शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

कोरोनाकाळातही प्रवाशांची कोंबून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:16 IST

सोशल डिस्टनिंगचा फज्जा : नियमा प्रमाणे रिक्षात प्रवाशांची संख्या दिसेना जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन ...

सोशल डिस्टनिंगचा फज्जा : नियमा प्रमाणे रिक्षात प्रवाशांची संख्या दिसेना

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी परिवहन विभागाने रिक्षाचालकांना रिक्षात दोनच प्रवाशांना बसविण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही शहरातील रिक्षाचालक हे आदेश धाब्यावर बसवून अगदी बिनधास्तपणे रिक्षात तीन ते चार प्रवाशांना बसवून वाहतूक करत असल्याचे बुधवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले.

गेल्या महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला सुरुवात झाली असून, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. प्रत्येकाला मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असून, नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाईदेखील करण्यात येत आहे. दोनच दिवसांपूर्वी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी विनामास्क रिक्षा चालविणाऱ्या दोन रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली होती. तसेच रिक्षाचालकांना प्रवाशी वाहतूक करताना रिक्षाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे, मास्क घातलेल्या प्रवाशांनाच बसविणे व मुख्य म्हणजे रिक्षात प्रवाशी बसविताना सामाजिक अंतर ठेवून दोनच प्रवाशांना बसविण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा अशा रिक्षांवर कडक कारवाईचे आदेशही दिले आहेत. मात्र, आरटीओ विभागाकडून प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने, रिक्षाचालकांचे फावले आहे.

इन्फो : वर्दळीच्या चौकातून बिनधास्तपणे होतेय कोंबून वाहतूक

‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून शहरातील रेल्वे स्टेशन, आकाशवाणी चौक, बेंडाळे चौक, प्रभात चौक व अजिंठा चौफुलीवरून अगदी बिनधास्तपणे रिक्षाचालक रिक्षात तीन ते चार प्रवाशांना बसवून वाहतूक करताना दिसून आले. यात रेल्वे स्टेशनवरून काही रिक्षाचालक मागे चार प्रवाशी, तर पुढे दोन अशा प्रकारे एका रिक्षात तब्बल सहा प्रवाशांची वाहतूक करताना दिसून आले तसेच आकाशवाणी चौकातूनही अजिंठा चौफुलीकडे जाणारे रिक्षाचालकही तब्येतीने बारीक प्रवाशी असले तर मागे चार प्रवाशी व त्यात शरीराने एखादा जाड प्रवाशी असल्यास त्या प्रवाशाला पुढे बसवून मागे तीन प्रवाशी बसवीत असल्याचे दिसून आले. असाच प्रकार अजिंठा चौफुलीवरून सुप्रीम कॉलनीकडे जाणाऱ्या रिक्षांमध्येही दिसून आला.

इन्फो :

प्रवाशांकडूनही विरोध होईना

रेल्वे स्टेशनवर एका रिक्षाचालकाने नवीन बस स्टॅण्डवर जाणारे चार प्रवाशी बसविले. यात एक ज्येष्ठ नागरिक व तीन तरुण होते. चार जणांना बसता येणे शक्य नसतानाही, यातील एकाही प्रवाशाने विरोध न करता, दाटीवाटीने बसून बस स्टॅण्डकडे रवाना झाले. यात दोन्ही बाजूकडील प्रवाशांचा एक पाय बाहेरच होता. या दुसऱ्या वाहनाचा धक्का लागून, त्या प्रवाशाला दुखापत होण्याची शक्यता दिसून आली, तर कुणीही याला विरोध केला नाही. असाच प्रकार बेंडाळे चौकाकडून अजिंठा चौफुलीवर दिसून आला. याबद्दल ‘लोकमत’ प्रतिनिधीने काही प्रवाशांशी संवाद साधला असता, त्यांनी पाच ते दहा मिनिटांचा प्रवास असतो, त्यामुळे थोडा त्रास सहन करून घ्यावा लागतो, स्पेशल रिक्षा केली तर जास्त पैसे लागतात. त्यामुळे या त्रासाबद्दल काही वाटत नसून, ही सवयच झाली असल्याचे सांगितले.

इन्फो :

तर रिक्षाचालक म्हणतात, आम्हालाही परवडले पाहिजे..

प्रवाशांची कोंबून वाहतूक करण्याबाबत काही रिक्षाचालकांना विचारले असता, त्यांनी एक किंवा दोन प्रवाशांनी वाहतूक करणे परवडत नाही. डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. जास्त भाडे आकारायचे म्हटल्यावर अनेक प्रवाशी तेदेखील देत नाहीत. त्यामुळे १० रुपये शीटप्रमाणे एका रिक्षात नाइलाजाने कधी तीन तर कधी पाच प्रवाशांची वाहतूक करावी लागत असल्याचे सांगितले.