शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

एनएमएमएस शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 21:42 IST

जळगाव : आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण थांबू नये म्हणून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ...

जळगाव : आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षण थांबू नये म्हणून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) दिली जाते. मात्र, सन २०१३ पासून शेकडो विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नसल्याची बाब समोर आली असून अनेक पालकांनी याबाबत शिक्षण विभागात तक्रार केली आहे़महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत आठवीसाठी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत असते़ मात्र, सन २०१३ पासून बहुतांश विद्यार्थ्यांना अजूनही शिष्यवृत्तीच्या लाभाची प्रतीक्षा लागून आहे़ दुसरीकडे अनिल सोनवणे यांच्यासह काही पालकांनी नुकतीच माध्यमिक शिक्षण विभागात येवून दोन वर्षांपासून आपल्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याची तक्रार केली आहे़ एवढेच नव्हे तर काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे तीन ते चार हप्ता मिळाल्यानंतर शिष्यवृत्तीचं मिळालेली नाही़ म्हणजेच उच्च शिक्षण थांबू नये यासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती मिळत नसल्यामुळे गोरगरिब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून देखील वंचित राहण्याची वेळ नाकारता येत नाही़विद्यार्थ्यांची पाठविली माहितीपालकांनी केलेल्या तक्रारीनंतर माध्यमिक शिक्षण विभागाकडून शासनाला ती तक्रार कळविण्यात आली आहे़ त्यानुसार शासनाकडून विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाइन आणि आॅनलाइन पध्दतीने पाठविण्याच्या सूचना केल्या़ त्यानुसार दहावी, अकरावी व बारावीच्या ७४९ विद्यार्थ्यांची आॅनलाइन माहिती सादर करण्यात आली असून नववी, दहावी, अकरावी आणि बारावी अशा काही ८१५ विद्यार्थ्यांची पुणे येथे आॅफलाइन पध्दतीने माहितीने पाठविण्यात आली आहे़काय आहे योजनाआर्थिकदुष्टया दुर्बल घटकातील या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाला हातभार लागावा म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता आठवीत असताना विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येत असते़ त्यानंतर इयत्ता नववीपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लाभ मिळतो़ अर्थात योजनेत नववी ते बारावीपर्यंतच्या पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. म्हणजेचं दरमहा १ हजार रूपये दिले जाते़ सलग चार वर्षे ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्याला मिळते.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव