शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

बोली भाषा संवर्धनासाठी सायकलने देशभ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:00 IST

२० हजार किमीचा प्रवास

सचिन देवभारतात असंख्य भाषा बोलल्या जातात. प्रत्येक प्रातांची भाषा ही वेगवेगळी आहे. संस्कृतीचा वारसा जपण्यात भाषेचे अनन्य साधारण महत्व आहे. देशभरातील बोलीभाषांच्या प्रसारासाठी गेल्या वर्षांपासून सायकलवरुन देशभ्रमंती यात्रा सुरु केली आहे, अशी माहिती डोंबिवलीतील गंधार कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात ते शुक्रवारी जळगावला आले होते. त्यावेळी ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संवाद साधला.प्रश्न : बोली भाषांच्या अभ्यासासाठी सायकलवरुन देशभ्रमंती यात्रा कधी सुरु झाली आणि कधी संपणार आहे ?उत्तर : गेल्या वर्षी १ जुलैला सायकलने देशभ्रमंतीला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात डोंबिवलीहून नागपूर, नागपूरहून मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब व गुजरात केले. तर आता दुसऱ्या टप्प्यात कर्नाटक, केरळ, तामीळनाडू व इतर राज्य करुन महाराष्ट्रात आलो आहे. येत्या १५ आॅगस्टला या देशभ्रमंतीची सांगता होईल.प्रश्न : सायकलवारीतून बोली भाषांचा कशा प्रकारे अभ्यास करत आहात?उत्तर : या देशात असंख्य भाषा आणि बोलीभाषा असल्यामुळे, भारत देश हा भाषिकदृष्टया श्रीमंत मानला जातो. प्रत्येक बोलीहीं भाषेला समृद्ध करत असते. सायकलवरुन देशभ्रमंती करत असतांना, रस्त्यात लागणाºया गावकऱ्यांशी चर्चा केली. तेथील महाविद्यालयांना भेटी देऊन, विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तेथील बोलीभाषा व मातृभाषेविषयी माहिती घेतली. तसेच संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी प्रत्येकाने बोलीभाषा जपली पाहिजे, दैनंदिन व्यवहार करताना प्रत्येकाने बोली भाषेचाच वापर करावा.प्रवासात काही अडचणी अल्या का?केलेल्या नियोजननुसार सर्व प्रवास आता पर्यंत सुरळीत पार पडत आहे. सायकलवरुन देशभर फिरल्यामुळे, सायकलचा प्रत्येक पार्ट बदलावा लागला. यापुढे आता भाषेवरच अभ्यास करायचा असून, बोली भाषंचा प्रसार, महत्व विद्यार्थ्यांना पटवून द्यायचे आहे. तसेच या विषयात पीएचडी करण्याचा मानस आहे.दररोज किती किलोमीटरचा प्रवास असायचा ?दररोज ८० ते १२० किलोमीटरचा प्रवास असायचा. भ्रमंतीवर निघतानांच प्रवास, राहण्याचे व शिदोरीचे नियोजन केले होते. महाराष्ट्रात व इतर राज्यांमध्ये फरक करायचा झाला तर, महाराष्ट्र शिक्षणासह इतर सर्व क्षेत्रात खूप पुढे आहे. मात्र, रस्त्यांच्या बाबतीत महाराष्ट्राची खुप मागे असलेला दिसून आला.

टॅग्स :Jalgaonजळगाव