शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळातील बालक-पालक संबंध अन्‌ बदललेली मानसिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST

प्रसंग दोन : कोरोनामुळे जीवनव्यवहार बंद. शाळा-महाविद्यालयेही बंद. त्यामुळे दहावीतील ती विद्यार्थिनीसारखी घरात मोबाइल, व्हॉट्‌सॲपच्या माध्यमातून ती अभ्यास पूर्ण ...

प्रसंग दोन : कोरोनामुळे जीवनव्यवहार बंद. शाळा-महाविद्यालयेही बंद. त्यामुळे दहावीतील ती विद्यार्थिनीसारखी घरात मोबाइल, व्हॉट्‌सॲपच्या माध्यमातून ती अभ्यास पूर्ण करू इच्छीत होती. पण घरच्यांची खूप बंधनं. त्यांनी तिचा ‘ऑनलाइन’ असलेला खासगी क्लास बंद केला. भीतीने मैत्रिणींशी बोलणं बंद करायला लावलं. ती सारखी घरात. शेवटी तिची मनस्थिती बिघडली. सध्या तिच्यावर दवाखान्यात औषधोपचार सुरू आहेत.

-वरील दोन्ही प्रसंगांबाबत सांगायचं तर कोरोना काळातील बालक-पालक संबंधात कुठे गोडवा, तर कुठे कटुता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये जी सर्जनशीलता आहे ती जिवंत ठेवण्याची, विद्यार्थ्यांच्या शंकांना प्रश्नांना उत्तरं देण्याची, सुसंबंद्ध प्रश्न विचारण्याची व त्यांना विविध समस्यांवर विचार करण्याची मुभा दिली पाहिजे. ती खूपशा घरांमध्ये दिली जात नाहीये. उलट ऑनलाइन शिक्षणामुळे जो स्क्रीनटाइम वाढलाय त्याबद्दल खूप बोललं जातंय. स्मार्टफोन, संगणक यांचा लहान मुलांकडून होणारा वाढता वापर हा समाजात (प्रचंड) चिंतेचा विषय बनलाय आणि टाळेबंदीच्या निमित्ताने शाळा आणि खासगी शिकवणीवर्ग विद्यार्थ्यांवर ‘ऑनलाइन’ शिक्षणाचा भडीमार कसा करताय यावरही खूप बोललं जातेय. एक गोष्ट तेवढीच खरी आहे की, विद्यार्थ्यांच्या वयानुसार ऑनलाइन शिक्षणाचा दिवसभरातील कालावधी ठरविण्याबाबत विचार कुणीही केला नाही आणि तासन्‌तास स्क्रीनसमोर बसवण्याची मुलांची खरंच क्षमता नसते, हेही आम्ही ध्यानी घेतले नाही. असो.

इथे विनोबा भावेंचा एक शिक्षणविचार मला द्यावासा वाटतो. ते म्हणायचे, ‘घर शाळेत शिरलं पाहिजे आणि शाळा घरात घुसली पाहिजे’ विनोबांना यातून काय सांगायचे होते, की शाळा आणि घर यांच्यातले द्वैत नाहीसे होत त्या दोहोंत ‘सांगड’ घातली गेली पाहिजे. कोरोनाकाळात नेमकी हीच ‘सांगड’ ना पालकांनी आपल्या पाल्याबाबत, ना शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांबाबत घातली नाही. वा तसे उपक्रम, प्रयोग समोर ठेवत त्या-त्या वयोगटांतील मुलांना प्रोत्साहित केले नाही. (जे प्रयोग झालं ते जेमतेम ३० टक्के झालेत.)

-अस म्हटलं जात की, मुलांना अगोदर ‘जीवनाची’साधी पण महत्त्वपूर्ण ओळख करून द्या. नंतर पाठ्यपुस्तकं, अभ्यासक्रम, पाठांतर यांची रितसर, तीदेखील ‘कृतींद्वारे’ ओळख करून द्या. पण आपण नेहमीच थेअरीला महत्त्व देत प्रॅक्टिकलला मागे सारतो, जी बाब पूर्णत: विसंगतीने भरलेली आहे. खरं पाहिलं तर काळ कोरोनाचा असो वा नसो. आम्हा पालकांना मुलांची ‘परिभाषा’ समजावून घेत त्याचा नीटसा अर्थ लावता येत नाही. सुसंवाद साधत छोटे-छोटे प्रश्न सोडविता येत नाहीत.

- ‘मैने सुना, भुल गया । मैने देखा, याद रहा। मैने करकेे देखा, मै समझ गया।।’ हा जो मंत्र आहे, त्यातील ‘मैने करके देखा, मै समझ गया ।’ हा भाग खूपच महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती, समजशक्ती, अभिव्यक्तीची शक्ती ओळखत, आपल्या पाल्यांना ‘पुढे व्हा’ हा मंत्र देतात तेव्हा तेेव्हा ती मुलं पुढे जातात. कोरोनाकाळात नेमकी हीच गोष्ट पालक विसरला. (म्हणूनच मी सुरुवातीला दोन प्रसंग दिलेत) वा आजूबाजूच्या परिस्थितीने गोंधळत मुलांनाही त्यात सामील करून घेत अधिक गोंधळाचं वातावरण तयार करती झाली. असो.

शेवटी अजून एक मुद्दा. सतत स्क्रीनकडे पाहिल्याने मुलांना डोळ्यांचे, पोटाचे वा एकूण शरीराचे जे वेगवेगळे विकार जडले ते खुपदा घरीदारी दुर्लक्षिले गेले. त्यांनी समाजमाध्यमे, वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांच्या माध्यमांतून डॉक्टरांंनी वा तज्ज्ञांनी जे विचार मांडले ते नीट समजावून घेतले नाही, पण आज कोरोनोत्तर जे शैक्षणिक प्रयोग सुरू आहेत ते खरंच कौतुकास्पद आहेेत. तसेच ऑनलाइन शिक्षणाची व्यवहार्यता ओळखत जी पावले टाकली जाताय तीदेखील चांगली आहेत. डिजिटल शिक्षणातही विद्यार्थी घडतो, हेही ते दाखवून देताय. (अर्थात्‌ यात एक वादाचा मुद्दा आहेच, तो म्हणजे शहरी भाग व ग्रामीण भाग).

-चंद्रकांत भंडारी,

शिक्षणतज्ज्ञ, जळगाव