शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

पीक विमा कंपन्या मालामाल; भरले २९ कोटी, मिळाले ४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. त्यातच परतीच्या पावसामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. त्यातच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातचे पीकदेखील वाया गेले होते. मात्र, नुकसान भरपाईच्या मदतीपासून जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे वंचित राहिला असून पीक विमा कंपन्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याच्या रकमेपासून वंचित ठेवून, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे. कारण जिल्ह्यातील १ लाख शेतकऱ्यांपैकी केवळ १० हजार शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरले असून, उर्वरित ९० हजार शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेपासून वंचित राहावे लागणार आहे.

जळगाव जिल्ह्यात भारतीय एक्सा इन्शुरन्स कंपनीला खरीप पीक विम्याचा तीन वर्षांसाठी करार करण्यात आला आहे. २०२०-२१ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगर कर्जदार असलेल्या १ लाख ६३ हजार ४९९ शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेतला होता. त्यात खरीप हंगामाचा वेळेस झालेल्या अतिवृष्टीमुळे उडीद, मूग व सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाया गेले होते तर कापसाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. मात्र पीक विम्याची रक्कम भरल्यामुळे झालेला नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, खरीप पीक विम्याची रक्कम जाहीर होताच शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आता शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

खरीप हंगाम - २०२०-२०२१

पीक विमा लागवड क्षेत्र - १ लाख ५७ हजार ९७०

एकूण जमा रक्कम - २९ कोटी ८ लाख

१ लाखहून अधिक शेतकरी बाद

जिल्ह्यातील १ लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता. त्यापैकी केवळ १० हजार शेतकरी लाभासाठी पात्र ठरले असून, तब्बल १ लाख ५६ हजार शेतकरी पीक विम्याचा रकमेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. लाभासाठी पाच बाबींचे निकष लावण्यात येतात. यातील पीक पेरणी ते काढणीपर्यंत आलेली नैसर्गिक आपत्ती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पद्धतीमधील नुकसान या तीन बाबींचा विचार करण्याची मदत देताना झाला आहे.

एकूण मंजूर पीक विमा - ४ कोटी ११ लाख

शेतकऱ्यांनी भरलेले पैसे - २९ कोटी ८ लाख ४९ हजार

राज्य सरकारने भरलेली रक्कम - ८ कोटी

केंद्र सरकारने भरलेली रक्कम - ८ कोटी

विमा काढणारे शेतकरी - १ लाख ६६ हजार

लाभार्थी शेतकरी - १० हजार

वंचित शेतकरी १ लाख ५४ हजार

आतापर्यंत झालेले वाटप - ४ कोटी

गेल्या वर्षी मिळाली होती २०८ कोटींची मदत

खरीप हंगाम सन २०१९-२० मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील १ लाख ४५ शेतकऱ्यांना २०८ कोटी ३४ लाख १३ हजार ६४० रुपयांचा प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभ मंजूर झाला होता. मात्र यावर्षी मिळालेली रक्कम ही तटपुंजी असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

कोट

खरीप पीक विमा योजनेअंतर्गत आम्ही जवळजवळ सर्वच पिकांचा विमा काढला होता. झालेले नुकसानदेखील मोठे होते; मात्र नुकसान भरपाई आम्हाला मिळालीच नाही. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

- नरेंद्र जाधव, शेतकरी, कुरवेल, ता. चोपडा

गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद व मुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान भरपाई मिळावी यासाठीच विम्याचे हप्तेदेखील भरले. मात्र मदत मिळाली नाही. मग आम्ही विमा का काढावा, केवळ पीक विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी?

- भय्यासाहेब पाटील, शेतकरी

गेल्यावर्षी झालेल्या नुकसानीची कोणतीही मदत शासनाकडून अद्यापपर्यंत झालेली नाही. त्यात पीक विम्याचे हप्ते भरूनदेखील त्यामध्ये आम्ही पात्र ठरलो नाही. पीक विमा कंपनी व शासनाकडून शेतकऱ्यांची केवळ आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.

- भास्कर पाटील, शेतकरी