शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

नशिराबाद आणि परिसरात ७५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:17 IST

शेतकऱ्यांच्या आशेवर फिरले पाणी : सरसकट भरपाई द्या

नशिराबाद : अवकाळी पावसामुळे नशिराबादसह परिसरातील सुमारे ७५० हेक्टरवरील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हातातोंडाशी आलेले उत्पन्न वाया गेले असल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. यंदा पावसामुळे धान्य ,चारा, याची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाने सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.यंदा अपेक्षेपेक्षा भरपूर पाऊस झाला. ऐन पिके काढण्याच्या तोंडावरच पावसाने संततधार चा धडाका सुरू केला. त्यामुळे शेतात उभी असलेली पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यात मका, ज्वारी कणसाला कोंबच फूटले, सोयाबीन खराब झाला, तर कापूस सडला. अजूनही काही शेतात पाणीच पाणी साचलेय अशा स्थितीने शेतकरी राजा बेजार झाला आहे. नशिराबाद सह परिसरात सोयाबीनचे ३०० हेक्टर, कापसाचे २५०हेक्टर, ज्वारी,मक्याचे २०० हेक्टर पर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज सांगण्यात येत आहे. सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.रब्बीची तयारी करावी कशी?शासन उभी पिकांची पंचनामे करत असल्याने रब्बीच्या पेरणीसाठी जमीन तयारी करण्यास व्यत्यय येत आहे. पंचनामे करणाºया अधिकारी येतील तो पर्यंत ती बाधीत पिके काढता येत नसल्याने शेतकरी त्यांची वाट पाहत आहे. रब्बीच्या पेरणीसाठी जमीन तयार करावी लागणार आह, त्यासाठी पिक पेरानुसार नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आहे.दिवाळी पावसाची अन नासाडी पिकांची..देवा पुरे झाला आता पाऊस ..अशी म्हणण्याची वेळ सर्वांवर येऊन ठेपली. मात्र वरुणराजाने पाण्याचा वर्षाव करीत दिवाळी केली. मात्र शेतकरी राजाचे कंबरडे मोडीत सर्वच पिकांची नासाडी केली. हातातल्या हंगाम गेला. यंदा ओला दुष्काळाने मारले मात्र शासन तरी तारेल काय? या प्रतीक्षा आहे.पंचनामे सुरूनशिराबाद येथे तलाठी प्रवीण बेंडाळे, कृषी सहाय्यक प्रवीण सोनवणे, ग्रामविकासअधिकारी बी.एस. पाटील, व सहकारी पंचनामे करीत आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव