शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

जळगाव जिल्ह्यातील ३१ गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा

By ajay.patil | Updated: April 9, 2023 18:06 IST

नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ६५ गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत होता.

जळगाव - जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील १ हजार हून अधिक गावांच्या पाणी पुरवठ्याची तपासणी केली असता, त्यात जिल्ह्यातील ३१ गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा अहवाल पाणी नमुने तपासणी करणाऱ्या जिल्हा प्रयोगशाळेकडून देखील करण्यात आला आहे.

जि.प.कडून गेल्या महिन्यात हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात ही माहिती समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ६५ गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत होता. आता त्यात घट होवून ती संख्या ६५ वरुन ३१ वर आली आहे. पावसाळ्यात मात्र दुषीत पाणी पुरवठा होण्याचे प्रकार वाढत असतात. दरम्यान, ज्या गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे आढळून आले आहे. त्या गावांमध्ये जि.प.प्रशासनाने गावातील नादुरूस्त व्हाल्व दुरूस्त करणे, गावातील गळत्या रोखणे, ज्या भागातून जलवाहीनी गेली आहे त्या भागातील उकीरडे उचलण्याबाबत पत्र देण्यात आले आहे .तसेच जलकुंभामध्ये ॲलम, तुरटी टाकून पाणी शुध्द देण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या गावांचा आहे समावेश..

जिल्ह्यातील ३१ गावांना सध्या अशुध्द पाणी पुरवठा होत असल्याचे आढळून आले आहे. त्यात सर्वाधिक ६ गावे रावेर तालुक्यातील आहे. यात कुंभारखेडा, बोरखेडासिम, कुसुंबा खु,कुसुंबा बु, कठोरा-धुरखेडा, कोळदा या गावांचा समावेश आहे. अमळनेर तालुक्यात खेडी खु,नंदगाव,पळासदळ,टाकरखेडा या गावांचा समावेश आहे. जळगाव तालुक्यातील  विटनेर, तांडा, वराड, सुभाषवाडी, भडगाव तालुक्यातील बांबरूड, बोदवड तालुक्यात करंजी,धानोरी,धोंडखेडा, चोपडा तालुक्यात मोहीदा , उजाड, कर्जाने , धरणगाव तालुक्यात रोटवद, कंडारी बु, एरंडोल तालुक्यात जानफळ), जामनेरमधील तिघ्रे, टाकळी, मुक्ताईनगर तालुक्यात कोठा, पाचोऱ्यातील खाजोळे, पारोळ्यातील होलसर, कामतवाडी तर यावल मधील कठोरा गावांचा समावेश आहे.

९२९ गावांमध्ये शुध्द पाणी

जिल्ह्यातील १  हजार १५५ गावांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ३१ गावांमध्ये पाणी पुरवठा होत असल्याचे निष्पण्ण झाले. दरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून सलग ज्या गावात साथ आली नाही, अशा गावांना सील्वर कार्ड दिले जाते, त्यात जिल्ह्यातील ९२९ गावांचा समावेश आहे. या ९२९ गावांमध्ये शुध्द पाणी पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी