शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कोरोनाकाळातही प्रवाशांची कोंबून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:16 IST

सोशल डिस्टनिंगचा फज्जा : नियमा प्रमाणे रिक्षात प्रवाशांची संख्या दिसेना जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन ...

सोशल डिस्टनिंगचा फज्जा : नियमा प्रमाणे रिक्षात प्रवाशांची संख्या दिसेना

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी परिवहन विभागाने रिक्षाचालकांना रिक्षात दोनच प्रवाशांना बसविण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही शहरातील रिक्षाचालक हे आदेश धाब्यावर बसवून अगदी बिनधास्तपणे रिक्षात तीन ते चार प्रवाशांना बसवून वाहतूक करत असल्याचे बुधवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले.

गेल्या महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला सुरुवात झाली असून, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. प्रत्येकाला मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असून, नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाईदेखील करण्यात येत आहे. दोनच दिवसांपूर्वी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी विनामास्क रिक्षा चालविणाऱ्या दोन रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली होती. तसेच रिक्षाचालकांना प्रवाशी वाहतूक करताना रिक्षाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे, मास्क घातलेल्या प्रवाशांनाच बसविणे व मुख्य म्हणजे रिक्षात प्रवाशी बसविताना सामाजिक अंतर ठेवून दोनच प्रवाशांना बसविण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा अशा रिक्षांवर कडक कारवाईचे आदेशही दिले आहेत. मात्र, आरटीओ विभागाकडून प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने, रिक्षाचालकांचे फावले आहे.

इन्फो : वर्दळीच्या चौकातून बिनधास्तपणे होतेय कोंबून वाहतूक

‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून शहरातील रेल्वे स्टेशन, आकाशवाणी चौक, बेंडाळे चौक, प्रभात चौक व अजिंठा चौफुलीवरून अगदी बिनधास्तपणे रिक्षाचालक रिक्षात तीन ते चार प्रवाशांना बसवून वाहतूक करताना दिसून आले. यात रेल्वे स्टेशनवरून काही रिक्षाचालक मागे चार प्रवाशी, तर पुढे दोन अशा प्रकारे एका रिक्षात तब्बल सहा प्रवाशांची वाहतूक करताना दिसून आले तसेच आकाशवाणी चौकातूनही अजिंठा चौफुलीकडे जाणारे रिक्षाचालकही तब्येतीने बारीक प्रवाशी असले तर मागे चार प्रवाशी व त्यात शरीराने एखादा जाड प्रवाशी असल्यास त्या प्रवाशाला पुढे बसवून मागे तीन प्रवाशी बसवीत असल्याचे दिसून आले. असाच प्रकार अजिंठा चौफुलीवरून सुप्रीम कॉलनीकडे जाणाऱ्या रिक्षांमध्येही दिसून आला.

इन्फो :

प्रवाशांकडूनही विरोध होईना

रेल्वे स्टेशनवर एका रिक्षाचालकाने नवीन बस स्टॅण्डवर जाणारे चार प्रवाशी बसविले. यात एक ज्येष्ठ नागरिक व तीन तरुण होते. चार जणांना बसता येणे शक्य नसतानाही, यातील एकाही प्रवाशाने विरोध न करता, दाटीवाटीने बसून बस स्टॅण्डकडे रवाना झाले. यात दोन्ही बाजूकडील प्रवाशांचा एक पाय बाहेरच होता. या दुसऱ्या वाहनाचा धक्का लागून, त्या प्रवाशाला दुखापत होण्याची शक्यता दिसून आली, तर कुणीही याला विरोध केला नाही. असाच प्रकार बेंडाळे चौकाकडून अजिंठा चौफुलीवर दिसून आला. याबद्दल ‘लोकमत’ प्रतिनिधीने काही प्रवाशांशी संवाद साधला असता, त्यांनी पाच ते दहा मिनिटांचा प्रवास असतो, त्यामुळे थोडा त्रास सहन करून घ्यावा लागतो, स्पेशल रिक्षा केली तर जास्त पैसे लागतात. त्यामुळे या त्रासाबद्दल काही वाटत नसून, ही सवयच झाली असल्याचे सांगितले.

इन्फो :

तर रिक्षाचालक म्हणतात, आम्हालाही परवडले पाहिजे..

प्रवाशांची कोंबून वाहतूक करण्याबाबत काही रिक्षाचालकांना विचारले असता, त्यांनी एक किंवा दोन प्रवाशांनी वाहतूक करणे परवडत नाही. डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. जास्त भाडे आकारायचे म्हटल्यावर अनेक प्रवाशी तेदेखील देत नाहीत. त्यामुळे १० रुपये शीटप्रमाणे एका रिक्षात नाइलाजाने कधी तीन तर कधी पाच प्रवाशांची वाहतूक करावी लागत असल्याचे सांगितले.