शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पातोंडा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 17:11 IST

नैराश्याने जीवन जगत असलेल्या एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देसततची नापिकी व डोक्यावर कर्जाचा होता बोजा

लोकमत न्यूज नेटवर्क

पातोंडा, ता. अमळनेर : सततच्या नापिकीमुळे व डोक्यावर कर्जाचा बोजा अशा हताश झालेल्या व नैराश्याने जीवन जगत असलेल्या एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव शांताराम बळीराम पवार असे आहे.

आत्महत्याग्रस्त शांताराम बळीराम पवार यांचेकडे तीन बिघे शेती आहे. गेल्या तीन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींमुळे शेती नापीक होऊन उत्पादन आले नाही. डोक्यावर सोसायटीचे अर्ध्या लाखाच्यावर पीक कर्ज, बाहेरील व्याजाचे व हात उसनवारीचे पैसे असे दोन लाखाच्या आसपासचे कर्ज कसे फेडायचे व संसाराचा गाडा कसा हाकायचा, अशा चिंतेत ते होते, अशी माहिती त्यांचे लहान भाऊ रत्नाकर पवार यांनी दिली.

दि. १ फेब्रुवारी सोमवारी सकाळी ते शेतात गेले. घरी जाऊन येतो, असे सांगून परत शेतातून घरी आले. आपल्या राहत्या घरी दुपारी १२ ते १ वाजेच्या च्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत त्यांचे लहान भाऊ रत्नाकर पवार यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात खबर दिलीआहे. त्याचे पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, दोन बहिणी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

 

टॅग्स :JalgaonजळगावagricultureशेतीFarmerशेतकरीSuicideआत्महत्या