शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

दीपज्योती नमोऽऽस्तुते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 21:53 IST

वसुबारस अर्थात सवत्स धेनू व्दादशीच्या शुभमुहुर्तावर गोमाता पूजन करून आपल्या कृषीप्रधान संस्कृतीचे जतन केले जाते आणि त्याच दिवसापासून दिवाळीबसणाला प्रारंभ केला जातो.

वसुबारस अर्थात सवत्स धेनू व्दादशीच्या शुभमुहुर्तावर गोमाता पूजन करून आपल्या कृषीप्रधान संस्कृतीचे जतन केले जाते आणि त्याच दिवसापासून दिवाळीबसणाला प्रारंभ केला जातो. गोपूजन, गो-संवर्धन, गोमूत्र, गोमय, पंचगव्य, गाईचे दूध, गोधन, गोग्रास व गोरक्षण या सर्वागिण विषयावर चिंतन करून पूज्य व उपयुक्त असणाऱ्या गोमातेचं पूजन करून गोधनाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस.नभांगणात आकाश कंदील लावून, पणत्या उजळवून, इलेक्ट्रिक दिव्यांच्या रोषणाईने आसमंत कसं प्रकाशमान भासतं. त्यातला भावार्थ म्हणजे प्रत्येकाने आपल्या मनात, विचारात व आचारातदेखील ज्ञानाचा, सद्बुध्दीचा, सदाचाराचा दीप उजळून अज्ञानाचा, अंधकार दूर सारावा. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात म्हटल्याप्रमाणे,दुरितांचे तिमिर जावो,विश्व स्वधर्म सूर्य पाहो!दिवाळी अर्थात प्रकाशोत्सव! दीप म्हणजे श्रीलक्ष्मीचे प्रतिक. सायंकाळी दीवा लावण्याच्या वेळेत लक्ष्मी येण्याची वेळ मानली जाते. याच कालावधीत सर्व मंदिरांमध्ये पहाटे काकड आरतीचा नित्यनेम असतो. नवीन कापडांचा केलेला मोठा काकडा नंतर नाजूकशा फुलवातीव्दारे केली जाणारी मंगल आरती, पहाट प्रसन्न व उत्साहीत करून जाते. त्यावेळी भगवंतांचे स्मरण असे केले जाते. ‘आनंदांची दीपावळी, घरी बोलवा वनमाळी, दारी घालीते रांगोळी, गोविंद गोविंद.’ त्याचप्रमाणे अध्यात्म सांगितले जाते.सुंदर माझ्या देहात, आत्मा हा नांदतो, चंद्र सूर्य दारात; गोविंद गोविंद.चंद्र, सूर्य संदर्भ म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे व सूर्य हा बुध्दीचा कारक आहे. श्रीमद् भागवत सुत्रानुसार,मन एवं मनुष्याणाम कारणम् बंधमोक्षयो।त्याचप्रमाणे दीप म्हणजे आरोग्याचेही प्रतिक. आयुर्वेद जनक धन्वंतरी देवता जयंती धनत्रयोदशीच! विश्व आरोग्य दिन पाळाला जातो.नरकासुरासारख्या अत्याचारी दृष्ट प्रवृत्तीच्या राजाचा, राक्षसाचा नाश करून भगवान श्रीकृष्णांनी बंदिवासातून मातांची मुक्तता केली, ती नरक चर्तुदशीलाच.श्री महालक्ष्मी व श्री महासरस्वती पूजनाचा आशय असा की, ज्ञानाने, शिक्षणाने परिपूर्ण होऊन संपत्ती प्राप्त करावी. परंतु त्यासाठी अपार कष्ट, त्याग याची तयारी ठेवावी लागेल. त्यासाठी स्वामी विवेकानंदांचे सुप्रसिध्द सुत्र महत्वाचे आहे.‘स्वयं दीप बनो’संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी देखील अभंगात म्हटले आहे,नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी.’विषमता, दरिद्रता, कलह, अराजकतेचा अंधार नाहीसा होवून, मनामनात समानतेची ज्योत लावण्याचा व प्रज्वलित करण्याचा हा दिवाळी सण सर्वांना सुख, समृध्दी व भरभराटीचा जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.- मुकुंद महाराज धर्माधिकारी, जळगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव