शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
2
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
3
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
4
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
5
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
6
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
7
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
9
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
10
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
11
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
12
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
13
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
14
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
15
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
16
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
17
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!
18
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
19
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
20
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन

नशिराबाद आणि परिसरात ७५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:17 IST

शेतकऱ्यांच्या आशेवर फिरले पाणी : सरसकट भरपाई द्या

नशिराबाद : अवकाळी पावसामुळे नशिराबादसह परिसरातील सुमारे ७५० हेक्टरवरील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हातातोंडाशी आलेले उत्पन्न वाया गेले असल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. यंदा पावसामुळे धान्य ,चारा, याची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाने सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.यंदा अपेक्षेपेक्षा भरपूर पाऊस झाला. ऐन पिके काढण्याच्या तोंडावरच पावसाने संततधार चा धडाका सुरू केला. त्यामुळे शेतात उभी असलेली पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यात मका, ज्वारी कणसाला कोंबच फूटले, सोयाबीन खराब झाला, तर कापूस सडला. अजूनही काही शेतात पाणीच पाणी साचलेय अशा स्थितीने शेतकरी राजा बेजार झाला आहे. नशिराबाद सह परिसरात सोयाबीनचे ३०० हेक्टर, कापसाचे २५०हेक्टर, ज्वारी,मक्याचे २०० हेक्टर पर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज सांगण्यात येत आहे. सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.रब्बीची तयारी करावी कशी?शासन उभी पिकांची पंचनामे करत असल्याने रब्बीच्या पेरणीसाठी जमीन तयारी करण्यास व्यत्यय येत आहे. पंचनामे करणाºया अधिकारी येतील तो पर्यंत ती बाधीत पिके काढता येत नसल्याने शेतकरी त्यांची वाट पाहत आहे. रब्बीच्या पेरणीसाठी जमीन तयार करावी लागणार आह, त्यासाठी पिक पेरानुसार नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आहे.दिवाळी पावसाची अन नासाडी पिकांची..देवा पुरे झाला आता पाऊस ..अशी म्हणण्याची वेळ सर्वांवर येऊन ठेपली. मात्र वरुणराजाने पाण्याचा वर्षाव करीत दिवाळी केली. मात्र शेतकरी राजाचे कंबरडे मोडीत सर्वच पिकांची नासाडी केली. हातातल्या हंगाम गेला. यंदा ओला दुष्काळाने मारले मात्र शासन तरी तारेल काय? या प्रतीक्षा आहे.पंचनामे सुरूनशिराबाद येथे तलाठी प्रवीण बेंडाळे, कृषी सहाय्यक प्रवीण सोनवणे, ग्रामविकासअधिकारी बी.एस. पाटील, व सहकारी पंचनामे करीत आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव