शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्हाभरात वादळी वाऱ्याने पिके आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 00:28 IST

जिल्हाभरात वादळी वाऱ्याने पिके आडवी झाल्याने शेतकरी हताश झाला आहे.

जळगाव : जिल्हाभरात शनिवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. शेतीचा हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून नेला त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे.आडगाव येथे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊसआडगाव, ता. चाळीसगाव : शनिवारी सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरू झाला. साधारणतः सुपारीच्या आकासारखी गार पडली. यावेळी पाऊसही जोरात होता. पावसाने शेतात कापून ठेवलेला गहु, हरभरा झाकण्यासाठी एकच तारांबळ उडाली. बहुतेक शेतकऱ्यांनी मक्याचे कणसे मोडून व चारा कापून ठेवल्याने कणीस ओले झाले व चाराही ओला झाला. ज्वारी, बाजरीच्या कणसांना दाणे नसल्याने त्याच्या पंचनाम्यासाठी कृषी अधिकाऱ्यांकडे चकरा माराव्या लागत आहे. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यासाठी पुन्हा कृषी विभागाचे दार ठोठवावे लागेल की काय, असा प्रश्न शेतकऱ्याला पडू लागला आहे.जामनेरात गारपीट जामनेर : तालुक्यातील तोंडापूर, मोयगाव, भागदारा, टाकळी परिसरात शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गारपिटीसह पाऊस झाला. गारपिटीमुळे शेतातील हरभरा, मका व ज्वारीच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. जोरदार वाऱ्यासह वादळाने सुरुवात होत काही भागात पावसाबरोबर गारादेखील पडल्या. तोंडापूर, मोयगाव, भागदारा, टाकळी या भागात दुपारी जोरदार वारा वाहू लागला. पावसाला सुरूवात होताच टपोऱ्या गारा पडायला सुरुवात झाली.चाळीसगाव परिसराला अवकाळीने झोडपलेलोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता अवकाळी पावसाने चाळीसगाव परिसराला चांगलेच झोडपून काढले. गारपिटीचा माराही झाला. या अवकाळी धूमशानामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.शनिवारी सकाळपासूनच वातावरण काहीसे ढगाळ होते. दुपारी उकाडाही वाढला होता. दुपारी साडेचार वाजता ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटात जोराचा वारा आणि वादळी पावसाने सर्वत्र एकच धावपळ उडाली. गोटीच्या आकाराची गारपीटही झाली.  वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे रस्त्यावरील काही झाडे पडली, फांद्याही पडून आल्या. अनेक ठिकाणी तुंबलेल्या गटारींचे पाणी रस्त्यावर आले होते.रावेरसह अनेक तालुक्यात वादळी पावसाचे तांडवरावेर : शहरासह तालुक्यात सायंकाळी पावणेसात वाजेपासून आभाळ भरून आल्याने विजांच्या कडकडाटात वादळी पावसाने तांडव घातल्याने ऐन कापणीवरील केळीबागा, मळणीसाठी कापून पडलेली वा उभी गहू, हरभरा, मक्याच्या उत्पादनाची वादळ-पावसात धूळधाण होऊन अपरिमित हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वादळी पावसात वीजपुरवठा खंडित झाल्याने तालुका अंधारात बुडाला आहे.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव