शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

‘त्या’ २० किमीच्या रस्त्यांची कामे बांधकाम विभागच करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:37 IST

मनपा व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा बैठकीत निर्णय : मनपा अतिक्रमण काढणार ; अखेर तिढा सुटला लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...

मनपा व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा बैठकीत निर्णय : मनपा अतिक्रमण काढणार ; अखेर तिढा सुटला

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून गेलेल्या २० किमीच्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती व बांधकामाची जबाबदारी अखेर ४ मे २०१७च्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम विभागावर निश्चित करण्यात आली आहे. यापुढे शहरातील २० किमीच्या त्या रस्त्यांची दुरुस्ती ही बांधकाम विभागाकडूनच केली जाणार असून, या रस्त्यांवर असलेले अतिक्रमण काढण्याचे काम मात्र महापालिका प्रशासनाला करावे लागणार आहे.

शहरातून गेलेल्या २० किमीचे रस्ते मनपाकडे की सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. तसेच महापालिका व बांधकाम विभाग प्रशासनाने या प्रश्नाकडेही दुर्लक्ष केले होते. ‘लोकमत’ ने हा प्रश्न लावून धरल्यानंतर शासनाच्या अंदाज समितीच्या सभेतील आमदारांनीदेखील ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेवून, मनपा आयुक्तांना जाब विचारला होता, तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतदेखील याच मुद्द्यावरून विषय गाजला होता. यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी महापालिकेत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गजेंद्र राजपूत, सुभाष राऊत यांच्यासह मनपा उपायुक्त संतोष वाहुळे, शहर अभियंता अरविंद भोसले आदी उपस्थित होते.

रस्त्यांची दुरुस्ती व बांधकाम पीडब्ल्यूडीच करणार

१. २००२ मध्ये शासन निर्णयापासून ते २०१७ मध्ये झालेल्या निर्णयाबाबत या बैठकीत चर्चा झाली. ४ मे २०१७ मध्ये शासन निर्णयानुसार शहरातील ६ रस्त्यांची दुरुस्ती व नव्याने बांधकामेदेखील बांधकाम विभागानेच करण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, मनपाने हे रस्ते बांधकाम विभागाकडे हस्तांतरण केल्यानंतरदेखील बांधकाम विभागाने या रस्त्यांवरील अतिक्रमणाचा प्रश्न सांगत, हे रस्ते हस्तांतरण करून घेतले नव्हते.

२. बुधवारी झालेल्या बैठकीत याविषयावर सकारात्मक चर्चा होऊन आता या रस्त्यांची दुरुस्ती व नव्याने बांधकामदेखील बांधकाम विभागाकडूनच केले जाणार आहे. दरम्यान, गुरुवारी दोन्हीही विभागाचे अधिकारी या रस्त्यांची पाहणी करून, रस्त्यांवरील अतिक्रमणाची माहिती घेऊन मनपा प्रशासनाकडून ते अतिक्रमण काढण्यात येणार आहे.

१०० कोटींच्या प्रस्तावात पुन्हा होणार बदल

शहरातील सहा रस्त्यांची दुरुस्ती व बांधकामदेखील बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात येणार असल्याने, मनपा प्रशासनाने राज्य शासनाकडून जाहीर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील इतर रस्त्यांप्रमाणे बांधकाम विभागाकडे देण्यात आलेल्या सहा रस्त्यांचाही समावेश या निधीतून होणाऱ्या कामांमध्ये केला होता. आता हे सहा रस्ते बांधकाम विभागाकडे हस्तांतर केल्यामुळे आता १०० कोटींच्या प्रस्तावातून या रस्त्यांचे काम वगळावे लागणार आहे. दरम्यान, या रस्त्यांचा अतिक्रमणाबाबत गुरुवारी मनपा प्रशासन व बांधकाम विभागाचे अधिकारी संयुक्त पाहणी करणार असून, मनपाकडून लवकरच हे अतिक्रमण काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.