शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

महामंडळाची दरमहा १० कोटींची शासनाकडे वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:15 IST

एसटी महामंडळ : वसुलीच्या उत्पन्नातुन होतो कर्मचाऱ्यांचा पगार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग ...

एसटी महामंडळ : वसुलीच्या उत्पन्नातुन होतो कर्मचाऱ्यांचा पगार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव यासह विद्यार्थी व विविध पुरस्कार प्राप्त नागरीकांना बस मध्ये प्रवासात सवलत दिली जाते. तर या सवलतीची रक्कम मिळण्याबाबत दर महिन्याला महामंडळाच्या मुख्य कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला जातो व तेथून शासनाकडे पाठवला जातो. त्यानुसार जळगाव विभागातून विविध शासकीय सवलतींच्या पोटी महामंडळाकडे दरमहा १० कोटींच्या वसुलीचा प्रस्ताव पाठवण्यात येत असतो. कोरोनामुळे प्रवासी संख्या घटल्याने प्रस्तावाची रक्कम कमी झाली असली तरी, या वसुलीच्या रक्कमेतून कर्मचाऱ्यांचे पगारासाठी मोठा हातभार लागत असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.

महामंडळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार इयत्ता १ ली ते १२ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना अहिल्या बाई होळकर योजने अंतर्गत शिक्षणासाठी मोफत पास दिला जातो. असे एकूण जळगाव विभागातील लाभार्थी विद्यार्थिनींची संख्या २१ हजार ७५९ असून याचे प्रवासी भाडे मूल्य २ कोटी ४४ लाख ९५ हजार ४८ रुपये इतकी रक्कम होते. तसेच ज्येष्ठ नागरिकांची संख्या २ लाख ६५ हजार ४३० असून, याचे प्रवासी भाडे मूल्य ३ कोटी ५० लाख १८ हजार ६५६ रूपये होतात. तसेच विविध शासकीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थी, दिव्यांग बांधव, अधिस्वीकृती पत्रकार, गंभीर व्याधी अशा प्रकारच्या विविध घटकातील लाभार्थ्यांना महामंडळ प्रशासनाकडून सवलत दिली जाते व सवलतीच्या रक्कमेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जात असतो.

इन्फो :

१) जिल्ह्यातील एकूण आगार : ११

२) एकूण कर्मचारी साडेचार हजार

३) सध्याचे रोजचे उत्पन्न दीड ते दोन लाख

४) महिन्याला पगारावर होणारा खर्च ८ कोटी

इन्फो :

वसूलीच्या उत्पन्नाचा मोठा आधार

प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सवलती पोटी जी रक्कम वसुल होते. ती रक्कम वसुलीसाठी जळगाव विभागातून महामंडळाच्या मुख्य कार्यालयाकडे वसुलीचा प्रस्ताव पाठवला जातो व त्या ठिकाणाहुन तो प्रस्ताव शासनाकडे पाठवला जातो. त्यानंतर शासनाकडून दिली जाणारी रक्कम आमच्याकडे न येता, मुख्य कार्यालयाकडे वर्ग होते. या रक्कमेतुन महामंडळ प्रशासन पगारासाठी किंवा इतर खर्चासाठीही पैसा वापरते.

भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव

इन्फो :

तर कर्मचाऱ्यांवर पुन्हा आले असते आर्थिक संकट

गेल्या वर्षी बससेवा बंद असल्याने, उत्पन्नही बंद होते. यामुळे कर्मचाऱ्यांचे अनेक महिने पगार रखडल्याने, त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला.मात्र, यंदा शासनाने एका कर्मचाऱ्याच्या मृत्युच्या घटनेनंतर महामंडळाची जबाबदारी उचल्याने पगार वेळेवर होत आहेत.

संतोष धाडी, वाहक

राज्य शासनाने आर्थिक संकटात सापडलेल्या महामंडळ प्रशासनाला मदत केल्यामुळे, सध्या कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार होत आहेत. अन्यथा पुन्हा गेल्या वर्षा सारखी परिस्थिती निर्माण झाली असती. सध्या वेळेवर पगार होत असल्याने कर्मचारी ताण तणावापासून दूर आहेत.

भालचंद्र हटकर, चालक

सध्या महामंडळ प्रशासनाचे शासनाकडे विविध सवलतींचे जे पैसे थकीत होते. ते शासनातर्फे टप्प्या-टप्प्याने देण्यात येत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत आहे. पगारा अभावी तर गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना खूप आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

रविंद्र पाटील, वाहक