शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

शहरातील विहिरींची चोरी करून केले बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST

नाल्याचा प्रवाह बदलल्यावरही मनपाकडून कारवाई नाही लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात दिवसेंदिवस नवीन बांधकाम वाढत जात आहेत. ही ...

नाल्याचा प्रवाह बदलल्यावरही मनपाकडून कारवाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात दिवसेंदिवस नवीन बांधकाम वाढत जात आहेत. ही बांधकामे वाढत जात असताना, अनेक ठिकाणी पर्यावरणाचा कोणताही विचार होताना दिसून येत नसून, नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलवून त्याठिकाणी बांधकाम करण्याचे कामदेखील घडत आहे. शहरातील सुमारे २० हून अधिक विहिरी गायब करून, त्याठिकाणी बांधकाम करण्याचे प्रकारदेखील शहरात घडत आहेत; मात्र याबाबत मनपा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही.

शहरातील वाढीव भागात हे प्रकार अधिक घडत आहेत. मेहरुण, सावखेडा शिवार, निमखेडी, खेडी या भागासह शिवाजी नगर व जुने जळगाव गाव परिसरातील अनेक भागांमध्ये जुन्या विहिरी बंद करून त्याठिकाणी बांधकाम करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे खासगी विहिरींसोबत ज्या विहिरींवरून कधीकाळी संपूर्ण परिसरासाठी पुरवठा केला जात होता. त्या विहिरीदेखील गायब केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या भागांमध्ये घडले प्रकार

१. शहरातील शिवाजीनगर भागातदेखील एका रस्त्यालगत असलेली विहीर बंद करून, त्यावर बांधकाम केले होते. दऱम्यान, या विहिरीचा पाण्याचा वापर सार्वजनिक पुरवठ्यासाठी होत होता; मात्र खासगी जागेत असल्याचे कारण देत ही विहीर बंद करून, याठिकाणी बांधकाम करण्यात आले आहे.

२. आव्हाणे शिवार परिसरातदेखील दोन विहिरी बंद करून, त्याठिकाणी मोठे अपार्टमेंट बांधण्यात आले आहेत; मात्र या विहिरीवर बांधकाम करताना मनपाचीदेखील कोणतीही परवानगी घेतलेली नाही.

३. यासह सावखेडा शिवार असो वा निमखेडी परिसर, या भागातदेखील अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यालगतच्या विहिरीवरदेखील अतिक्रमण करून विहिरी बंद केल्या आहेत.

नाल्याचा प्रवाह बदलविला

शहरातील लेंडी नाल्याचा मुख्य नैसर्गिक प्रवाह बदलवून त्याठिकाणी बांधकाम केल्याचा प्रकार काही वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. विशेष म्हणजे याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार करूनदेखील यावर मनपाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ममुराबादकडे जाणाऱ्या नैसर्गिक प्रवाहावर भर टाकून हा प्रवाह बदलविण्यात आला आहे. भविष्यात अतिवृष्टी झाल्यास यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोट..

विहिरींवर बांधकामाबाबत तक्रारी आलेल्या नाहीत; मात्र जर अशा प्रकारचे बांधकाम होत असेल तर याबाबतचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. यासह नाल्याच्या प्रवाहाबाबतदेखील माहिती घेऊन याबाबत कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

-संतोष वाहुळे, उपायुक्त.

प्रशासनाचे दुर्लक्ष अन् राजकारण

पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत राजकारणी व प्रशासनदेखील गांभिर्याने विचार करत नसल्याचे दिसून येत आहे. मेहरूण तलाव परिसर ग्रीन झोन असताना त्याठिकाणी बांधकामांना परवानगी दिली जात आहे. नाल्याचा प्रवाह बदलविण्यात आला, तरीही यावर कारवाई नाही. हा प्रकार चुकीचा आहे.

-प्रणिलसिंह चौधरी, संचालक, योगी फाउंडेशन.

अनेक विहिरी या पाण्याचा नैसर्गिक स्रोत उत्पन्न करून देत असतात; मात्र या प्रकारे बांधकाम करताना दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच नाल्याचा प्रवाह बदलविल्यामुळेदेखील पुराचे संकट निर्माण होऊ शकते.

- सागर महाजन, संचालक, नीर फाउंडेशन.