शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

दौलत नगर आणि खेडी दरोडा तर सावखेडा खुनाचा तपास थंडावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:16 IST

धागेदोरे नाहीच : गंभीर गुन्हे घटले जळगाव : सावखेडा शिवारात अमदपूर व्यक्तीचा झालेला खून, दौलत नगरातील पिंटू इटकरे तसेच ...

धागेदोरे नाहीच : गंभीर गुन्हे घटले

जळगाव : सावखेडा शिवारात अमदपूर व्यक्तीचा झालेला खून, दौलत नगरातील पिंटू इटकरे तसेच खेड येथे योगेश जगनो भोळे यांच्याकडे झालेला दरोडा या तीन गंभीर गुन्ह्यांचा तपास थंडावला असून दोन महिन्यांत पोलिसांना कुठलेच धागेदोरे मिळालेले नाहीत. खुनाच्या घटनेला तर सहा महिन्यांच्या वर कालावधी झालेला आहे .

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ फेब्रुवारी रोजी रात्री नंदुरबार पोलीस दलात अंमलदार असलेल्या योगेश भोळे यांच्या आईवडिलांच्या डोक्यात बॅट मारून ४० हजारांची रोकड तसेच साखरपुड्याचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता. त्याशिवाय त्याच रात्री या भागात चार ठिकाणी अशीच घटना घडली होती. त्याआधी तीन फेब्रुवारी रोजी पहाटे मोहाडी रस्त्यावर पिंटू बंडू इटकरे यांच्याकडे २३ लाखांचा सशस्त्र दरोडा पडला होता. या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास केला. तंत्रज्ञानाचाही या गुन्ह्यांत आधार घेण्यात आला. मात्र अद्यापपर्यंत कुठलाच पुरावा किंवा माहिती पोलिसांना मिळाली नाही.

दरम्यान,गे ल्या चार महिन्यापासून जिल्ह्यात मालमत्ता तसेच शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे घटलेले आहेत. मोबाईल, दुचाकी व सोनसाखळी लांबविण्याच्या घटना मात्र वाढलेल्या आहेत. मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस येत असताना इतर घटना मात्र उघडकीस येत नाही.

*त्या खुनातील मृतदेहाची ओळख पटलीच नाही*

जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावखेडा शिवारात ६ ऑक्टोबर रोजी ४० ते ४५ वर्षे वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी प्राथमिक स्तरावर अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. शवविच्छेदन अहवालानंतर ही घटना खुनाची असल्याचे स्पष्ट झाले होते, त्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेला सहा महिने पूर्ण झालेले आहे. यात खून कोणी केला यापेक्षाही खून कोणाचा झालेला आहे, मयत व्यक्ती कोण आहे, हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.

* * * * * * * * * * * * * * *गुन्हे दाखलचे प्रमाण वाढले*

गुन्ह्यांच्या आकडेवारीत वाढ झालेली दिसत असली तरी त्यात सर्वाधिक गुन्हे मोबाईल व दुचाकी चोरीचे आहेत. पूर्वी असे किरकोळ गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होते, मात्र डॉ. प्रवीण मुंढे यांनी पोलीस अधीक्षकपदाचा पदभार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात आलेली प्रत्येक तक्रार नोंदवलीच गेली पाहिजे म्हणून त्यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना कडक सूचनावजा आदेश दिले. एखादी तक्रार उशिरा नोंदविली गेली असेल तरी त्या प्रभारी अधिकाऱ्याला जाब विचारला जातो. गुन्हा दाखल झाला तर त्याचा तपास करणे क्रमप्राप्त ठरते, मात्र गुन्हा दाखलच झाला नाही तर तपास करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, त्यामुळे गुन्हेगारांची असे गुन्हे करण्याची हिंमत आणखीनच बळावते. याच मुद्द्याला स्पर्श करून डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुन्हे दाखलचे प्रमाण वाढवले.