शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

चाळीसगावच्या दिंडीचे पंढरीच्या वाटेवर प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 16:42 IST

गेल्या ३० वर्षांपासून बेलदारवाडीच्या सिद्धेश्वर आश्रम ते पंढरपूर पायी जाणाऱ्या दिंडीने यंदाही सोमवारी सकाळी १० वाजता गावक-यांना वेशीवर प्रेमालिंग देत पंढरीकडे आगेकूच केली. यावेळी वारकरी आणि गावकरी यांना अश्रू अनावर झाले होते.

ठळक मुद्दे५०० वारकरी सहभागी ४० विद्यार्थीही विठूनामाच्या शाळेतबहुतांशी विद्यार्थी आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातीलयंदा हे दिंडीचे ८० वे वर्षवारकरी आणि गावकरी यांना अश्रू झाले अनावर

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : गेल्या ३० वर्षांपासून बेलदारवाडीच्या सिद्धेश्वर आश्रम ते पंढरपूर पायी जाणाऱ्या दिंडीने यंदाही सोमवारी सकाळी १० वाजता गावक-यांना वेशीवर प्रेमालिंग देत पंढरीकडे आगेकूच केली. यावेळी वारकरी आणि गावकरी यांना अश्रू अनावर झाले होते. मोठ्या भक्तीभावाने गावकऱ्यांनी दिंडीत सहभागी ३०० महिला व २०० पुरुष अशा ५०० वारकºयांना निरोप दिला.ज्ञानेश्वर माऊली यांच्या नेतृत्वाखाली निघणाºया दिंडीचे हे यंदाचे ३१वे वर्ष आहे. चाळीसगाव शहरातून गेल्या ७९ वषार्पासून निघणाºया कै.हभप मोतीराम महाराज यांच्या पायी दिंडीचे प्रस्थान मंगळवारी बलराम व्यायाम शाळेच्या पटांगणावरुन होणार आहे. गतवर्षाप्रमाणे यावषीर्ही दिंडीत ४० विद्यार्थ्यांसह एकूण ८५ वारकरी सहभागी होणार असल्याचे दिंडीचे प्रमुख हभप कृष्णा महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सिद्धेश्वर आश्रमात गेल्या १५ दिवसांपासून दिंडीचे नियोजन करण्यात येत होते. परिसरातील बहुतांशी वारकरी रविवारीच मुक्कामी सिद्धेश्वर आश्रमात पोहचले.सोमवारी पहाटेपासूनच आश्रमात वारकºयांची लगबग सुरू झाली होती. ज्ञानोबा - माऊलीचा गजरही सुरु होता. सर्व तयारी झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली यांनी वारकºयांना मार्गदर्शन केले. यावेळी बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील, युवा उद्योजक मंगेश चव्हाण, किशोर पाटील ढोमणेकर, भूषण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते. टाळ - मृदुंगाचा गजर आणि मुखी हरिनाम घेतपायी दिंडी खडकी बुद्रूक, तांबोळे, बोलठाण मार्गे २२ दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी पोहचणार आहेत. दिंडीच्या अग्रभागी पालखी असून यावर्षी पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता जलसाक्षतेवर दिंडी मार्गात प्रबोधन करण्यात येणार आहे. गेल्या काही वषार्पासून सामाजिक दायित्व म्हणून दिंडी मार्गात येणाºया गावातील ग्रामस्थांना उदबोधन केले जाते.यंदाचा दुष्काळ भयावह असून पाणीटंचाईची दाह मोठा आहे. दिंडीत यावरच प्रबोधन करुन झाडे लावण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. विठूरायाला दुष्काळाच्या आरिष्टातून महाराष्ट्र मुक्त होऊ दे, असे साकडे घालणार असल्याचे हभप ज्ञानेश्वर माऊली यांनी सांगितले.४० विद्यार्थी विठूनामाच्या शाळेत !‘विठ्ठल नामाची शाळा भरली... शाळा शिकताना तहान-भूक हरली...’ असं म्हणत चाळीसगावहून मंगळवारी पंढरपुरकडे प्रस्थान करणाºया कृष्णा महाराज यांच्या पायी दिंडीत यावर्षीदेखील ४० विद्यार्थी सहभागी होत आहे. गेल्या चार वर्षांपासून कृष्णा महाराज यांनी आपल्या शिवाजी चौकातील घरातच पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना आश्रय दिला आहे. यातील बहुतांशी विद्यार्थी आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील आहे. या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत वारकरी शिक्षणही दिले जाते. दरवर्षी तिसहून अधिक विद्यार्थी पंढरपुरची वारी करतात. यंदा हे दिंडीचे ८० वे वर्ष आहे. गेल्यावर्षी ४५ विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते.

टॅग्स :SchoolशाळाChalisgaonचाळीसगाव