शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल फायनलपूर्वी मोठी बातमी! दोन्ही संघांचे दोन महत्वाचे खेळाडू अनफिट; आणखी एक खेळाडू... 
2
“राज ठाकरे आहेत, तोपर्यंत कुणीही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाहीत”; मनसे नेते थेट बोलले
3
IPL 2025 Final: RCB की PBKS? पाऊस पडला तर कुणाचं स्वप्न जाईल 'पाण्यात'? नियमात स्पष्ट म्हटलंय की...
4
१ लाखाचे २३,००,०००! तेही फक्त ५ वर्षांत; 'पॉवर'फुल्ल स्टॉकने 'मीटर'च टाकला राव!
5
या प्रेमाला म्हणावं तरी काय? ज्याच्याशी पोटच्या मुलीचं लग्न ठरवलं, त्याच्याशीच आईनं बांधली लग्नगाठ!
6
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात, माजी मंत्र्याशीही होतं कनेक्शन!
7
IPL 2025: आयपीएल जिंकणारा संघ होणार मालामाल! उपविजेत्यालाही मिळणार 'इतके' कोटी रुपये
8
खळबळजनक! लेकाला हवी होती BMW; वडिलांनी दुसरी कार घेताच तरुणाने संपवलं जीवन
9
युक्रेनला हवे होते तेच रशियाने केले! एक हल्ला होताच विमाने ४०००-५५०० किमी आत नेऊन ठेवली, अन्...
10
“तुमच्या १० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, बाळासाहेबांनी...”; राऊतांची भाजपावर टीका
11
आग लगने वाली है! 'धुरंधर' सेटवरील रणवीर अन् संजूबाबाचा व्हिडिओ लीक; चाहत्यांना आठवला 'खिलजी'
12
भारत आणि रशियाच्या मैत्रीने अमेरिकेला जळजळ; शस्त्रे खरेदीवर ट्रम्प सरकारने घेतला आक्षेप
13
इवल्याशा पक्ष्याच्या धडकेमुळे महाकाय विमानाला भगदाड कसं पडलं? असं आहे त्यामागचं कारण
14
परेश रावल यांची खंत, 'हेरा फेरी ३'मधून साइडलाइन केल्यामुळे घेतली एक्झिट?, म्हणाले - "मी तर हिरो होतो..."
15
Corona Virus Update: कोरोनाने घेतले आणखी ५ बळी; सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार पार! महाराष्ट्रात किती रुग्ण?
16
Mumbai Suicide: मुंबईतील प्रसिद्ध मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी, ३८ वर्षीय व्यक्तीच्या मृत्युने परिसरात खळबळ
17
एसबीआय, पीएनबी, बीओबीसब ५ सरकारी बँका बनवणार एकत्रित कंपनी, काय आहे प्लान?
18
थायलंड फिरून परतला, पण एकटा नाही...! तरुणाची बॅग उघडताच मुंबई विमानतळावर सगळ्यांनाच बसला धक्का
19
ज्याला कष्टानं बनवलं, आता तोच खातोय नोकरी! मायक्रोसॉफ्टमध्ये दुसऱ्यांदा मोठी नोकरकपात
20
कमल हासन यांच्या कन्नड-तमिळ भाषेबाबत केलेल्या वक्तव्याने वाद; हायकोर्टाने फटकारले...

"ठाणे एलिव्हेटेड रोड टनेल प्रकल्पात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्यावा", संजय राऊतांची मागणी

By सुनील पाटील | Updated: May 31, 2025 14:31 IST

Sanjay Raut News: मेघा इंजीनियरिंग नावाच्या कंपनीने भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शेकडो कोटींचा निधी दिला असून, याच पैशातून आमदार-खासदारांसाठी मते आणि यंत्रणा विकत घेण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी शनिवारी जळगावात पत्रकार परिषदेत केला.

- सुनील पाटीलजळगाव - ठाणे एलिव्हेटेड रोड टनेल प्रकल्पातून ३ हजार कोटी रुपये संबंधित खात्याचा मंत्री मिळवतो ही महाराष्ट्र राज्याची लूट आहे. अशा हजारो कोटीतून मागील विधानसभेची निवडणूक लढली गेली. मेघा इंजीनियरिंग नावाच्या कंपनीने भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शेकडो कोटींचा निधी दिला असून, याच पैशातून आमदार-खासदारांसाठी मते आणि यंत्रणा विकत घेण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी शनिवारी जळगावात पत्रकार परिषदेत केला.

१४ हजार कोटी रुपयांचे टनेल प्रकल्प या कंपनीला देण्याचा घाट घातला होता, मात्र दुसऱ्या कंपनीने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले पाहिजेत, असे राऊत म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुखवटा टरटर फाडून टाकला आहे, असे म्हणत, राज्यात चालणारा भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयाने देशासमोर आणल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा मागायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.

मंत्रीमंडळ नव्हे, 'देवेंद्र मध्यवर्ती कारागृह'देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकायला तयार नाहीत, म्हणूनच 'सामना'च्या अग्रलेखातून 'देवेंद्र मध्यवर्ती कारागृह' या माध्यमातून विस्तृत लेखन केले आहे, असे खासदार राऊत यांनी सांगितले. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात तुरुंगात जायला पाहिजे असे सर्व लोक आहेत.त्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाचे नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह करत मंत्रिमंडळाला कारागृहाचा दर्जा दिला पाहिजे, अशी उपरोधिक टीकाही राऊत यांनी केली.

दोन्ही पवार एकत्रच्या चर्चा हवेतीलराष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चा सध्या हवेत आहेत. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचा वारसा घेऊन पुढे चालले असून, त्यांचा पक्ष फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यासारखा आदर्श नेता धर्मांध आणि जातीय शक्तींबरोबर एकत्र येईल, असे त्यांच्या समर्थकांना आणि सहकाऱ्यांना वाटत नाही, असे राऊत यांनी सांगितले.

कर्जमाफीवर तिन्ही पक्षांचे हातवरशेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते, मात्र आता हे तीनही पक्ष हात वर करत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. त्यांनी देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते आणि एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करत, खोटेपणाचा लाभ तुम्हीही घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला यावर भूमिका घ्यावी लागेल, असे म्हटले. महिलांना २१०० रुपये देण्याची घोषणाही कागदावरच असून, आता ५०० रुपयांपर्यंत आले आहेत, अशी टीका त्यांनी केली. ईव्हीएम आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून सत्ताधाऱ्यांनी विजय मिळवला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आम्ही अनिल गोटेंच्या पाठीशीचधुळे शासकीय विश्रामगृहातील प्रकरणात आपण अनिल गोटे यांच्या पाठीशीच आहोत. अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांना नजराणा देण्यासाठी ही रक्कम होती आणि खोतकर हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आहेत. दोन कोटीच्या आसपास रक्कम त्यांच्या पीए जवळ सापडली असून, १५ कोटींचा हिशोब होता आणि १० कोटी त्यांच्या जालन्याच्या घरी जमा करायचे होते असा दावा राऊत यांनी केला. भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकू असं सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत काय केलं? कुणावर गुन्हे दाखल केले? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. एसआयटीची स्थापना केली, मात्र त्याचे सदस्य कोण आहेत याची माहिती दिली आहे का, असेही त्यांनी विचारले. लोकांना फसवण्याचे धंदे त्यांनी बंद केले पाहिजे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदे