शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

पतीच्या वाढदिवसाचा केक कापून पत्नीचा गळफास ; पतीसह तिघांविरुध्द खुनाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 12:51 IST

पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या : अंत्यसंस्काराकडे माहेरच्यांनी फिरविली पाठ

जळगाव : रात्री १२ वाजता पतीच्या वाढदिवसाचा केक कापून भाग्यश्री प्रशांत पाटील (२६, रा.नेहरु नगर,) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री नेहरु नगरात घडली. दरम्यान, हा घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप करुन गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने पती प्रशांत, सासरे प्रकाश पंडित पाटील व सासू प्रतिभा यांच्याविरुध्द सायंकाळी खुनाचा गुन्हा दाखल झाला. प्रशांत शनी पेठ पोलीस स्टेशनला कार्यरत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत पाटील, वडील प्रकाश पाटील व आई प्रतिभा पाटील, मुलगा वेदांत व पत्नी भाग्यश्री असे मंगळवारी रात्री सर्वच जण घरात होते. २८ आॅगस्ट प्रशांत यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी पत्नी भाग्यश्री यांच्यासोबत वाढदिवसाचा केक कापला, त्यानंतर सर्व जण झोपले. रात्री १ वाजता प्रशांत यांचे वडील लघुशंकेसाठी उठले असता त्यांना सून भाग्यश्री हिने गळफास घेतल्याचे दिसले. घाबरलेल्या पाटील यांनी मुलाला उठविले. तातडीने भाग्यश्री यांना खासगी रुग्णालयात आणले व तेथून जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे १.४८ वाजता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.कायदेशीर लढा लढणार : अ‍ॅड. सोनवणेआम्हाला कुठल्याही प्रकारचे भांडण अथवा वाद घालायचा नाही. कायदेशीर पध्दतीने लढाई लढू, तिच्या अंगावरील खुणा तसेच व्रण यामुळे तिने आत्महत्या केली नसून तिला गळा आवळून मारण्यात आले असल्याचे भाग्यश्रीचे चुलत भाऊ अ‍ॅड. महेश सोनवणे यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी भारतीच्या इतर माहेरच्या नातेवाईकांनीही हीच भुमिका घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. उशीरापर्यंत जिल्हा रुग्णालयात गोंधळ सुरु होता. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन व एमआयडीसीचे निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी नातेवाईकांची समजूत घातली. मात्र नातेवाईक गुन्हा दाखल करण्यावर ठाम होते.जिल्हा रुग्णालयात संताप अन् आक्रोशमयत भाग्यश्री हिचे धुळे जिल्ह्यातील सौंदाणे माहेर आहे. एमएबीएड असे तिचे शिक्षण झाले होते. वडील अरुण जगन्नाथ पाटील, आई प्रमिला, दोन बहिणी जयश्री व राजश्री, व भाऊ निलेश असा परिवार आहे. दोन्ही बहिणी व भावाचे लग्न झाले आहे. वडील धुळयात पावभाजी गाडी लावून उदरनिर्वाह भागवितात. घटनेची माहिती मिळाल्यावर भाग्यश्रीचे हिचे शहरातील रहिवासी काका राजेंद्र पाटील यांनी नेहरुनगर गाठले. पोहचल्यावर त्यांना मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याचे कळाले. त्यांनी याबाबत भाग्यश्रीचे वडील यासह बहिणी, मेव्हणे यांना प्रकार कळविला. त्यानुसार धुळ्यासह ठिकठिकाणांहून नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. मृतदेह पाहून नातेवाईकांनी सासरच्यांवर संताप व आरोप करुन प्रचंड आक्रोश केला. दरम्यान, भाग्यश्रीचे पती प्रशांत पाटील शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हे शोध पथकात कार्यरत आहेत. याआधी शहर वाहतूक शाखा व तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर व दत्तात्रय कराळे यांच्या काळात त्यांचे अंगरक्षक होते.नोकरीसाठी २५ लाख मागितल्याचा आरोपभाग्यश्री हिचे वडील अरुण जगन्नाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगी भाग्यश्री हिचे एम.एम.बीएड असे शिक्षण झालेले असल्याने तिला नोकरीला लावण्यासाठी प्रशांत पाटील व त्याच्या आईवडीलांनी २५ लाख रुपयांची मागणी केली होती. ते दिले नाहीत म्हणून मुलगी भाग्यश्री हिचा छळ सुरु केला. तुला हाकलून देवू, तुला नांदवणार नाही व जीवंत ठार मारु अशा धमक्या त्यांच्याकडून दिल्या जात होत्या. मुलगा दिनेश रक्षाबंधनासाठी भाग्यश्रीकडे आला असता तेव्हा देखील सासरच्यांनी २५ लाखाची मागणी केली होती, हे पैसे देवू शकले नाही म्हणून पती प्रशांत पाटील, सासरा प्रकाश पंडित पाटील व सासु प्रतिभा पाटील यांनी भाग्यश्री हिला गळफास लावून ठार मारल्याचे म्हटले आहे. त्यानुसार तिघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तीन दिवसापूर्वीच बहिणीशी फोनवरुन झाले बोलणेभाग्यश्री हिची मोठी बहिण जयश्री ही चोपड्याला नांदते. ती शिक्षिका आहे. भाग्यश्री वडीलांना आप्पा म्हणायची. सोमवारी शाळेत ड्युटीवर असतांना मोठी बहिणी जयश्रीला भाग्यश्रीने मोबाईलवरुन फोन केला होता. यावेळी तिने आप्पांना माझ्या घरी पाठवून दे असे सांगितले होते, शाळेत व्यस्त असल्याने थोडेच बोलणे झाले, यानंतर भाग्यश्रीचाही फोन आला नाही, आणि मीही तिला फोन केला नाही, यानंतर बुधवारी थेट तिच्या आत्महत्येची बातमी मिळली, असे जयश्री हिने पत्रकारांशी बोलतांना सांगितले. तिला नेमके फोनवर काय सांगायचे होते किंवा तिने आप्पांना का घरी बोलावले होते? हे प्रश्न उपस्थित करत जयश्री आक्रोश करत होती, व आप्पाला पाठविले असते तर भाग्यश्रीचा जीव वाचला असता असे बहिंणीने सांगितले.तीन डॉक्टरांच्या समितीने केले शवविच्छेदनदुपारी तीन वाजता वैद्यकिय महाविद्यालयातील फॉरेन्सिक पथकातील डॉ.निलेश देवराज, डॉ.शुभम पाटील व डॉ.माधुरी रोहेरा यांच्या समितीने भाग्यश्री हिचे शवविच्छेदन केले. त्यानंतर मृत्यूचे कारण काय आहे, त्याचा अहवाल पोलिसांना दिला. मृत्यूचे कारण स्पष्टच असल्याने व्हिसेरा राखीव ठेवण्याची गरज भासली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.गुन्हा दाखल झाल्यानंतर अंत्यसंस्काररात्रीपासून मृतदेह शवविच्छेदगृहात होता. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी तीन वाजता शवविच्छेदन झाले. त्यानंतर सायंकाळी साडे सात वाजता खुनाचा गुन्हा दाखल झाला. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर माहेरचे लोक निघून गेले. अंत्यविधीसाठीही कोणी थांबले नाही. सासरच्यांनी भाग्यश्री हिच्यावर नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.पती प्रशांत यांनी अग्निडाग दिला. दरम्यान, गुन्हा दाखल झाला असला तरी कोणालाही अटक झालेली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव