आवक घटल्याने खोबरे ३०० रुपयांच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:19 IST2021-08-23T04:19:21+5:302021-08-23T04:19:21+5:30

विजयकुमार सैतवाल जळगाव : केरळमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यानंतर खोबऱ्याच्या आवकवर परिणाम होऊन त्याच्या भावात थेट ६० ते ८० रुपये ...

Coconut in the direction of Rs | आवक घटल्याने खोबरे ३०० रुपयांच्या दिशेने

आवक घटल्याने खोबरे ३०० रुपयांच्या दिशेने

विजयकुमार सैतवाल

जळगाव : केरळमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यानंतर खोबऱ्याच्या आवकवर परिणाम होऊन त्याच्या भावात थेट ६० ते ८० रुपये प्रति किलोने वाढ झाली झाली आहे. यामुळे खोबऱ्याचे भाव थेट २६० ते २८० रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत. दिवाळीपर्यंत आणखी भाववाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सुकामेवा, मसाल्याचे पदार्थ यांच्या आवकवर सध्या कोणत्या न कोणत्या कारणाने परिणाम होत आहे. कोकणातील पूरस्थिती, अफगाणिस्तानील तणाव, विविध देशांतील कोरोना संसर्ग यामुळे काजू, बदाम तसेच इतर सुकामेव्यासह मसाल्याची आवक घटल्याने त्यांचे भाव वाढले आहे. या सोबतच आता मसाल्यातील महत्त्वाचा घटक असलेले खोबरे व खसखसच्या आवकवरही परिणाम झाला आहे.

२५ टक्क्यांनी आवक घटली

खोबऱ्याची प्रमुख आवक असलेल्या केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने तेथून येणाऱ्या खोबऱ्याच्या आवकवर चांगलाच परिणाम झाला आहे. एरव्ही दररोज दोन टन आवक असलेल्या खोबऱ्याची आवक २५ टक्क्यांनी कमी होऊन ती दीड टनवर आली आहे. यामुळे २०० ते २२० रुपये प्रति किलो असलेल्या खोबऱ्याचे भाव २६० ते २८० रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत.

दिवाळीपर्यंत ३०० रुपयांवर?

सध्या आवक कमी व सणवारामुळे मागणी वाढणार असल्याने खोबऱ्याचे भाव आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे. दिवाळीमध्ये खोबऱ्याची मागणी जास्त असते. त्यामुळे या काळात खोबरे ३०० रुपये प्रति किलोवर पोहोचण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.

केरळमधून येणाऱ्या खोबऱ्याची आवक कमी झाल्याने त्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दिवाळीपर्यंत खोबरे ३०० रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकते. खोबऱ्यासोबतच खसखसचेही भाव वाढले आहेत.

- सचिन जैन, मसाले विक्रेते

Web Title: Coconut in the direction of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.