शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

महामार्गावरील ‘गावठी’ उपाय ठरताय जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 12:53 IST

विस्तारीत रस्त्यावर खडी, दगडांनी बनविले गतिरोधक : महामार्गाची अवस्था झाली बिकट

जळगाव : राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या आधीच रखडलेल्या व अर्धवट स्थितीत असलेल्या कामांनी वाहतूक व्यवस्थेचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. परिणामी रस्त्यावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने हा महामार्ग जणू मृत्यूचा सापळाच बनला आहे. तर दुसरीकडे बांभोरी ते विद्यापीठ या दरम्यान गतीरोधक टाळण्यासाठी वाहन चालक अर्धवट रूंदीकरण झालेल्या रस्त्यावरून वाहन नेत आहेत. त्यांना अडविण्यासाठी गतीरोधकाच्या रांगेत दगड आणि खडीचा ढीग बनविण्यात आला असून ते अपघाताला निमंत्रण देत आहेत़शहरातील महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या मालिकांत अनेक जीव जाऊन त्यांचे संसार उघड्यावर पडले. या वाढत्या अपघातांना पायबंद घालण्यासाठी विविध संघटनांच्या जनआंदोलनानंतर या रस्त्याच्या चौपदरीकरणाला गती मिळाली. मध्यंतरी कासवगतीने रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या काम होत असल्यामुळे रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली होती़ नंतर कामाला गती घेत सपाटीकरणाचे काम सुरू झाले़ मात्र, हे कामही धिम्या गतीने होत असल्यामुळे गैरसोय कायम आहे.रिफ्लेक्टर अथवा सूचना फलकाची आवश्यताबांभोरी ते विद्यापीठ दरम्यान बनविलेल्या रस्त्यांवर सूचना फलक तसेच कुठलेही रिफ्लेक्टर लावलेले नाही़ त्यामुळे रस्त्यावर पुढे काय काम सुरू आहे याचा अंदाज येत नाही़ आधीच विद्यापीठासमोरील रस्त्यावर चढ-उतार असून मोठे खड्डे सुध्दा पडलेले आहेत. त्यामुळे रिफ्लेक्टर आणि सूचना फलक लावण्याचे तसेच दगडांनी बनविलेले गतिरोधक काढण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे़मृत्यूचा महामार्ग ठरलेल्या या रस्त्याचे काम त्आता तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी आता जनमाणसातून होऊ लागली आहे.विद्यापीठासमोर अर्धवट गतिरोधककवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शहरातून हजारो विद्यार्थी शहरातून ये-जा करीत असतात, त्याचबरोबर जवळचं कंपनी असल्यामुळे त्याठिकाणी दिवस-रात्र कर्मचाऱ्यांची ये-जा असते़ आधीच चौपदरीकरणाच्या अर्धवट कामामुळे रस्ता काही ठिकाणी रूंद तर काही ठिकाणी अरूंद आहे. विद्यार्थी आणि कर्मचाºयांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो़ त्यात विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील महामार्गावर शंभर ते दीडशे मीटर अंतरांवर फायबरचे दोन ते तीन गतिरोधक टाकण्यात आले आहे़ मात्र, महामार्गाच्या रूंदीइतके न टाकता अर्धवट गतिरोधक टाकण्यात आले असून त्याच्या आजू-बाजूला खड्डे आणि चढ-उतार आहे. गतीरोधक टाळण्यासाठी वाहनचालक नेमके बाजूने वाहन नेत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही़मुरूम, खडींनी बनविला गतिरोधकजैन इरिगेशन कंपनीसमोरील रस्त्यावर सुध्दा खडी आणि मुरूमाचा गतिरोधक बनविण्यात आला आहे़ दरम्यान, गावठी पध्दतीने बनविलेले गतिरोधक हा फक्त खडी आणि मुरूमाचा ढिग लावून बनविण्यात आल्या असल्यामुळे त्यावरून दुचाकीधारक गेल्यास तोल जावून पडण्याची शक्यता आहे़ त्यामुळे सपाटीकरण केलेल्या रस्त्यांवर गावठी पध्दतीने प्रवेश बंद करण्यासाठी वापरलेल्या उपाययोजना या अपघाताला निमंत्रण देणाºया ठरत आहेत.तर होवू शकतो अपघातमहामार्गावर विद्यापीठाचे फलक लावलेल्या ठिकाणी आधीच चढ-उतार असून त्यात फायबरचे गतिरोधक बनविण्यात आले़ मात्र, रस्त्याच्या कडेला असलेल्या कच्च्या रस्त्याचे सपाटीकरण करण्यात येत असल्यामुळे त्या रस्त्यावरून वाहनधारकांनी जावू नये म्हणून गतिरोधकाला लागून दगडाचे आणि खडीचे गतिरोधक बनविण्यात आले़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव