शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

महामार्गावरील ‘गावठी’ उपाय ठरताय जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 12:53 IST

विस्तारीत रस्त्यावर खडी, दगडांनी बनविले गतिरोधक : महामार्गाची अवस्था झाली बिकट

जळगाव : राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या आधीच रखडलेल्या व अर्धवट स्थितीत असलेल्या कामांनी वाहतूक व्यवस्थेचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. परिणामी रस्त्यावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने हा महामार्ग जणू मृत्यूचा सापळाच बनला आहे. तर दुसरीकडे बांभोरी ते विद्यापीठ या दरम्यान गतीरोधक टाळण्यासाठी वाहन चालक अर्धवट रूंदीकरण झालेल्या रस्त्यावरून वाहन नेत आहेत. त्यांना अडविण्यासाठी गतीरोधकाच्या रांगेत दगड आणि खडीचा ढीग बनविण्यात आला असून ते अपघाताला निमंत्रण देत आहेत़शहरातील महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या मालिकांत अनेक जीव जाऊन त्यांचे संसार उघड्यावर पडले. या वाढत्या अपघातांना पायबंद घालण्यासाठी विविध संघटनांच्या जनआंदोलनानंतर या रस्त्याच्या चौपदरीकरणाला गती मिळाली. मध्यंतरी कासवगतीने रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या काम होत असल्यामुळे रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली होती़ नंतर कामाला गती घेत सपाटीकरणाचे काम सुरू झाले़ मात्र, हे कामही धिम्या गतीने होत असल्यामुळे गैरसोय कायम आहे.रिफ्लेक्टर अथवा सूचना फलकाची आवश्यताबांभोरी ते विद्यापीठ दरम्यान बनविलेल्या रस्त्यांवर सूचना फलक तसेच कुठलेही रिफ्लेक्टर लावलेले नाही़ त्यामुळे रस्त्यावर पुढे काय काम सुरू आहे याचा अंदाज येत नाही़ आधीच विद्यापीठासमोरील रस्त्यावर चढ-उतार असून मोठे खड्डे सुध्दा पडलेले आहेत. त्यामुळे रिफ्लेक्टर आणि सूचना फलक लावण्याचे तसेच दगडांनी बनविलेले गतिरोधक काढण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे़मृत्यूचा महामार्ग ठरलेल्या या रस्त्याचे काम त्आता तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी आता जनमाणसातून होऊ लागली आहे.विद्यापीठासमोर अर्धवट गतिरोधककवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शहरातून हजारो विद्यार्थी शहरातून ये-जा करीत असतात, त्याचबरोबर जवळचं कंपनी असल्यामुळे त्याठिकाणी दिवस-रात्र कर्मचाऱ्यांची ये-जा असते़ आधीच चौपदरीकरणाच्या अर्धवट कामामुळे रस्ता काही ठिकाणी रूंद तर काही ठिकाणी अरूंद आहे. विद्यार्थी आणि कर्मचाºयांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो़ त्यात विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील महामार्गावर शंभर ते दीडशे मीटर अंतरांवर फायबरचे दोन ते तीन गतिरोधक टाकण्यात आले आहे़ मात्र, महामार्गाच्या रूंदीइतके न टाकता अर्धवट गतिरोधक टाकण्यात आले असून त्याच्या आजू-बाजूला खड्डे आणि चढ-उतार आहे. गतीरोधक टाळण्यासाठी वाहनचालक नेमके बाजूने वाहन नेत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही़मुरूम, खडींनी बनविला गतिरोधकजैन इरिगेशन कंपनीसमोरील रस्त्यावर सुध्दा खडी आणि मुरूमाचा गतिरोधक बनविण्यात आला आहे़ दरम्यान, गावठी पध्दतीने बनविलेले गतिरोधक हा फक्त खडी आणि मुरूमाचा ढिग लावून बनविण्यात आल्या असल्यामुळे त्यावरून दुचाकीधारक गेल्यास तोल जावून पडण्याची शक्यता आहे़ त्यामुळे सपाटीकरण केलेल्या रस्त्यांवर गावठी पध्दतीने प्रवेश बंद करण्यासाठी वापरलेल्या उपाययोजना या अपघाताला निमंत्रण देणाºया ठरत आहेत.तर होवू शकतो अपघातमहामार्गावर विद्यापीठाचे फलक लावलेल्या ठिकाणी आधीच चढ-उतार असून त्यात फायबरचे गतिरोधक बनविण्यात आले़ मात्र, रस्त्याच्या कडेला असलेल्या कच्च्या रस्त्याचे सपाटीकरण करण्यात येत असल्यामुळे त्या रस्त्यावरून वाहनधारकांनी जावू नये म्हणून गतिरोधकाला लागून दगडाचे आणि खडीचे गतिरोधक बनविण्यात आले़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव