शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

व्यापारी व सीसीआयच्या सेटींगमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 11:58 IST

नियमांना शेतकरी कंटाळले

अजय पाटील जळगाव : कापूस उत्पादक शेतकºयांचा व्यथा संपण्याचे नाव घेत नाही. सीसीआयच्या शासकीय खरेदी केंद्रावर शेतकºयांचा मालावर नियम व अटींचा फास घालून शेतकºयांची लूट सुरु असल्याचा प्रकार समोर येत आहेत. जो माल सीसीआय नियमांमध्ये नसल्याचे सांगत खरेदी करत नाही, असा माल शेतकºयांना कमी भावात खासगी व्यापाºयांकडे विक्री करावा लागत आहे. त्याच व्यापाºयांकडून सीसीआयच्या केंद्रावर व्यापाºयांना व सीसीआयलाही फायदा होईल अशा भावात खरेदी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.व्यापारी व सीसीआयच्या अधिकाºयांनी केलेल्या सेटींगमुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. मात्र, शेतकºयांसाठी नेहमी कैवारी असलेल्या लोकप्रतिनिधींकडून या प्रकाराबद्दल चकार शब्द देखील काढला जात नसून, शेतकºयांचा नावावर राजकारण करणाºया संघटनांनी देखील या प्रकारावर डोळेझाक करणारी भूमिका घेतली आहे. त्यामुळे निसर्गाच्या अवकृपेमुळे आधीच मेटाकुटीस आलेला शेतकरी व्यापारी व सीसीआयच्या अधिकाºयांचा साठमारीमुळे मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे.शेतकºयांना फायदा नाहीचशेतकºयांना हमी भाव सोडाच नफा होईल एवढाही फायदा होत नसल्याचे चित्र कापूस खरेदी केंद्रावर दिसून येत आहे.मात्र, शेतकºयांचे प्रश्न सुटतील यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसून येत नाही, अशी स्थिती आहे.शेतीच्या उताºयावरील नियमांमुळे शेतकरी ग्रस्तसीसीआयच्या केंद्रावर आपला माल घेवून आल्यानंतर शेतकºयांना अनेक नियम व अटींना सामोरे जावे लागते. कापसाची आर्द्रता तपासली जाते. ८ किंवा त्यापेक्षा कमी टक्के आर्द्रता असेल तरच शेतकºयांना ५ हजार ५५० चा हमी भाव दिला जातो. ८ ते १२ टक्के आर्द्रता असेल तर ५२०० ते ५३०० व १२ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर मालच खरेदी केला जात नाही. यंदा पाऊस असल्याने कापसात आर्द्रतेचे प्रमाण हे जास्तच आहे. तसेच एका दिवसात एका शेतकºयाकडून ४० क्विंटलच कापूस खरेदी केली जातो. ४० क्विंटल पेक्षा जास्त माल असेल तर शेतकºयाला दुसºया दिवशी तो माल विक्रीसाठी आणावा लागतो. शेतकºयांना माल विक्री करताना शेतीचा उत्तारा बंधनकारक आहे. मात्र, एखादा शेतकरी इतरांची शेती करत असेल अशा शेतकºयांना उतारा सादर करताना अडचणी येतात. माल खरेदी केल्यानंतर तत्काळ पैसे न मिळता आठ ते दहा दिवस शेतकºयाला वाट पहावी लागते. अशा अनेक नियम व अटींमुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे.असा चालतो सेटींगचा खेळ...आर्द्रतेचा नावार जो माल सीसीआयकडून नाकारला जातो. तो माल शेतकºयांना नाईलाजास्तव व्यापाºयांना ४५०० ते ४६०० इतक्या दराने विक्री करावा लागतो. हाच माल व्यापाºयांकडून सीसीआयच्या केंद्रावर ५ हजार ते ५२०० रुपये दराने खरेदी केला जातो. यामुळे व्यापाºयांना प्रतिक्विंटल मागे ३०० ते ४०० रुपयांचा फायदा होत आहे. तर सीसीआयला देखील हमीभावात माल खरेदी करावा लागत नसल्याने २०० ते ३०० रुपयांचा फायदा होत आहे. तर दुसरीकडे कापूस पिकविणाºया शेतकºयाला हमीभाव मिळत नसल्याने तब्बल ८०० ते १ हजार रुपयांपर्यंतचे नुकसान सहन करावे लागत आहे. व्यापारी व सीसीआयने केलेल्या सेटींगमुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे.चीनमध्ये मागणी नसल्याने भाव स्थिर...ंअमेरिका व चीनमधील ट्रेडवॉर व भारताच्या कापसाचे आंतरराष्टÑीय बाजारात जास्त असलेल्या भावामुळे भारतातील कापसाच्या निर्यातमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत ५० टक्क्यांची घट झाली आहे. मुख्य निर्यातदार देश असलेल्या चीनने देखील भारताकडून कापसाची खरेदी थांबवली आहे. यामुळे सध्या भारताचा कापूस केवळ बांग्लादेशमध्येच निर्यात केला जात आहे. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात कापसाचा साठा होत आहे. याचा परिणाम कापसाच्या भावावर होत असून, शासनाच्या हमीभाव ५ हजार ५५० या रक्कमेवरच भाव स्थिर आहेत. ट्रेडवॉरवर परिणाम झाला किंवा कापसाची मागणी वाढली तरच कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ जानेवारीपर्यंत तरी कापसाच्या भावात कोणतीही घट किंवा वाढ होण्याची शक्यता नाही.शेतकºयांची सासीआयच्या केंद्रावर अक्षरश लुट सुरु आहे. मोठ्या प्रमाणात नियम व अटी शेतकºयांवर लादल्या जात असून, शेतकºयाला आपला माल व्यापाºयांना कमी भावात विक्री करण्यासाठी भाग पाडले जात आहे. व्यापारी शेतकºयांकडू कमी दरात माल घेतो व तोच माल सीसीआयला जास्त भावात विक्री करतो. व्यापाºयांकडून जर सीसीआय माल खरेदी करत आहे. तर शेतकºयांकडून खरेदी करण्यास काय अडचण आहे?-दीपक मंगल पाटील, शेतकरी, आव्हाणशेतकºयांना शासकीय खरेदी केंद्रावर माल आणताना कोरडा माल आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बाजारभावापेक्षा जर ५०० रुपये जादा दर सीसीआयच्या केंद्रावर कापूस उत्पादक शेतकºयाला मिळत असेल तर सीसीआयकडून चांगलाच माल खरेदी केला जाईल. सीसीआयचे नियम हे शासनाने ठरवून दिलेले आहेत.-कैलास चौधरी, सभापती, बाजार समिती, जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव