शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

सण-उत्सवाची चाहूल लागताच नारळ ३० रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना संसर्ग, सतत होणारी इंधन दरवाढ यामुळे नारळाचे माहेरघर असलेल्या दक्षिण भारतातून येणाऱ्या नारळाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना संसर्ग, सतत होणारी इंधन दरवाढ यामुळे नारळाचे माहेरघर असलेल्या दक्षिण भारतातून येणाऱ्या नारळाच्या आवकवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा नारळाच्या भावात मोठी वाढ होऊन किरकोळ बाजारात नारळ प्रति नग ३० रुपयांवर पोहोचले आहे. नारळाचे भाव वाढले असले तरी त्याची मागणी घटली नसून सण-उत्सवामुळे मागणी वाढतच आहे. विशेष म्हणजे सध्या मंदिर बंद असले तरी मागणी कायम असून मंदिर खुले झाल्यानंतर त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

प्रत्येक शुभकार्यासाठी प्रथम आवश्यक असते ते नारळ. त्यामुळे विविध पूजा, शांती, लग्नसमारंभातील वेगवेगळे विधी, मंदिर, तीर्थस्थानावर देवदर्शनाला गेल्यावर अगोदर खरेदी होते ती नारळाची. इतकेच नव्हे तर उद्घाटन, शुभारंभप्रसंग तसेच सत्कार असो अथवा निरोप समारंभ असो तेथेही असते ते नारळच. त्यामुळे केवळ ठरावीक ऋतूचे फळ नसलेल्या व या सर्व कारणांमुळे खरोखरच ‘श्री’फळ (आद्य फळ) ठरणाऱ्या या नारळाला वर्षभर मागणी असते.

सण-उत्सवांचे आगमन आणि दीडपट भाववाढ

रक्षाबंधन सणामुळे नारळाची मागणी वाढली. आता त्या पाठोपाठ पोळा सण तोंडावर असून त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र असा सणोत्सवाचा काळ असल्याने नारळाची मागणी वाढतच जाणार आहे. त्यात २० ते २५ रुपयांवर असलेले नारळ आता थेट ३० रुपये प्रति नगावर पोहोचले आहे. सध्या वाढलेली मागणी ही आता थेट भाऊबीजपर्यंत कायम राहणार आहे. धार्मिक विधी, सण-वार, सत्कार, उद्घाटन यासह नारळाचा वापर खाद्यपदार्थांमध्येही होतो. इडली, वडा, सांबार, चटणी या दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांची विक्री चांगली असून आता हॉटेल, खाद्यपदार्थांची दुकाने सुरू झाल्याने त्यांच्यासाठीही ओल्या खोबऱ्याचीच मागणी असल्याने नारळाची विक्री वाढली आहे.

२५ टक्के भाडेवाढ

शुभकार्याचा अविभाज्य घटक असलेल्या नारळाचे भाव गगनाला भिडत आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश या भागातून येणाऱ्या नारळाच्या वाहतुकीसाठी मोठे भाडे मोजावे लागते. त्यामुळे इंधन दरवाढीचा यावर लगेच परिणाम जाणवतो. सध्या डिझेलचे दर नव्वदीपार गेल्याने मालवाहतुकीच्याही दरात मोठी वाढ झाली आहे. पूर्वी एका ट्रकचे भाडे ६० हजार रुपये लागत होते, ते आता ७५ हजार रुपयांवर पोहचले आहे. या शिवाय कोरोना संसर्गामुळे झाडांवरून नारळ उतरविणे, माल वाहनांमध्ये चढविणे यावरही परिणाम झाल्याने आवक काहीसी कमी झाली असल्याचे व्यापाऱ्यांच्यावतीने सांगण्यात येत आहे. दररोज जळगावात एक हजार ते १२०० गोण्या नारळ येतात. मात्र यात साधारण २०० गोण्यांची घट झाली आहे. असे असले तरी मागणी मात्र कायम असून यामुळे भाववाढही होत आहे.

-------

सण-उत्सवामुळे नारळाला मागणी वाढू लागली आहे. त्यात इंधन दरवाढीने भाडेवाढही झाली असून कोरोनामुळेही आवकवर काहीसा परिणाम आहे. त्यामुळे नारळाचे भाव वाढत आहेत.

- अशोक धूत, नारळ व्यावसायिक