शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
2
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
3
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
4
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
6
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
7
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
8
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
9
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
10
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
12
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
13
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
14
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
15
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
16
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
17
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
18
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
19
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
20
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार

दीपज्योती नमोऽऽस्तुते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 21:53 IST

वसुबारस अर्थात सवत्स धेनू व्दादशीच्या शुभमुहुर्तावर गोमाता पूजन करून आपल्या कृषीप्रधान संस्कृतीचे जतन केले जाते आणि त्याच दिवसापासून दिवाळीबसणाला प्रारंभ केला जातो.

वसुबारस अर्थात सवत्स धेनू व्दादशीच्या शुभमुहुर्तावर गोमाता पूजन करून आपल्या कृषीप्रधान संस्कृतीचे जतन केले जाते आणि त्याच दिवसापासून दिवाळीबसणाला प्रारंभ केला जातो. गोपूजन, गो-संवर्धन, गोमूत्र, गोमय, पंचगव्य, गाईचे दूध, गोधन, गोग्रास व गोरक्षण या सर्वागिण विषयावर चिंतन करून पूज्य व उपयुक्त असणाऱ्या गोमातेचं पूजन करून गोधनाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस.नभांगणात आकाश कंदील लावून, पणत्या उजळवून, इलेक्ट्रिक दिव्यांच्या रोषणाईने आसमंत कसं प्रकाशमान भासतं. त्यातला भावार्थ म्हणजे प्रत्येकाने आपल्या मनात, विचारात व आचारातदेखील ज्ञानाचा, सद्बुध्दीचा, सदाचाराचा दीप उजळून अज्ञानाचा, अंधकार दूर सारावा. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात म्हटल्याप्रमाणे,दुरितांचे तिमिर जावो,विश्व स्वधर्म सूर्य पाहो!दिवाळी अर्थात प्रकाशोत्सव! दीप म्हणजे श्रीलक्ष्मीचे प्रतिक. सायंकाळी दीवा लावण्याच्या वेळेत लक्ष्मी येण्याची वेळ मानली जाते. याच कालावधीत सर्व मंदिरांमध्ये पहाटे काकड आरतीचा नित्यनेम असतो. नवीन कापडांचा केलेला मोठा काकडा नंतर नाजूकशा फुलवातीव्दारे केली जाणारी मंगल आरती, पहाट प्रसन्न व उत्साहीत करून जाते. त्यावेळी भगवंतांचे स्मरण असे केले जाते. ‘आनंदांची दीपावळी, घरी बोलवा वनमाळी, दारी घालीते रांगोळी, गोविंद गोविंद.’ त्याचप्रमाणे अध्यात्म सांगितले जाते.सुंदर माझ्या देहात, आत्मा हा नांदतो, चंद्र सूर्य दारात; गोविंद गोविंद.चंद्र, सूर्य संदर्भ म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे व सूर्य हा बुध्दीचा कारक आहे. श्रीमद् भागवत सुत्रानुसार,मन एवं मनुष्याणाम कारणम् बंधमोक्षयो।त्याचप्रमाणे दीप म्हणजे आरोग्याचेही प्रतिक. आयुर्वेद जनक धन्वंतरी देवता जयंती धनत्रयोदशीच! विश्व आरोग्य दिन पाळाला जातो.नरकासुरासारख्या अत्याचारी दृष्ट प्रवृत्तीच्या राजाचा, राक्षसाचा नाश करून भगवान श्रीकृष्णांनी बंदिवासातून मातांची मुक्तता केली, ती नरक चर्तुदशीलाच.श्री महालक्ष्मी व श्री महासरस्वती पूजनाचा आशय असा की, ज्ञानाने, शिक्षणाने परिपूर्ण होऊन संपत्ती प्राप्त करावी. परंतु त्यासाठी अपार कष्ट, त्याग याची तयारी ठेवावी लागेल. त्यासाठी स्वामी विवेकानंदांचे सुप्रसिध्द सुत्र महत्वाचे आहे.‘स्वयं दीप बनो’संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी देखील अभंगात म्हटले आहे,नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी.’विषमता, दरिद्रता, कलह, अराजकतेचा अंधार नाहीसा होवून, मनामनात समानतेची ज्योत लावण्याचा व प्रज्वलित करण्याचा हा दिवाळी सण सर्वांना सुख, समृध्दी व भरभराटीचा जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.- मुकुंद महाराज धर्माधिकारी, जळगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव