शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

महामंडळाची दरमहा १० कोटींची शासनाकडे वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:15 IST

एसटी महामंडळ : वसुलीच्या उत्पन्नातुन होतो कर्मचाऱ्यांचा पगार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग ...

एसटी महामंडळ : वसुलीच्या उत्पन्नातुन होतो कर्मचाऱ्यांचा पगार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव यासह विद्यार्थी व विविध पुरस्कार प्राप्त नागरीकांना बस मध्ये प्रवासात सवलत दिली जाते. तर या सवलतीची रक्कम मिळण्याबाबत दर महिन्याला महामंडळाच्या मुख्य कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला जातो व तेथून शासनाकडे पाठवला जातो. त्यानुसार जळगाव विभागातून विविध शासकीय सवलतींच्या पोटी महामंडळाकडे दरमहा १० कोटींच्या वसुलीचा प्रस्ताव पाठवण्यात येत असतो. कोरोनामुळे प्रवासी संख्या घटल्याने प्रस्तावाची रक्कम कमी झाली असली तरी, या वसुलीच्या रक्कमेतून कर्मचाऱ्यांचे पगारासाठी मोठा हातभार लागत असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.

महामंडळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार इयत्ता १ ली ते १२ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना अहिल्या बाई होळकर योजने अंतर्गत शिक्षणासाठी मोफत पास दिला जातो. असे एकूण जळगाव विभागातील लाभार्थी विद्यार्थिनींची संख्या २१ हजार ७५९ असून याचे प्रवासी भाडे मूल्य २ कोटी ४४ लाख ९५ हजार ४८ रुपये इतकी रक्कम होते. तसेच ज्येष्ठ नागरिकांची संख्या २ लाख ६५ हजार ४३० असून, याचे प्रवासी भाडे मूल्य ३ कोटी ५० लाख १८ हजार ६५६ रूपये होतात. तसेच विविध शासकीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थी, दिव्यांग बांधव, अधिस्वीकृती पत्रकार, गंभीर व्याधी अशा प्रकारच्या विविध घटकातील लाभार्थ्यांना महामंडळ प्रशासनाकडून सवलत दिली जाते व सवलतीच्या रक्कमेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जात असतो.

इन्फो :

१) जिल्ह्यातील एकूण आगार : ११

२) एकूण कर्मचारी साडेचार हजार

३) सध्याचे रोजचे उत्पन्न दीड ते दोन लाख

४) महिन्याला पगारावर होणारा खर्च ८ कोटी

इन्फो :

वसूलीच्या उत्पन्नाचा मोठा आधार

प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सवलती पोटी जी रक्कम वसुल होते. ती रक्कम वसुलीसाठी जळगाव विभागातून महामंडळाच्या मुख्य कार्यालयाकडे वसुलीचा प्रस्ताव पाठवला जातो व त्या ठिकाणाहुन तो प्रस्ताव शासनाकडे पाठवला जातो. त्यानंतर शासनाकडून दिली जाणारी रक्कम आमच्याकडे न येता, मुख्य कार्यालयाकडे वर्ग होते. या रक्कमेतुन महामंडळ प्रशासन पगारासाठी किंवा इतर खर्चासाठीही पैसा वापरते.

भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव

इन्फो :

तर कर्मचाऱ्यांवर पुन्हा आले असते आर्थिक संकट

गेल्या वर्षी बससेवा बंद असल्याने, उत्पन्नही बंद होते. यामुळे कर्मचाऱ्यांचे अनेक महिने पगार रखडल्याने, त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला.मात्र, यंदा शासनाने एका कर्मचाऱ्याच्या मृत्युच्या घटनेनंतर महामंडळाची जबाबदारी उचल्याने पगार वेळेवर होत आहेत.

संतोष धाडी, वाहक

राज्य शासनाने आर्थिक संकटात सापडलेल्या महामंडळ प्रशासनाला मदत केल्यामुळे, सध्या कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार होत आहेत. अन्यथा पुन्हा गेल्या वर्षा सारखी परिस्थिती निर्माण झाली असती. सध्या वेळेवर पगार होत असल्याने कर्मचारी ताण तणावापासून दूर आहेत.

भालचंद्र हटकर, चालक

सध्या महामंडळ प्रशासनाचे शासनाकडे विविध सवलतींचे जे पैसे थकीत होते. ते शासनातर्फे टप्प्या-टप्प्याने देण्यात येत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत आहे. पगारा अभावी तर गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना खूप आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

रविंद्र पाटील, वाहक