन्हा आहेच; परंतु ती झाडे जप्त करण्याचा अधिकार वन विभागाला आहे. केवळ झाडेच नव्हे, तर त्या तोडलेल्या झाडांपासून बनवलेल्या वस्तूदेखील कायद्याने जप्त होऊ शकतात आणि वृक्ष तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होते. वृक्ष तोडण्याची परवानगी मागितल्यापासून साठ दिवसांत वृक्ष अधिकाऱ्याने काहीएक कळविले नाही किंवा निर्णय दिला नाही, तर त्याने परवानगी दिलेली आहे, असे समजणे ही तरतूद कायद्यात आहे. वृक्ष अधिकाऱ्याने परवानगी दिली नाही, तर ३० दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे. प्रत्यक्षात झाडे तोडणाऱ्यांकडून कोणतीच कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात नसल्याचे दिसून येेते.

-------------------

झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी

वृक्षतोडीबाबत कडक कायदा असताना अनेक वर्षे जुनी झाडे लाकूडतोडे व वखार चालकांकडून कत्तल केली जात आहेत. शेतीशिवारात झाडांची संख्या त्यामुळे दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. कोणतीच परवानगी न घेता रात्रंदिवस वृक्षतोड सुरू असतांना वन विभागानेही डोळ्यांवर कातडे ओढून घेतल्याचा आरोप होत आहे.

------------------------

फोटो-

ममुराबाद येथे वनविभागाच्या दुर्लक्षामुळे डेरेदार वृक्षांची सर्रास कत्तल सुरू असून, लाकूडतोडे व वखार चालकांनी कायदा अक्षरशः धाब्यावर बसवला आहे. (जितेंद्र पाटील)