शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
6
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
7
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
8
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
9
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

सण-उत्सवाची चाहूल लागताच नारळ ३० रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना संसर्ग, सतत होणारी इंधन दरवाढ यामुळे नारळाचे माहेरघर असलेल्या दक्षिण भारतातून येणाऱ्या नारळाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना संसर्ग, सतत होणारी इंधन दरवाढ यामुळे नारळाचे माहेरघर असलेल्या दक्षिण भारतातून येणाऱ्या नारळाच्या आवकवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा नारळाच्या भावात मोठी वाढ होऊन किरकोळ बाजारात नारळ प्रति नग ३० रुपयांवर पोहोचले आहे. नारळाचे भाव वाढले असले तरी त्याची मागणी घटली नसून सण-उत्सवामुळे मागणी वाढतच आहे. विशेष म्हणजे सध्या मंदिर बंद असले तरी मागणी कायम असून मंदिर खुले झाल्यानंतर त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

प्रत्येक शुभकार्यासाठी प्रथम आवश्यक असते ते नारळ. त्यामुळे विविध पूजा, शांती, लग्नसमारंभातील वेगवेगळे विधी, मंदिर, तीर्थस्थानावर देवदर्शनाला गेल्यावर अगोदर खरेदी होते ती नारळाची. इतकेच नव्हे तर उद्घाटन, शुभारंभप्रसंग तसेच सत्कार असो अथवा निरोप समारंभ असो तेथेही असते ते नारळच. त्यामुळे केवळ ठरावीक ऋतूचे फळ नसलेल्या व या सर्व कारणांमुळे खरोखरच ‘श्री’फळ (आद्य फळ) ठरणाऱ्या या नारळाला वर्षभर मागणी असते.

सण-उत्सवांचे आगमन आणि दीडपट भाववाढ

रक्षाबंधन सणामुळे नारळाची मागणी वाढली. आता त्या पाठोपाठ पोळा सण तोंडावर असून त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र असा सणोत्सवाचा काळ असल्याने नारळाची मागणी वाढतच जाणार आहे. त्यात २० ते २५ रुपयांवर असलेले नारळ आता थेट ३० रुपये प्रति नगावर पोहोचले आहे. सध्या वाढलेली मागणी ही आता थेट भाऊबीजपर्यंत कायम राहणार आहे. धार्मिक विधी, सण-वार, सत्कार, उद्घाटन यासह नारळाचा वापर खाद्यपदार्थांमध्येही होतो. इडली, वडा, सांबार, चटणी या दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांची विक्री चांगली असून आता हॉटेल, खाद्यपदार्थांची दुकाने सुरू झाल्याने त्यांच्यासाठीही ओल्या खोबऱ्याचीच मागणी असल्याने नारळाची विक्री वाढली आहे.

२५ टक्के भाडेवाढ

शुभकार्याचा अविभाज्य घटक असलेल्या नारळाचे भाव गगनाला भिडत आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश या भागातून येणाऱ्या नारळाच्या वाहतुकीसाठी मोठे भाडे मोजावे लागते. त्यामुळे इंधन दरवाढीचा यावर लगेच परिणाम जाणवतो. सध्या डिझेलचे दर नव्वदीपार गेल्याने मालवाहतुकीच्याही दरात मोठी वाढ झाली आहे. पूर्वी एका ट्रकचे भाडे ६० हजार रुपये लागत होते, ते आता ७५ हजार रुपयांवर पोहचले आहे. या शिवाय कोरोना संसर्गामुळे झाडांवरून नारळ उतरविणे, माल वाहनांमध्ये चढविणे यावरही परिणाम झाल्याने आवक काहीसी कमी झाली असल्याचे व्यापाऱ्यांच्यावतीने सांगण्यात येत आहे. दररोज जळगावात एक हजार ते १२०० गोण्या नारळ येतात. मात्र यात साधारण २०० गोण्यांची घट झाली आहे. असे असले तरी मागणी मात्र कायम असून यामुळे भाववाढही होत आहे.

-------

सण-उत्सवामुळे नारळाला मागणी वाढू लागली आहे. त्यात इंधन दरवाढीने भाडेवाढही झाली असून कोरोनामुळेही आवकवर काहीसा परिणाम आहे. त्यामुळे नारळाचे भाव वाढत आहेत.

- अशोक धूत, नारळ व्यावसायिक