शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ २० किमीच्या रस्त्यांची कामे बांधकाम विभागच करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:37 IST

मनपा व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा बैठकीत निर्णय : मनपा अतिक्रमण काढणार ; अखेर तिढा सुटला लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...

मनपा व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा बैठकीत निर्णय : मनपा अतिक्रमण काढणार ; अखेर तिढा सुटला

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून गेलेल्या २० किमीच्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती व बांधकामाची जबाबदारी अखेर ४ मे २०१७च्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम विभागावर निश्चित करण्यात आली आहे. यापुढे शहरातील २० किमीच्या त्या रस्त्यांची दुरुस्ती ही बांधकाम विभागाकडूनच केली जाणार असून, या रस्त्यांवर असलेले अतिक्रमण काढण्याचे काम मात्र महापालिका प्रशासनाला करावे लागणार आहे.

शहरातून गेलेल्या २० किमीचे रस्ते मनपाकडे की सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. तसेच महापालिका व बांधकाम विभाग प्रशासनाने या प्रश्नाकडेही दुर्लक्ष केले होते. ‘लोकमत’ ने हा प्रश्न लावून धरल्यानंतर शासनाच्या अंदाज समितीच्या सभेतील आमदारांनीदेखील ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेवून, मनपा आयुक्तांना जाब विचारला होता, तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतदेखील याच मुद्द्यावरून विषय गाजला होता. यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी महापालिकेत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गजेंद्र राजपूत, सुभाष राऊत यांच्यासह मनपा उपायुक्त संतोष वाहुळे, शहर अभियंता अरविंद भोसले आदी उपस्थित होते.

रस्त्यांची दुरुस्ती व बांधकाम पीडब्ल्यूडीच करणार

१. २००२ मध्ये शासन निर्णयापासून ते २०१७ मध्ये झालेल्या निर्णयाबाबत या बैठकीत चर्चा झाली. ४ मे २०१७ मध्ये शासन निर्णयानुसार शहरातील ६ रस्त्यांची दुरुस्ती व नव्याने बांधकामेदेखील बांधकाम विभागानेच करण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, मनपाने हे रस्ते बांधकाम विभागाकडे हस्तांतरण केल्यानंतरदेखील बांधकाम विभागाने या रस्त्यांवरील अतिक्रमणाचा प्रश्न सांगत, हे रस्ते हस्तांतरण करून घेतले नव्हते.

२. बुधवारी झालेल्या बैठकीत याविषयावर सकारात्मक चर्चा होऊन आता या रस्त्यांची दुरुस्ती व नव्याने बांधकामदेखील बांधकाम विभागाकडूनच केले जाणार आहे. दरम्यान, गुरुवारी दोन्हीही विभागाचे अधिकारी या रस्त्यांची पाहणी करून, रस्त्यांवरील अतिक्रमणाची माहिती घेऊन मनपा प्रशासनाकडून ते अतिक्रमण काढण्यात येणार आहे.

१०० कोटींच्या प्रस्तावात पुन्हा होणार बदल

शहरातील सहा रस्त्यांची दुरुस्ती व बांधकामदेखील बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात येणार असल्याने, मनपा प्रशासनाने राज्य शासनाकडून जाहीर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील इतर रस्त्यांप्रमाणे बांधकाम विभागाकडे देण्यात आलेल्या सहा रस्त्यांचाही समावेश या निधीतून होणाऱ्या कामांमध्ये केला होता. आता हे सहा रस्ते बांधकाम विभागाकडे हस्तांतर केल्यामुळे आता १०० कोटींच्या प्रस्तावातून या रस्त्यांचे काम वगळावे लागणार आहे. दरम्यान, या रस्त्यांचा अतिक्रमणाबाबत गुरुवारी मनपा प्रशासन व बांधकाम विभागाचे अधिकारी संयुक्त पाहणी करणार असून, मनपाकडून लवकरच हे अतिक्रमण काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.