शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

ममुराबाद सामुहिक योजनेसाठी हतनूरचे एक आवर्तन सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:16 IST

ममुराबाद : तापीनदीवर अवलंबून असलेल्या सामूहिक योजनेवरील टंचाईचे संकट दूर करण्यासाठी हतनूरचे एक आवर्तन सोडण्यात यावे, अशा आशयाचे ...

ममुराबाद : तापीनदीवर अवलंबून असलेल्या सामूहिक योजनेवरील टंचाईचे संकट दूर करण्यासाठी हतनूरचे एक आवर्तन सोडण्यात यावे, अशा आशयाचे वृत्त 'लोकमत'ने नुकतेच प्रकाशित केले. याशिवाय ममुराबाद ग्रामपंचायतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही त्यासंदर्भात निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन हतनूरमधून सूर नदीला जोडलेल्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत.

हतनुर धरणातून कालव्याद्वारे किलोमीटर ३१ एस्केपमधून सूर नदीद्वारे ममुराबाद व पाच गावांसाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनासाठी हतनूर धरणातून साधारणतः तीन दशलक्ष घनमीटर इतके पाणी सोडावे लागणार आहे. सदर पाणी सोडण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी अधीक्षक अभियंता व प्रशासक कडा जळगाव यांच्याशी संपर्क साधून पाणी सोडण्याचे आदेशित केले आहे. सद्यस्थितीत ममुराबाद व पाच गावांमध्ये अपुऱ्या जलस्रोतांमुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, हतनूरचे पाणी सोडल्यास सामूहिक योजनेतील गावे व पंचक्रोशीतील इतर गावांना पावसाळ्यापर्यंत दिलासा मिळणार आहे. त्याअनुषंगाने उपविभागीय अभियंता शशिकांत चौधरी, कार्यकारी अभियंता बेहेरे यांनी सूर नदीद्वारे हतनूरचे आवर्तन सोडण्याचे नियोजन केले आहे.