शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मयत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अडकली जिल्हा बँकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 17:00 IST

वारसांची होतेय गैरसोय : पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही प्रश्न सुटेना

 

 

कासोदा- जिल्ह्यात जे शेतकरी मृत झाले आहेत, ते शासनाने कर्जमाफी देऊन देखील आजतागायत कर्जमुक्त झालेले नाहीत. पालकमंत्र्यांकडे हा विषय मांडण्यात आल्यानंतर देखील ही फाईल मात्र या कार्यालयातून त्या कार्यालयात फिरत असून कर्जमाफी मात्र होत नसल्याने मयतांचे वारस शासनाच्या मदतीपासून वंचीत आहेत. त्यांना नव्याने कर्ज देखील मिळत नसल्याने ऐन खरीपात त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून अनेक शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळाला. नव्याने कर्ज देखील मिळाले आहे. परंतू जिल्हाभरात जे शेतकरी मृत झाले आहेत,त्या शेतकºयांना मात्र कर्जमाफी मात्र झालेली नाही. त्यांच्या वारसांना मात्र कर्ज असल्याने विकासंस्थेत सभासद होता येत नाही की नव्याने कर्ज मिळत नसल्याने खरीपाच्या हंगामात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकट्या कासोद्यात कर्ज घेतलेल्या मयत शेतकºयांची संख्या ५६ एवढी आहे. ही संख्या तालुका व जिल्ह्याचा विचार करता मोठी आहे. परंतू हे सर्व शेतकरी कर्जमाफी होण्याची वाट पहात आहेत.हा प्रश्न कासोद्यातील शेतकºयांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे कासोदा दौºयावर आले असता त्यांच्याकडे मांडल्यावर त्यांनी लागलीच जळगाव येथील निबंधकांना हा प्रश्न आजच्या आज तातडीने निकाली काढा असे बजावले होते. त्यानंतर तातडीने चक्र फिरली, एरंडोलच्या सहाय्यक निबंधकांनी कासोदा विकासंस्थेत संपर्क करुन तातडीने अशा शेतकºयांची यादी मागवली. विकासंस्थेने या यादीत कर्जाचे आकडे तसेच मयतांचे नाव, वारसाचे नाव, वारसाचे बँक खाते इत्यादी आवश्यक माहिती या कार्यालयाकडे पाठवली. आता ही यादी जिल्हा बँकेकडे पाठवण्यात आली आहे, मात्र त्यावर कधी कार्यवाही होते, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागून आहे.जिल्हा बँकेचे अनेक संचालक आमदार व खासदार आहेत, जिल्हा बँकेने या प्रश्नी तातडीने निर्णय घ्यावा, ही अपेक्षा आहे. कारण यामुळे बँकेचाच जास्त फायदा आहे. यामुळे बँकेचा एनपीए कमी होण्यासाठी मदत होणार आहे. शेतकºयांच्या वारसांनापण मदत होणार आहे.- दीपक वाणी, चेअरमन विकासंस्था कासोदासंस्थेकडून यादी मिळाली आहे. हा फक्त कासोद्याचा विषय नसून जिल्हाभरातील मयत शेतकºयांचा आहे. लवकरच याबाबत बैठक होऊन तातडीने यावर कार्यवाही होईल.-सुभाष पाटील, विभागीय व्यवस्थापक जिल्हा बँक.