शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

ममुराबाद सामुहिक योजनेसाठी हतनूरचे एक आवर्तन सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:16 IST

ममुराबाद : तापीनदीवर अवलंबून असलेल्या सामूहिक योजनेवरील टंचाईचे संकट दूर करण्यासाठी हतनूरचे एक आवर्तन सोडण्यात यावे, अशा आशयाचे ...

ममुराबाद : तापीनदीवर अवलंबून असलेल्या सामूहिक योजनेवरील टंचाईचे संकट दूर करण्यासाठी हतनूरचे एक आवर्तन सोडण्यात यावे, अशा आशयाचे वृत्त 'लोकमत'ने नुकतेच प्रकाशित केले. याशिवाय ममुराबाद ग्रामपंचायतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही त्यासंदर्भात निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन हतनूरमधून सूर नदीला जोडलेल्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत.

हतनुर धरणातून कालव्याद्वारे किलोमीटर ३१ एस्केपमधून सूर नदीद्वारे ममुराबाद व पाच गावांसाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनासाठी हतनूर धरणातून साधारणतः तीन दशलक्ष घनमीटर इतके पाणी सोडावे लागणार आहे. सदर पाणी सोडण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी अधीक्षक अभियंता व प्रशासक कडा जळगाव यांच्याशी संपर्क साधून पाणी सोडण्याचे आदेशित केले आहे. सद्यस्थितीत ममुराबाद व पाच गावांमध्ये अपुऱ्या जलस्रोतांमुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, हतनूरचे पाणी सोडल्यास सामूहिक योजनेतील गावे व पंचक्रोशीतील इतर गावांना पावसाळ्यापर्यंत दिलासा मिळणार आहे. त्याअनुषंगाने उपविभागीय अभियंता शशिकांत चौधरी, कार्यकारी अभियंता बेहेरे यांनी सूर नदीद्वारे हतनूरचे आवर्तन सोडण्याचे नियोजन केले आहे.