शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मयत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अडकली जिल्हा बँकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 17:00 IST

वारसांची होतेय गैरसोय : पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही प्रश्न सुटेना

 

 

कासोदा- जिल्ह्यात जे शेतकरी मृत झाले आहेत, ते शासनाने कर्जमाफी देऊन देखील आजतागायत कर्जमुक्त झालेले नाहीत. पालकमंत्र्यांकडे हा विषय मांडण्यात आल्यानंतर देखील ही फाईल मात्र या कार्यालयातून त्या कार्यालयात फिरत असून कर्जमाफी मात्र होत नसल्याने मयतांचे वारस शासनाच्या मदतीपासून वंचीत आहेत. त्यांना नव्याने कर्ज देखील मिळत नसल्याने ऐन खरीपात त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून अनेक शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळाला. नव्याने कर्ज देखील मिळाले आहे. परंतू जिल्हाभरात जे शेतकरी मृत झाले आहेत,त्या शेतकºयांना मात्र कर्जमाफी मात्र झालेली नाही. त्यांच्या वारसांना मात्र कर्ज असल्याने विकासंस्थेत सभासद होता येत नाही की नव्याने कर्ज मिळत नसल्याने खरीपाच्या हंगामात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकट्या कासोद्यात कर्ज घेतलेल्या मयत शेतकºयांची संख्या ५६ एवढी आहे. ही संख्या तालुका व जिल्ह्याचा विचार करता मोठी आहे. परंतू हे सर्व शेतकरी कर्जमाफी होण्याची वाट पहात आहेत.हा प्रश्न कासोद्यातील शेतकºयांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे कासोदा दौºयावर आले असता त्यांच्याकडे मांडल्यावर त्यांनी लागलीच जळगाव येथील निबंधकांना हा प्रश्न आजच्या आज तातडीने निकाली काढा असे बजावले होते. त्यानंतर तातडीने चक्र फिरली, एरंडोलच्या सहाय्यक निबंधकांनी कासोदा विकासंस्थेत संपर्क करुन तातडीने अशा शेतकºयांची यादी मागवली. विकासंस्थेने या यादीत कर्जाचे आकडे तसेच मयतांचे नाव, वारसाचे नाव, वारसाचे बँक खाते इत्यादी आवश्यक माहिती या कार्यालयाकडे पाठवली. आता ही यादी जिल्हा बँकेकडे पाठवण्यात आली आहे, मात्र त्यावर कधी कार्यवाही होते, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागून आहे.जिल्हा बँकेचे अनेक संचालक आमदार व खासदार आहेत, जिल्हा बँकेने या प्रश्नी तातडीने निर्णय घ्यावा, ही अपेक्षा आहे. कारण यामुळे बँकेचाच जास्त फायदा आहे. यामुळे बँकेचा एनपीए कमी होण्यासाठी मदत होणार आहे. शेतकºयांच्या वारसांनापण मदत होणार आहे.- दीपक वाणी, चेअरमन विकासंस्था कासोदासंस्थेकडून यादी मिळाली आहे. हा फक्त कासोद्याचा विषय नसून जिल्हाभरातील मयत शेतकºयांचा आहे. लवकरच याबाबत बैठक होऊन तातडीने यावर कार्यवाही होईल.-सुभाष पाटील, विभागीय व्यवस्थापक जिल्हा बँक.