शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

सण-उत्सवाची चाहूल लागताच नारळ ३० रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना संसर्ग, सतत होणारी इंधन दरवाढ यामुळे नारळाचे माहेरघर असलेल्या दक्षिण भारतातून येणाऱ्या नारळाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना संसर्ग, सतत होणारी इंधन दरवाढ यामुळे नारळाचे माहेरघर असलेल्या दक्षिण भारतातून येणाऱ्या नारळाच्या आवकवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा नारळाच्या भावात मोठी वाढ होऊन किरकोळ बाजारात नारळ प्रति नग ३० रुपयांवर पोहोचले आहे. नारळाचे भाव वाढले असले तरी त्याची मागणी घटली नसून सण-उत्सवामुळे मागणी वाढतच आहे. विशेष म्हणजे सध्या मंदिर बंद असले तरी मागणी कायम असून मंदिर खुले झाल्यानंतर त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

प्रत्येक शुभकार्यासाठी प्रथम आवश्यक असते ते नारळ. त्यामुळे विविध पूजा, शांती, लग्नसमारंभातील वेगवेगळे विधी, मंदिर, तीर्थस्थानावर देवदर्शनाला गेल्यावर अगोदर खरेदी होते ती नारळाची. इतकेच नव्हे तर उद्घाटन, शुभारंभप्रसंग तसेच सत्कार असो अथवा निरोप समारंभ असो तेथेही असते ते नारळच. त्यामुळे केवळ ठरावीक ऋतूचे फळ नसलेल्या व या सर्व कारणांमुळे खरोखरच ‘श्री’फळ (आद्य फळ) ठरणाऱ्या या नारळाला वर्षभर मागणी असते.

सण-उत्सवांचे आगमन आणि दीडपट भाववाढ

रक्षाबंधन सणामुळे नारळाची मागणी वाढली. आता त्या पाठोपाठ पोळा सण तोंडावर असून त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र असा सणोत्सवाचा काळ असल्याने नारळाची मागणी वाढतच जाणार आहे. त्यात २० ते २५ रुपयांवर असलेले नारळ आता थेट ३० रुपये प्रति नगावर पोहोचले आहे. सध्या वाढलेली मागणी ही आता थेट भाऊबीजपर्यंत कायम राहणार आहे. धार्मिक विधी, सण-वार, सत्कार, उद्घाटन यासह नारळाचा वापर खाद्यपदार्थांमध्येही होतो. इडली, वडा, सांबार, चटणी या दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांची विक्री चांगली असून आता हॉटेल, खाद्यपदार्थांची दुकाने सुरू झाल्याने त्यांच्यासाठीही ओल्या खोबऱ्याचीच मागणी असल्याने नारळाची विक्री वाढली आहे.

२५ टक्के भाडेवाढ

शुभकार्याचा अविभाज्य घटक असलेल्या नारळाचे भाव गगनाला भिडत आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश या भागातून येणाऱ्या नारळाच्या वाहतुकीसाठी मोठे भाडे मोजावे लागते. त्यामुळे इंधन दरवाढीचा यावर लगेच परिणाम जाणवतो. सध्या डिझेलचे दर नव्वदीपार गेल्याने मालवाहतुकीच्याही दरात मोठी वाढ झाली आहे. पूर्वी एका ट्रकचे भाडे ६० हजार रुपये लागत होते, ते आता ७५ हजार रुपयांवर पोहचले आहे. या शिवाय कोरोना संसर्गामुळे झाडांवरून नारळ उतरविणे, माल वाहनांमध्ये चढविणे यावरही परिणाम झाल्याने आवक काहीसी कमी झाली असल्याचे व्यापाऱ्यांच्यावतीने सांगण्यात येत आहे. दररोज जळगावात एक हजार ते १२०० गोण्या नारळ येतात. मात्र यात साधारण २०० गोण्यांची घट झाली आहे. असे असले तरी मागणी मात्र कायम असून यामुळे भाववाढही होत आहे.

-------

सण-उत्सवामुळे नारळाला मागणी वाढू लागली आहे. त्यात इंधन दरवाढीने भाडेवाढही झाली असून कोरोनामुळेही आवकवर काहीसा परिणाम आहे. त्यामुळे नारळाचे भाव वाढत आहेत.

- अशोक धूत, नारळ व्यावसायिक