शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

संत सखाराम महाराज यात्रेवर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 22:38 IST

संत सखाराम महाराज यात्रोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने बोरी नदीचे वाळवंट रिक्त राहणार आहे.

ठळक मुद्देजागेवरच रथोत्सव.यंदा पौर्णिमेऐवजी प्रतिपदेला होणार पालखी सोहळा, ऑनलाईन प्रक्षेपण होणार.

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : यंदाही संत सखाराम महाराज यात्रोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने बोरी नदीचे वाळवंट रिक्त राहणार आहे. मात्र मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अक्षय तृतीयेला स्तंभरोपण, जागेवरच रथपूजा, समाधी मंदिराला पालखीची प्रदक्षिणा घालण्यात येणार असून भाविकांनी गर्दी करू नये. त्यांच्यासाठी हा सोहळा ऑनलाईन करण्यात येणार असून त्यांनी ऑनलाईन लाभ घ्यावा, असे आवाहन संत सखाराम महाराजांचे गादी पुरुष हभप प्रसाद महाराज यांनी केले आहे.

दरवर्षी अक्षय तृतीयेपासून वाडी संस्थानतर्फे बोरी नदीपात्रात संत सखाराम महाराज यात्रोत्सव साजरा होत असतो. नदीपात्रात पाळणे, फुगे, काकड्या, खाद्यपदार्थ वस्तू, मौत का कुवा, विविध मनोरंजनाची खेळणी, जादूचे प्रयोग, घरगुती वस्तूंची दुकाने, मीना बाजार, महिलांच्या विविध आभूषणाची दुकाने, भेळ, पाणीपुरी, पावभाजी, उसाचा रस, आईस्क्रीम अशी दुकाने थाटलेली असतात. संपूर्ण बोरी नदी परिसर लायटिंग रोषणाईने नटलेला असतो. संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक रथ आणि पालखी मिरवणुकीला हजेरी लावत असतात. मात्र सतत दुसऱ्या वर्षीदेखील कोरोनाने कहर मांडला असून शासनाने यात्रा आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातल्याने यंदाही यात्रा रद्द करण्यात आली आहे.

परंपरेप्रमाणे यंदाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत १४ मे रोजी अक्षय तृतीयेला सकाळी साडेनऊ वाजता वाडी संस्थानमध्ये स्तंभारोपण, पूजा करण्यात येईल. त्यांनतर दशमीला २२ रोजी बेलापूरकर महाराज यांच्या दिंडीचे आगमन होत असते. मात्र यंदाही बेलापूरकर महाराज चारचाकी वाहनाने अमळनेरला येतील व समाधीवर त्यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल. २३ रोजी एकादशीला संध्याकाळी साडेसात वाजता रथोत्सव असतो. गेल्या वर्षाप्रमाणे गावातून मिरवणूक न काढता रथाला बाहेर काढून धुण्यात येईल. वाडी संस्थानमध्ये लालजींची मूर्ती ठेवून पूजा करून पाच पावले रथ ओढून पुन्हा जागेवर विसर्जन करण्यात येईल.

द्वादशीला २४ रोजी अंबर्शी टेकडीवर बेलापूरकर महाराज यांचा खिरापतीचा कार्यक्रम होईल. त्रयोदशीला २५ रोजी गरुड हनुमंताचे वहन असते. मात्र याच दिवशी कृतीकाक्षय असल्याने पुण्यतिथीचा कार्यक्रम होईल. पुण्यतिथीला दरवर्षी सव्वा पाच पोत्यांचा भात करून त्याची पूजा करून रात्री लोकांना प्रसाद वाटप केला जातो. यावर्षीही मात्र फक्त सव्वा पोत्याचा भात केला जाईल. रथाच्या पाचव्या दिवशी पौर्णिमेला पालखी मिरवणूक असते. मात्र यंदा प्रतिपदेला पालखी सोहळा होईल. मात्र मिरवणूक न काढता सकाळी ६ वाजता पूजा करून बोरी नदी पात्रात समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालून तेथेच विसर्जन करण्यात येईल.

मोजक्या लोकांमध्ये भजन, काल्याचे कीर्तन आदी कार्यक्रम होतील. कोरोनामुळे कोणत्याही भाविकांनी गर्दी करू नये. त्यांच्यासाठी ऑनलाईन कार्यक्रम प्रदर्शित करण्यात येणार आहे असे आवाहन प्रसाद महाराजांनी केले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरcorona virusकोरोना वायरस बातम्याFairजत्रा