शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

सी.एम. साहेब, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्याच्या ‘आरोग्या’कडे लक्ष द्याल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 13:28 IST

रुग्णांना कमी पडणारी जागा, औषधींचा तुटवडा, मनपा रुग्णालयाची प्रशस्त जागा असतानाही तिचा उपयोग न होणे यामुळे जिल्ह्यातील ‘आरोग्य’चा प्रश्न बिकट

जळगाव : जिल्हा रुग्णालयातील रिक्त असलेले पदे पूर्ण भरले जात नसताना वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालेल्या इमारतीत रुग्णांना कमी पडणारी जागा, औषधींचा तुटवडा, मनपा रुग्णालयाची प्रशस्त जागा असतानाही तिचा उपयोग न होणे यामुळे जिल्ह्यातील ‘आरोग्य’चा प्रश्न बिकट बनला आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यातच या समस्या कायम असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रश्नाकडे लक्ष देतील का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा रुग्णलायात रिक्त पदे, येथील सुरक्षितता, कर्मचाऱ्यांची वागणूक, रुग्णांकडून पैसे वसुली अशा विविध प्रश्नांमुळे जिल्हा रुग्णालय नेहमीच चर्चेत राहिले. वैद्यकीय अधिकाºयांच्या रिक्त पदांमुळे तर रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे गंभीर अनुभव आहेत. त्यानंतर जळगावात सुरू होणारे वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालयातून सुरू होणार असल्याने जिल्हा रुग्णालय आरोग्य विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले. त्यामुळे येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले व वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर आले. पुरेसे डॉक्टर तर आले मात्र ते कक्षात राहत नसल्याच्या अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. आठवडाभरातील तीन वेळा असा अनुभव आला. वैद्यकीय शिक्षण विभागाकडे जिल्हा रुग्णालय हस्तांतरीत झाले त्या वेळी आरोग्य विभागाचे १३ वैद्यकीय अधिकारीदेखील तीन वर्षांसाठी वैद्यकीय शिक्षण विभागासाठीच काम करणार आहे. प्रत्यक्षात ३९ वैद्यकीय अधिकाºयांचे पदे मंजूर असताना १३ वैद्यकीय अधिकारीच कार्यरत होते. आता वैद्यकीय शिक्षण विभागाकडे रुग्णालय हस्तांतरीत झाल्याने आरोग्य विभागाची उर्वरित पदे भरली जात नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण विभागाचे डॉक्टर कक्षात हजर नसतात, त्यामुळे रुग्णांना दुहेरी बाजूने त्रास सहन करावा लागत आहे. या शिवाय येथील जागेचा सर्वात मोठा प्रश्न असल्याने जागेअभावी एकेका खाटेवर दोन अथवा तीन रुग्णांना टाकावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांच्या मोठ्या इमारती असल्याने व आता मनपात, राज्यात भाजपाचीच सत्ता असल्याने मनपाच्या रुग्णालयांचा कायापालट होणे अपेक्षित असून तेथे जागा उपलब्ध झाल्यास जिल्हा रुग्णालयातील ताण कमी होण्यास मदत होईल.सध्या खोकल्यासह इतरही औषधांचा तुटवडा असून निधीअभावी अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव