शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

नांदेड-घुुरखेडा रस्त्याच्या दुरवस्थेने शेतकऱ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 3:51 PM

नांदेड- घुुरखेडा या तीन किलोमीटर लांबीच्या शेती शिवारातून जाणाºया रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झालेली आहे.

नांदेड, ता.धरणगाव : नांदेड- घुुरखेडा या तीन किलोमीटर लांबीच्या शेती शिवारातून जाणाºया रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झालेली आहे. परिणामी शेतकऱ्यांना खराब रस्त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.नांदेडपासून तीन किलोमीटर अंतरावर तापी नदीच्या काठी घुरखेडा हे गाव होते. पण सद्य:स्थितीत गाव ओसाड पडले आहे. तेथे कोणीही राहत नाही. हा भाग आता घुरखेडा शेती शिवार म्हणून ओळखला जातो. या भागाकडे जाणारा संपूर्ण रस्ता काळ्या मातीचा आहे. पावसाळ्याच्या दिवसात चिखलामुळे तर हिवाळा व उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे शेतमालाची वाहतूक करताना शेतकºयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. केळी व उस या पिकांच्या वाहतुकीच्या वेळी तर शेतकºयांना स्वखर्चाने रस्त्यावर पिवळी माती टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवावे लागतात. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील हा भाग आहे. यामुळे त्यांनी लक्ष घालून रस्त्याचे खडीकरणाचे काम करून शेतकरी वर्गाची रस्त्याची ही समस्या सोडवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाDharangaonधरणगाव