शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जळगाव जिल्ह्यातील ३१ गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा

By ajay.patil | Updated: April 9, 2023 18:06 IST

नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ६५ गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत होता.

जळगाव - जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील १ हजार हून अधिक गावांच्या पाणी पुरवठ्याची तपासणी केली असता, त्यात जिल्ह्यातील ३१ गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा अहवाल पाणी नमुने तपासणी करणाऱ्या जिल्हा प्रयोगशाळेकडून देखील करण्यात आला आहे.

जि.प.कडून गेल्या महिन्यात हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात ही माहिती समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ६५ गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत होता. आता त्यात घट होवून ती संख्या ६५ वरुन ३१ वर आली आहे. पावसाळ्यात मात्र दुषीत पाणी पुरवठा होण्याचे प्रकार वाढत असतात. दरम्यान, ज्या गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे आढळून आले आहे. त्या गावांमध्ये जि.प.प्रशासनाने गावातील नादुरूस्त व्हाल्व दुरूस्त करणे, गावातील गळत्या रोखणे, ज्या भागातून जलवाहीनी गेली आहे त्या भागातील उकीरडे उचलण्याबाबत पत्र देण्यात आले आहे .तसेच जलकुंभामध्ये ॲलम, तुरटी टाकून पाणी शुध्द देण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या गावांचा आहे समावेश..

जिल्ह्यातील ३१ गावांना सध्या अशुध्द पाणी पुरवठा होत असल्याचे आढळून आले आहे. त्यात सर्वाधिक ६ गावे रावेर तालुक्यातील आहे. यात कुंभारखेडा, बोरखेडासिम, कुसुंबा खु,कुसुंबा बु, कठोरा-धुरखेडा, कोळदा या गावांचा समावेश आहे. अमळनेर तालुक्यात खेडी खु,नंदगाव,पळासदळ,टाकरखेडा या गावांचा समावेश आहे. जळगाव तालुक्यातील  विटनेर, तांडा, वराड, सुभाषवाडी, भडगाव तालुक्यातील बांबरूड, बोदवड तालुक्यात करंजी,धानोरी,धोंडखेडा, चोपडा तालुक्यात मोहीदा , उजाड, कर्जाने , धरणगाव तालुक्यात रोटवद, कंडारी बु, एरंडोल तालुक्यात जानफळ), जामनेरमधील तिघ्रे, टाकळी, मुक्ताईनगर तालुक्यात कोठा, पाचोऱ्यातील खाजोळे, पारोळ्यातील होलसर, कामतवाडी तर यावल मधील कठोरा गावांचा समावेश आहे.

९२९ गावांमध्ये शुध्द पाणी

जिल्ह्यातील १  हजार १५५ गावांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ३१ गावांमध्ये पाणी पुरवठा होत असल्याचे निष्पण्ण झाले. दरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून सलग ज्या गावात साथ आली नाही, अशा गावांना सील्वर कार्ड दिले जाते, त्यात जिल्ह्यातील ९२९ गावांचा समावेश आहे. या ९२९ गावांमध्ये शुध्द पाणी पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी