शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी? शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू आहे धुसफूस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 16:30 IST

जळगाव जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत मोठी धुसफूस सुरू आहे. या ना त्या कारणावरून दोन्ही पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसताहेत.

प्रशांत भदाणे -

जळगाव - शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या सत्तेत सहभागी आहेत. जळगाव जिल्ह्यात स्थानिक पातळीवर मात्र, या दोन्ही पक्षांमध्ये कमालीचे वैर पाहायला मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत मोठी धुसफूस सुरू आहे. या ना त्या कारणावरून दोन्ही पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसताहेत. चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना आमदार लता सोनवणे यांची आमदारकी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीश वळवी यांच्यामुळं धोक्यात आली आहे. आमदार सोनवणे यांच्या टोकरे कोळी जातीच्या प्रमाणपत्राबाबत जगदीश वळवींनी नंदुरबारच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे तक्रार केली होती. यामुळे आमदार सोनवणेंचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले गेले. या निकालाविरुद्ध आमदार सोनवणे आता उच्च न्यायालयात जाणार आहेत.

चोपड्यात सेना-राष्ट्रवादीत पूर्वीपासूनच हाडवैर-चोपडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आतापर्यंत एकमेकांचे कट्टर शत्रू राहिले आहेत. 2009 मध्ये जगदीश वळवींनी शिवसेनेचे डी. पी. साळुंखे यांचा पराभव केला होता. यानंतर 2014 मध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचा वचपा काढला. तेव्हा शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत सोनवणेंनी राष्ट्रवादीच्या माधुरी पाटलांचा पराभव केला होता. त्यावेळी जगदीश वळवी हे भाजपकडून रिंगणात होते. त्यांनाही शिवसेनेविरुद्ध करिष्मा करता आला नव्हता. 2019 मध्ये जगदीश वळवींनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करत शिवसेनेविरुद्ध आपले नशीब आजमावले. पण तेव्हाही शिवसेनेच्या लता सोनवणेंनी त्यांचा पराभव केला होता. हा पराभव जिव्हारी लागल्यानं जगदीश वळवींनी आमदार लता सोनवणेंच्या जात प्रमाणपत्राची तक्रार केली होती. त्यामुळं लता सोनवणेंची आमदारकी धोक्यात आलीये. 

मुक्ताईनगरातही आहे दोन्ही पक्षांमध्ये विस्तव-शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये असलेला हा वाद फक्त चोपडा तालुक्यापुरता मर्यादित नाही. तिकडे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातही अशीच धुसफूस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांमध्ये विस्तव धगधगता आहे. बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या काळात तर दोन्ही पक्षांमधला वाद राज्यस्तरापर्यंत गेला होता.

एकीकडे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचा आरोप होतोय, अशा परिस्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेली धुसफूस ठाकरे सरकारला परवडणारी नाही, हे वेगळं सांगायला नको. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगावeknath khadseएकनाथ खडसे