शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दररोजच्या पावसाने कापूस सडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 19:24 IST

गेल्या महिनाभरापासून सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कापसाच्या तयार झालेल्या कैऱ्या सडल्या आहेत.

ठळक मुद्देमका आडवा झाला शेतकरी हवालदिलसततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानजमीन ओली असल्याने शेतात जाऊनही कैरी तोडतादेखील येत नाही

कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : गेल्या महिनाभरापासून सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कापसाच्या तयार झालेल्या कैऱ्या सडल्या आहेत. मक्यावर लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झालाच. त्यात पावसासोबतच्या वाºयामुळे मका आडवा झाला आहे. उडीद, मूग सडले आहेत. शेतकरी हवालदिल झाला असून सरसकट कर्जमाफी, गेल्या वर्षीचा दुष्काळाचा निधी दिला. लाईट बिलांबाबतचा न घेतलेला निर्णय यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे.तालुक्यात एकूण ३४,७११ हेक्टर पेरणी क्षेत्र असून, कापूस १८, ४२७, कडधान्य ४,६००, तृणधान्य ७,४७०, गळीत धान्य ३,८४५ हेक्टर क्षेत्रात आहे. त्यात केळी व फळबाग शून्य एकर आहे. सततच्या पावसाने जमिनीतून पाणी झिरपत आहे. यामुळे काही शेतातील कापसाची झाडे कोलमडून पडली आहेत. कपाशीच्या एका झाडाला ३० ते ४० कैरी पक्की झालेली होती. ती सगळी सडून काळी पडली आहे. जमीन ओली असल्याने शेतात जाऊनही कैरी तोडतादेखील येत नाही. तोडून आणली तरी सूर्याचे दर्शन होत नसल्याने सुकवतादेखील येत नाही. सुकवला तरी हा कापूस कुणी व्यापारी घेणार नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे.मक्यावर लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतातील मक्याची अर्ध्यावर कणसे या अळीने खाऊन टाकली आहेत, तर पावसासोबतच्या वाºयामुळे अनेक शेतातील मका आडवा झाला आहे. उडीद व मुगाच्या पक्क्या झालेल्या शेंगा सततच्या पावसामुळे तोडता आल्या नाहीत. त्यामुळे हे पीकसुद्धा वाया गेले आहे. या झालेल्या नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करावेत, विमा कंपन्यांनी योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.सरसकट कर्जमाफीच्या घोषणेमुळे वि.का. संस्थेच्या सभासदांच्या थकबाकीचे प्रमाणात प्रचंड वाढले आहे. संस्था तोट्यात आहेत. दुष्काळी मदत नाही, यंदा तर सगळीच पिके सततच्या पावसाने वाया गेली आहेत. महसूल विभागाने पंचनामे ताबडतोब करावेत. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी.-दीपक वाणी, चेअरमन, वि.का. सहकारी संस्था, कासोदा

टॅग्स :Rainपाऊस