अवजड वाहतूक रहिवाशांसाठी धोकादायक
By Admin | Updated: October 28, 2015 23:53 IST2015-10-28T23:53:17+5:302015-10-28T23:53:17+5:30
जळगाव : शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यापूर्वी या पुलासाठी असलेल्या पर्यायी मार्गाची रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ते अशी अवस्था झाली आहे.

अवजड वाहतूक रहिवाशांसाठी धोकादायक
जळगाव : शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यापूर्वी या पुलासाठी असलेल्या पर्यायी मार्गाची रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ते अशी अवस्था झाली आहे. त्याची दुरुस्ती पालिकेने प्रथम करून घ्यायला हवी होती. परंतु तसे न करता पुलावरील अवजड वाहतूक वळविली. ही अवजड वाहतूक आता पर्यायी मार्गावरील रहिवासी, वाहनधारकांसाठी धोकादायक बनली आहे. खड्डेच खड्डे आणि वाहतुकीची कोंडी राष्ट्रीय महामार्ग, गुजराल पेट्रोल पंप, पुढे निमखेडी रस्ता, सूरत रेल्वेगेट, दूध फेडरेशन, गेंदालाल मील हा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. हा मार्ग गुजराल पेट्रोलपंपापासून अतिशय खराब आहे. निमखेडी रस्त्यावर तर खडी आहे. त्याचे काम पूर्ण झालेले नाही. इंद्रप्रस्थनगरातील 100 फुटी रस्ता केसी पार्क, कानळदाकडे जाणा:या वाहनांसाठी आता अधिक वापरात येऊ लागला आहे. त्यावरून एसटी बस, वाळू वाहतूक करणारी वाहने अधिक संख्येने ये-जा करतात. त्याची दुरुस्ती मागील सहा वर्षापासून झालेली नाही. दूध फेडरेशनजवळील फाटकाजवळही ओबडधोबड खड्डे पडले आहेत. त्यावरून जाताना अवजड वाहनांना अधिक वेळ लागतो. यामुळे फाटकाजवळ कोंडी होते. गुजराल पेट्रोलपंप ते हायवे दर्शन कॉलनीर्पयतचा रस्ता अरुंद आहे, त्यावरुन दोन वाहने कसेबसे जातात, त्यामुळे अपघाताचा धोका आहे. त्यातच निमखेडी रस्ता प्रचंड खराब असल्याने धूळ मोठय़ा प्रमाणात उडते.