शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ममुराबाद परिसरात डेरेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST

वन विभाग सुस्त: लाकूडतोडे, वखार चालकांना नाही धाक लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद: परिसरात निंब, भोकर, आंबा, चिंच, पिंपळ तसेच ...

वन विभाग सुस्त: लाकूडतोडे, वखार चालकांना नाही धाक

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद: परिसरात निंब, भोकर, आंबा, चिंच, पिंपळ तसेच बाभळीसारख्या डेरेदार वृक्षांची सर्रास कत्तल सुरू असून, वन विभागाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने लाकूडतोड्यांसह वखार चालकांना कायद्याचा कोणताच धाक आता राहिलेला नाही. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी त्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

झाडे कोणाचीही व कोणतीही असो, ती तोडायची म्हटल्यास वन विभागाची रीतसर परवानगी घ्यावी लागते. विनापरवानगी झाडे तोडल्यास तो गुन्हा समजला जातो. कायद्याने संबंधिताला शिक्षासुद्धा होते. स्वत:च्या मालकीची झाडेही विनापरवानगी तोडता येत नाहीत. महाराष्ट्र शासनाने फेलिंग ट्री (रेग्युलेशन) अ‍ॅक्ट १९६४ अन्वये झाडे तोडणेबाबत कायदेशीर तरतूद केली आहे. याशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये खासगी जागेवरील कोणत्याही झाडांना मालकी हक्क असतानासुद्धधा विनापरवानगी तोडता येत नाहीत. मात्र, झाड मृत्यू पावले असेल किंवा वादळाने पडले असेल, झाडाचा वाहतुकीला अडथळा होत असेल, याशिवाय आग, वीज, वादळी पाऊस किंवा अन्य नैसर्गिक कारणाने झाडाची नासधूस झाली असेल किंवा शेती करण्यास झाडामुळे अडथळा निर्माण होत असेल, तरच झाड तोडण्याची परवानगी वृक्ष अधिकारी देऊ शकतो. अर्थात, जेवढी झाडे तोडली जात आहेत तेवढी झाडे अन्यत्र लावण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्याकडून दिले जातात.

विनापरवानगीने झाडे तोडली, तर कायद्याने गुन्हा आहेच; परंतु ती झाडे जप्त करण्याचा अधिकार वन विभागाला आहे. केवळ झाडेच नव्हे, तर त्या तोडलेल्या झाडांपासून बनवलेल्या वस्तूदेखील कायद्याने जप्त होऊ शकतात आणि वृक्ष तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होते. वृक्ष तोडण्याची परवानगी मागितल्यापासून साठ दिवसांत वृक्ष अधिकाऱ्याने काहीएक कळविले नाही किंवा निर्णय दिला नाही, तर त्याने परवानगी दिलेली आहे, असे समजणे ही तरतूद कायद्यात आहे. वृक्ष अधिकाऱ्याने परवानगी दिली नाही, तर ३० दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे. प्रत्यक्षात झाडे तोडणाऱ्यांकडून कोणतीच कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात नसल्याचे दिसून येेते.

-------------------

झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी

वृक्षतोडीबाबत कडक कायदा असताना अनेक वर्षे जुनी झाडे लाकूडतोडे व वखार चालकांकडून कत्तल केली जात आहेत. शेतीशिवारात झाडांची संख्या त्यामुळे दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. कोणतीच परवानगी न घेता रात्रंदिवस वृक्षतोड सुरू असतांना वन विभागानेही डोळ्यांवर कातडे ओढून घेतल्याचा आरोप होत आहे.

------------------------

फोटो-

ममुराबाद येथे वनविभागाच्या दुर्लक्षामुळे डेरेदार वृक्षांची सर्रास कत्तल सुरू असून, लाकूडतोडे व वखार चालकांनी कायदा अक्षरशः धाब्यावर बसवला आहे. (जितेंद्र पाटील)