शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जिल्हाभरात वादळी वाऱ्याने पिके आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 00:28 IST

जिल्हाभरात वादळी वाऱ्याने पिके आडवी झाल्याने शेतकरी हताश झाला आहे.

जळगाव : जिल्हाभरात शनिवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. शेतीचा हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून नेला त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे.आडगाव येथे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊसआडगाव, ता. चाळीसगाव : शनिवारी सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरू झाला. साधारणतः सुपारीच्या आकासारखी गार पडली. यावेळी पाऊसही जोरात होता. पावसाने शेतात कापून ठेवलेला गहु, हरभरा झाकण्यासाठी एकच तारांबळ उडाली. बहुतेक शेतकऱ्यांनी मक्याचे कणसे मोडून व चारा कापून ठेवल्याने कणीस ओले झाले व चाराही ओला झाला. ज्वारी, बाजरीच्या कणसांना दाणे नसल्याने त्याच्या पंचनाम्यासाठी कृषी अधिकाऱ्यांकडे चकरा माराव्या लागत आहे. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यासाठी पुन्हा कृषी विभागाचे दार ठोठवावे लागेल की काय, असा प्रश्न शेतकऱ्याला पडू लागला आहे.जामनेरात गारपीट जामनेर : तालुक्यातील तोंडापूर, मोयगाव, भागदारा, टाकळी परिसरात शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गारपिटीसह पाऊस झाला. गारपिटीमुळे शेतातील हरभरा, मका व ज्वारीच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. जोरदार वाऱ्यासह वादळाने सुरुवात होत काही भागात पावसाबरोबर गारादेखील पडल्या. तोंडापूर, मोयगाव, भागदारा, टाकळी या भागात दुपारी जोरदार वारा वाहू लागला. पावसाला सुरूवात होताच टपोऱ्या गारा पडायला सुरुवात झाली.चाळीसगाव परिसराला अवकाळीने झोडपलेलोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता अवकाळी पावसाने चाळीसगाव परिसराला चांगलेच झोडपून काढले. गारपिटीचा माराही झाला. या अवकाळी धूमशानामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.शनिवारी सकाळपासूनच वातावरण काहीसे ढगाळ होते. दुपारी उकाडाही वाढला होता. दुपारी साडेचार वाजता ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटात जोराचा वारा आणि वादळी पावसाने सर्वत्र एकच धावपळ उडाली. गोटीच्या आकाराची गारपीटही झाली.  वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे रस्त्यावरील काही झाडे पडली, फांद्याही पडून आल्या. अनेक ठिकाणी तुंबलेल्या गटारींचे पाणी रस्त्यावर आले होते.रावेरसह अनेक तालुक्यात वादळी पावसाचे तांडवरावेर : शहरासह तालुक्यात सायंकाळी पावणेसात वाजेपासून आभाळ भरून आल्याने विजांच्या कडकडाटात वादळी पावसाने तांडव घातल्याने ऐन कापणीवरील केळीबागा, मळणीसाठी कापून पडलेली वा उभी गहू, हरभरा, मक्याच्या उत्पादनाची वादळ-पावसात धूळधाण होऊन अपरिमित हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वादळी पावसात वीजपुरवठा खंडित झाल्याने तालुका अंधारात बुडाला आहे.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव