शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

रस्त्यांच्या दुरुस्तीवर मनपाकडून पाच वर्षात कोट्यवधींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:20 IST

जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय झाली असून, नवीन रस्त्यांच्या कामासाठी मनपाला निधीची गरज आहे. मात्र, दुसरीकडे ...

जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय झाली असून, नवीन रस्त्यांच्या कामासाठी मनपाला निधीची गरज आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील काही प्रमुख रस्त्यांचा दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने पाच वर्षात कोट्यवधींचा खर्च केला असून, याच रस्त्यांची प्रत्येक सहा महिन्यात दुरुस्ती करण्यापेक्षा जर सिमेंटचेच रस्ते केले असते तरी मनपाला आपल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीची बचत करता येऊ शकली असती. आता मनपाने शहरातील सहा रस्ते बांधकाम विभागाकडे वर्ग केल्याने मुख्य रस्ते तरी सिमेंटचे करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

महापालिका प्रशासनाने गेल्या तीन वर्षात शहरातील रस्त्यांचा दुरुस्तीच्या कामावर सुमारे १० कोटींवर निधी खर्च केला आहे. यामध्ये काही कामे ठेकेदारांकडून तर काही कामे मनपाकडूनच करण्यात आली आहेत. मात्र, या कामांवर प्रत्येक वर्षी कोट्यवधींचा खर्च करण्यापेक्षा जर नवीन रस्तेच किंवा सिमेंटचे रस्ते केले असते तरी शहरातील नागरिकांना आज ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्या समस्येपासून नागरिकांना दिलासा मिळू शकला असता.

प्रमुख रस्त्यांवर गेल्या तीन वर्षात दुरुस्तीसाठी झालेला खर्च (अंदाजे)

चित्रा चौक- कोर्ट चौक - गणेश कॉलनी चौक - ३४ लाख

टॉवर चौक- स्वातंत्र्य चौक - काव्यरत्नावली चौक - ६५ लाख

शिरसोली नाका - इच्छादेवी- पांडे चौक - बेंडाळे चौक - ७५ लाख

पिंप्राळा गेट- ख्वॉजामिया चौक- माहेश्वर चौक - सिंधी कॉलनी - ४५ लाख

डांबरी व सिमेंट रस्त्यांमधील तीन किमीच्या कामाची तुलना

डांबरी रस्ता - सिमेंट रस्ता

३५ लाख खर्च - ७० लाख खर्च

२ ते ३ वर्ष कालमर्यादा - १० ते १५ वर्ष कालमर्यादा

जास्त पाऊस झाल्यास १ वर्षात रस्त्यावर पडतात खड्डे - जास्त पाऊस पडला तरी ५ ते ७ वर्ष रस्त्याला काहीही फरक पडणार नाही

दोन वर्षानंतर दुरुस्तीसाठी वर्षाला १० ते १५ लाखांचा खर्च - १० ते १५ वर्षांपर्यंत या रस्त्यावर दुरुस्तीचे काम नाही.

अंदाजे दहा वर्षांनंतर नवीन काम व दुरुस्ती मिळून एक कोटीच्यावर दुरुस्तीचा खर्च - अंदाजे दहा वर्षांनंतरही दुरुस्तीवर फारसा खर्च येत नाही

(ही तुलना नागपूर मेट्रोचे सेवानिवृत्त अभियंता विनायक काळे यांच्या अभ्यासातून करण्यात आली आहे.)

बांधकाम विभागाकडील रस्ते सिमेंटचे झाल्यास नागरिकांना फायदा

महापालिकेच्या हद्दीतील २० किमीचे सहा रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्यांची देखभाल दुरुस्तीचे व नवीन रस्त्यांचे कामदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार आहे. त्यामुळे या रस्त्यांचा कामासाठी निधी नसल्याची तक्रार मनपाप्रमाणे बांधकाम विभाग करू शकत नाही. हे २० किमीचे रस्ते जर बांधकाम विभागाने डांबरीऐवजी सिमेंटचे केले तर शहरातील नागरिकांना पुढील अनेक वर्ष रस्त्यांच्या समस्येपासून दिलासा मिळू शकणार आहे.

बांधकाम विभागाकडे हस्तांतर झालेले सहा रस्ते

१. अजिंठा चौक-नेरी नाका - चित्रा चौक- टॉवर चौक

२. शिरसोली नाका- इच्छादेवी चौक - पांडे चौक - बेंडाळे चौक - चित्रा चौक- टॉवर चौक

३. बांभोरी - निमखेडी - दूध फेडरेशन - शिवाजीनगर उड्डाणपूल - टॉवर चौक

४. टॉवर चौक - स्वातंत्र्य चौक - आकाशवाणी चौक - काव्यरत्नावली चौक

५. टॉवर चौक ते आसोदा रेल्वे गेट

६. टॉवर चौक - शिवाजीनगर उड्डाणपूल - लाकूड पेठ - केसी पार्क