शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दौलत नगर आणि खेडी दरोडा तर सावखेडा खुनाचा तपास थंडावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:16 IST

धागेदोरे नाहीच : गंभीर गुन्हे घटले जळगाव : सावखेडा शिवारात अमदपूर व्यक्तीचा झालेला खून, दौलत नगरातील पिंटू इटकरे तसेच ...

धागेदोरे नाहीच : गंभीर गुन्हे घटले

जळगाव : सावखेडा शिवारात अमदपूर व्यक्तीचा झालेला खून, दौलत नगरातील पिंटू इटकरे तसेच खेड येथे योगेश जगनो भोळे यांच्याकडे झालेला दरोडा या तीन गंभीर गुन्ह्यांचा तपास थंडावला असून दोन महिन्यांत पोलिसांना कुठलेच धागेदोरे मिळालेले नाहीत. खुनाच्या घटनेला तर सहा महिन्यांच्या वर कालावधी झालेला आहे .

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ फेब्रुवारी रोजी रात्री नंदुरबार पोलीस दलात अंमलदार असलेल्या योगेश भोळे यांच्या आईवडिलांच्या डोक्यात बॅट मारून ४० हजारांची रोकड तसेच साखरपुड्याचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता. त्याशिवाय त्याच रात्री या भागात चार ठिकाणी अशीच घटना घडली होती. त्याआधी तीन फेब्रुवारी रोजी पहाटे मोहाडी रस्त्यावर पिंटू बंडू इटकरे यांच्याकडे २३ लाखांचा सशस्त्र दरोडा पडला होता. या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास केला. तंत्रज्ञानाचाही या गुन्ह्यांत आधार घेण्यात आला. मात्र अद्यापपर्यंत कुठलाच पुरावा किंवा माहिती पोलिसांना मिळाली नाही.

दरम्यान,गे ल्या चार महिन्यापासून जिल्ह्यात मालमत्ता तसेच शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे घटलेले आहेत. मोबाईल, दुचाकी व सोनसाखळी लांबविण्याच्या घटना मात्र वाढलेल्या आहेत. मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस येत असताना इतर घटना मात्र उघडकीस येत नाही.

*त्या खुनातील मृतदेहाची ओळख पटलीच नाही*

जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावखेडा शिवारात ६ ऑक्टोबर रोजी ४० ते ४५ वर्षे वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी प्राथमिक स्तरावर अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. शवविच्छेदन अहवालानंतर ही घटना खुनाची असल्याचे स्पष्ट झाले होते, त्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेला सहा महिने पूर्ण झालेले आहे. यात खून कोणी केला यापेक्षाही खून कोणाचा झालेला आहे, मयत व्यक्ती कोण आहे, हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.

* * * * * * * * * * * * * * *गुन्हे दाखलचे प्रमाण वाढले*

गुन्ह्यांच्या आकडेवारीत वाढ झालेली दिसत असली तरी त्यात सर्वाधिक गुन्हे मोबाईल व दुचाकी चोरीचे आहेत. पूर्वी असे किरकोळ गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होते, मात्र डॉ. प्रवीण मुंढे यांनी पोलीस अधीक्षकपदाचा पदभार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात आलेली प्रत्येक तक्रार नोंदवलीच गेली पाहिजे म्हणून त्यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना कडक सूचनावजा आदेश दिले. एखादी तक्रार उशिरा नोंदविली गेली असेल तरी त्या प्रभारी अधिकाऱ्याला जाब विचारला जातो. गुन्हा दाखल झाला तर त्याचा तपास करणे क्रमप्राप्त ठरते, मात्र गुन्हा दाखलच झाला नाही तर तपास करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, त्यामुळे गुन्हेगारांची असे गुन्हे करण्याची हिंमत आणखीनच बळावते. याच मुद्द्याला स्पर्श करून डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुन्हे दाखलचे प्रमाण वाढवले.