कोरोनातून दिलासा, चोरीच्या घटनांचे भय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST2021-05-26T04:16:39+5:302021-05-26T04:16:39+5:30

शहर व परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अगदी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरदेखील चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता. धरणगाव ...

Comfort from Corona, fear of theft | कोरोनातून दिलासा, चोरीच्या घटनांचे भय

कोरोनातून दिलासा, चोरीच्या घटनांचे भय

शहर व परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अगदी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरदेखील चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता. धरणगाव शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असूनसुद्धा त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचेच दिसून येते. घरांमध्ये चोरी, वाहनांची चोरी असे प्रकार सर्रास सुरू आहेत. पोलीस प्रशासनाचा या मंडळींना धाक उरला नसल्याचेच दिसून येत आहे.

धरणगाव शहराचा पाणी प्रश्नदेखील लवकरच सुटणार आहे कारण पालकमंत्री यांनी एका कार्यक्रमाच्या उद‌्घाटप्रसंगी सांगितले की, ४२ कोटी रुपये पाण्याच्या पाईपलाईनसाठी काही दिवसात मंजूर होणार आहेत. त्यासाठी

तांत्रिक अडी-अडचणी सोडवण्याचे काम सुरू आहे. जेणेकरून लवकरात लवकर पाणी प्रश्नदेखील सुटणार आहे. ही दिलसादायक बाब आहे. धरणगाव शहरात असलेली जुनी पाईपलाईन काढून नवीन पाईपलाईन या ठिकाणी टाकली जाणार आहे व गल्लोगल्ली शहरात पेव्हर ब्लॉकचे काम जोरात सुरू आहे. भविष्यात होणारी पाईपलाईन पाहता या कामाला थोडा काळ ब्रेक लावणे आवश्यक आहे.

Web Title: Comfort from Corona, fear of theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.