शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

कोरोना.. कोरोना करत सरले वर्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 4:13 AM

कोरोना म्हटले तरी धस्स व्हावे, अशी परिस्थिती जळगाव जिल्ह्यात निर्माण झाली होती. चीनमधील हा विषाणू भारतात येईल, महाराष्ट्रात येईल ...

कोरोना म्हटले तरी धस्स व्हावे, अशी परिस्थिती जळगाव जिल्ह्यात निर्माण झाली होती. चीनमधील हा विषाणू भारतात येईल, महाराष्ट्रात येईल आणि जळगावातही येईल, अशी कल्पनाही जानेवारीपर्यंत कोणाला नव्हती. मात्र, मार्चमध्ये या कोरोनाने तर थेट जळगावातच धडक दिली होती आणि अतिशय भयानक आणि दहशतीत पुढील काही महिने गेले. मे महिन्यात जिल्ह्याचा मृत्युदर थेट १२ टक्क्यांवर पोहोचला होता. मध्यंतरी बाधितांचे प्रमाण ३४ टक्क्यांवर गेले होते. अनेक तरुणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र, कोरोना आटोक्यात आला. मात्र, संपला नाही. त्यामुळे कोरोना कोरोना करत हे वर्ष संपले... एका नव्या विषाणूने मात्र आरोग्याचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. अनेक स्वच्छतेच्या सवयी लावून दिल्या, अनेक मोठे बदल घडविले. कोरोनाने जिल्ह्यातील १३००वर नागरिक हिरावले.. तर ५५ हजारांपेक्षा अधिक लोकांना त्याची लागण झाली. मध्यंतरी प्रशासनाचे नियोजन, नागरिकांची भीती, वैद्यकीय सेवेचा सुधारलेला दर्जा आणि एकंदरीतच कोरोनाचा कमी झालेला संसर्ग यामुळे वर्षाचा शेवट मात्र दिलासादायक राहिला. मात्र, त्यातच डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाच्या नव्या रूपाचे भूत पुन्हा समोर आले आणि वर्षभरात आपण जो कोरोना अनुभव होतो, त्यापेक्षा हा वेगळा कोरोना एण्ट्री करेल का या भीतीने पुन्हा वातावरण भीतिमय झाले. त्यावर संशोधन, उपाययोजना सुरू असून, नवीन वर्षात लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. वर्ष सरत असताना वर्षाच्या शेवटी शेवटी जिल्ह्यात कोरोनाव्यतिरिक्त सुविधा सुरळीत झाल्या, ही एक महत्त्वाची व गरीब, गरजू रुग्णांसाठी दिलासादायक बाब राहिली. जळगाव शहर, अमळनेर, भुसावळ असे काही ठिकाणी हे कोरोनचे हॉटस्पॉट राहिले. या तीन भागांमध्येच जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णांची नोंद आहे. जळगावपासून सुरुवात आणि अमळनेरपासून उद्रेक असा या कोरोनाने हळूहळू सर्व जिल्हा व्यापला होता... आता मात्र, रुग्ण कमी आणि भीतीही कमी असे चित्र आहे.